AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकदा नाही अनेकदा पत्नीची फसवणूक, सत्य कळताच तिने..; अभिनेत्याकडून धक्कादायक खुलासा

प्रसिद्ध टीव्ही अभिनेता अमित टंडन याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या खासगी आयुष्याविषयी धक्कादायक खुलासा केला आहे. लग्नानंतर पत्नीची एकदा नाही तर अनेकदा फसवणूक केल्याची कबुली त्याने या मुलाखतीत दिली.

एकदा नाही अनेकदा पत्नीची फसवणूक, सत्य कळताच तिने..; अभिनेत्याकडून धक्कादायक खुलासा
अमित टंडन आणि त्याची पूर्व पत्नी रुबीImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 12, 2024 | 1:53 PM
Share

‘क्यूँकी सास भी कभी बहु थी’, ‘दिल मिल गए’, ‘ये है मोहब्बतें’ यांसारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये भूमिका साकारलेला अभिनेता अमित टंडन 2018 पासून टेलिव्हिजन इंडस्ट्रीपासून दूर आहे. अमित त्याच्या मालिकांमुळे सध्या लाइमलाइटमध्ये नसला तरी त्याच्या खासगी आयुष्यामुळे तो चर्चेत आला आहे. आरजे सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या नुकत्याच एका मुलाखतीत अमितने त्याच्या वैवाहिक आयुष्याविषयी मोठा खुलासा केला. पत्नी रुबीची एकदा नाही तर अनेकदा फसवणूक केल्याचं त्याने म्हटलंय. यामुळे तिच्यासोबतच्या नात्यात फूट पडल्याचंही त्याने मान्य केलंय.

या मुलाखतीत अमित त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील चढउतारांबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला. यावेळी सिद्धार्थने त्याला प्रश्न विचारला की, “तू तुझ्या नात्यात कधी अप्रामाणिक होतास का?” त्यावर उत्तर देताना अमित म्हणाला, “होय, मी अप्रामाणिक होतो. याला मी शब्दांत कसं मांडू? होय, माझ्या आयुष्यात असे क्षण आले जेव्हा.. (विचार करतो), मी या गोष्टीला आदरपूर्वक मांडण्याचा प्रयत्न करतोय पण हे सांगण्यासाठी कोणताच मार्ग आदरपूर्वक नाही. मी आवेगाला माझ्यावर ताबा मिळवू दिला. त्या क्षणांमध्ये मी माझ्या भूतकाळातील काही भाग पुढे नेऊ दिलं. अर्थातच काही काळापर्यंत तिला यातलं काहीच माहीत नव्हतं. पण जेव्हा तिला याबद्दल समजलं, तेव्हा ती पूर्णपणे खचली होती.”

“यामुळे तुमच्या नात्यात फूट पडते आणि कधीकधी तो दुरावा मिटवताही येत नाही. तो फक्त वाढत जातो. मुलंबाळं झाली की आमच्या नात्यात सर्वकाही ठीक होईल, असा आम्ही विचार केला. पण असं काहीच झालं नव्हतं”, अशी कबुली अमितने दिली. अमितने 2007 मध्ये रुबीशी लग्न केलं होतं. लग्नाच्या दहा वर्षांनंतर 2017 मध्ये ते विभक्त झाले होते. नंतर 2019 मध्ये अमित आणि रुबी पुन्हा एकदा एकत्र आले होते.

अमितने 2005 मध्ये ‘कैसा ये प्यार है’ या मालिकेतून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं होतं. नंतर ‘क्यूँकी सास भी कभी बहू थी’, ‘साथ निभाना साथिया’ यांसारख्या मालिकांमुळे त्याला लोकप्रियता मिळाली. 2018 मध्ये ‘कसम तेरे प्यार की’ या मालिकेत त्याने शेवटचं काम केलंय.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.