AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जर मी नशा केली नसती..; पहिल्या लग्नाविषयी जावेद अख्तर यांच्याकडून खंत व्यक्त

ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर हे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या पहिल्या लग्नाविषयी व्यक्त झाले. जावेद यांनी हनी इरानी यांच्याशी पहिलं लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या 12 वर्षांनंतर दोघं विभक्त झाले. या मुलाखतीत अख्तर यांनी पहिल्या लग्नाविषयीची खंत व्यक्त केली.

जर मी नशा केली नसती..; पहिल्या लग्नाविषयी जावेद अख्तर यांच्याकडून खंत व्यक्त
Javed AkhtarImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 20, 2024 | 8:18 AM
Share

मुंबई : 20 मार्च 2024 | गीतकार आणि लेखक जावेद अख्तर हे नेहमीच त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. ते त्यांच्या कामासोबतच खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत येतात. जावेद अख्तर यांनी अभिनेत्री शबाना आझमी यांच्याशी लग्न केलं. मात्र शबाना या त्यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. जावेद यांच्या पहिल्या पत्नीचं नाव हनी इरानी आहे. या दोघांनी 1972 मध्ये लग्न केलं होतं आणि लग्नाच्या 12 वर्षांनंतर त्यांनी एकमेकांना घटस्फोट दिला. पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर जावेद यांनी शबाना यांच्याशी दुसरं लग्न केलं. आता जवळपास 40 वर्षांनंतर जावेद अख्तर त्यांच्या पहिल्या पत्नीबद्दल मोकळेपणे व्यक्त झाले आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी पहिला संसार मोडण्यामागचं खरं कारण सांगितलं आहे.

जावेद अख्तर यांची खंत

जावेद अख्तर म्हणाले की त्यांना दारूचं खूप वाईट व्यसन होतं आणि याच कारणामुळे हनी इरानीसोबतचं त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. “मला खात्री आहे की जर मला दारूचं व्यसन नसतं आणि जर मी आणखी जबाबदार असतो, तर कहाणी थोडी वेगळी असती”, अशी खंत अख्तर यांनी व्यक्त केली. हनी इरानी यांच्याशी बऱ्याच काळापूर्वी घटस्फोट झाला असला तरी आजरी त्यांच्याशी चांगली मैत्री असल्याचंही अख्तर यांनी सांगितलं. “माझी पहिली पत्नी हनी इरानी एक व्यक्ती म्हणून खूप चांगली आहे आणि आजही मी तिचा तितकाच आदर करतो. ती माझी आजही सर्वांत चांगली मैत्रीण आहे”, असं अख्तर म्हणाले.

शबाना आझमींनी कसं डील केलं?

या मुलाखतीत जेव्हा जावेद अख्तर यांना विचारण्यात आलं की शबाना आझमी यांनी तुमच्या दारूच्या व्यसनाशी कसं डील केलं, तेव्हा ते पुढे म्हणाले, “सुरुवातीची दहा वर्षे तिने सांभाळून घेतलं. मात्र नंतर तिने दारूचं व्यसन असलेल्या व्यक्तीशीच लग्न केलं (हसतात). लग्नाच्या काही काळानंतर मी दारूचं व्यसन सोडलं आणि पुन्हा कधीच त्याच्या वाटेला गेलो नाही.”

ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी आणि गीतकार जावेद अख्तर यांनी 1984 मध्ये लग्नगाठ बांधली. पती जावेद अख्तर यांच्यासोबतच्या नात्याविषयी त्या एका मुलाखतीत म्हणाल्या, “जावेद आणि मी खूप भांडतो. कधी कधी वाद इतके टोकाला जातात की आम्हाला एकमेकांचा जीव घ्यावासा वाटतो. पण दिवसाअखेर एकमेकांचा आदर करणं खूप महत्त्वाचं असतं. आमचं नातं असंच आहे. आमचा दृष्टीकोन इतका समान आहे की आम्हाला अरेंज्ड मॅरेज करायला पाहिजे होतं.”

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.