AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KBC 17: 50 लाखांच्या या प्रश्नाला स्पर्धकाने सोडला खेळ, तुम्हाला देता येईल का उत्तर?

सोनी टीव्हीवरील क्विझ रियॅलिटी शो ‘कौन बनेगा करोड़पती’ (KBC 17) मध्ये दर आठवड्याला अनेक स्पर्धक अमिताभ बच्चन यांच्या समोर हॉटसीटवर बसून 1 कोटी रुपये जिंकण्याचा प्रयत्न करतात. अलीकडेच या शोमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकाने 50 लाख रुपयांच्या प्रश्नाला खेळ सोडला. या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येईल का?

KBC 17: 50 लाखांच्या या प्रश्नाला स्पर्धकाने सोडला खेळ, तुम्हाला देता येईल का उत्तर?
KBCImage Credit source: Tv9 Bharatvarsh
| Updated on: Aug 19, 2025 | 3:58 PM
Share

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय क्विझ शो म्हणून ‘कौन बनेगा करोड़पती’ पाहिला जातो. सध्या शोचा 17वा सीझन सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिझनवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले आहे. सोमवारी, 18 ऑगस्ट 2025 रोजी झालेल्या भागात स्पर्धक संजय देगामा यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर शानदार खेळ खेळला. त्यांनी सर्व लाइफलाइनचा वापर करुन 25 लाख रुपये जिंकून शो सोडण्याचा निर्णय घेतला. खरे तर, संजय 50 लाखांच्या प्रश्नावर अडकला आणि रिस्क न घेता खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. आता 50 लाख रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकता का?

संजयचा हा निर्णय पूर्णपणे योग्य ठरला, कारण जर त्यांनी उत्तर दिले असते तर ते चुकीचे ठरले असते आणि त्यांना मोठी रक्कम गमवावी लागली असती. अमिताभ बच्चन यांच्या समोर हॉटसीटवर बसलेल्या संजय यांचे वडील मजुरी करतात, तर त्यांची आई मासे विकण्याचे काम करते. आपल्या नोकरीतून महिन्याला फक्त काही रुपये कमावणारे संजय आपल्या पत्नीसोबत या शोमध्ये सहभागी झाले होते.

वाचा: पुतिनला एकदाच सायको म्हणाली, नंतर मॉडेल BMWमध्ये सडलेल्या अवस्थेत सापडली,नेमकं काय घडलं?

संजयचे स्वप्न: स्वतःचे घर बांधणे

संजय देगामा यांनी शोमध्ये सांगितले की, ते यापूर्वी तीन वेळा KBC मध्ये अपयशी ठरले होते. त्यांनी सांगितले की, जर ते या शोमधून 12 लाख रुपये जिंकले, तर ते स्वतःसाठी नवीन घर बांधतील. संजय यांचे हे स्वप्न अमिताभ बच्चन यांच्या ‘कौन बनेगा करोड़पती’ने पूर्ण केले. संजय यांनी 12 लाख 50 हजार रुपयांच्या प्रश्नाचे योग्य उत्तर देऊन ही मोठी रक्कम आपल्या नावे केली आणि स्वतःचे घर बांधण्याच्या स्वप्नाकडे एक पाऊल पुढे टाकले.

25 लाखांच्या प्रश्नासाठी लाइफलाइनचा वापर

25 लाखांसाठी संजय देगामा यांना विचारलेला प्रश्न होता: “जर्मन अभियंता रुडोल्फ डीझल यांनी कोणत्या इंजिनची कार्यक्षमता वाढवण्याची संकल्पना मांडली? या इंजिनाचे नाव आता त्यांच्या नावावर आहे?”

त्यांच्यासमोर खालील पर्याय होते:

A. कुन्यो B. हाउश C. ओटो D. गॉटलिब

या प्रश्नावर संजय यांनी ‘ऑडियन्स पोल’ लाइफलाइनचा वापर केला आणि प्रेक्षकांच्या मदतीने पर्याय C ‘ओटो’ निवडला. त्यांचे हे उत्तर अगदी बरोबर होते आणि या योग्य उत्तरासह त्यांनी प्रेक्षकांच्या मदतीने 25 लाख रुपये जिंकले.

50 लाखांच्या प्रश्नावर खेळ सोडण्याचा निर्णय

संजय यांच्यासाठी 25 लाख रुपये जिंकणे ही खूप मोठी गोष्ट होती. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी संजय यांना 50 लाखांसाठी पुढील प्रश्न विचारला. 50 लाखांसाठी विचारलेला प्रश्न होता: “1973 मध्ये हान्स एन्गर्ट यांना पराभूत करून कोणता भारतीय खेळाडू विम्बल्डनच्या दुसऱ्या फेरीत पोहोचला होता?”

पर्याय होते:

A. चिरादीप मुखर्जी B. गौरव मिश्रा C. जयदीप मुखर्जी D. नंदन बाल

संजय यांना या 50 लाखांच्या प्रश्नाचे उत्तर माहिती नव्हते, म्हणून त्यांनी कोणताही धोका न पत्करता खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. जर त्यांनी खेळ पुढे सुरू ठेवला असता आणि उत्तर दिले असते, तर त्यांनी ‘गौरव मिश्रा’ हा पर्याय निवडला असता, जो चुकीचा होता. पण संजय यांनी योग्य निर्णय घेतला आणि 25 लाख रुपये घेऊन शोमधून बाहेर पडले. अमिताभ बच्चन यांनी नंतर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले, जे पर्याय C ‘जयदीप मुखर्जी’ होते.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.