AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तिने मुलांच्या मनात विष..; जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीबद्दल काय म्हणाल्या शबाना?

जावेद अख्तर यांनी अभिनेत्री शबाना आझमी यांच्याशी लग्न केलं. मात्र शबाना या त्यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. जावेद यांच्या पहिल्या पत्नीचं नाव हनी इरानी आहे. या दोघांनी 1972 मध्ये लग्न केलं होतं आणि लग्नाच्या 13 वर्षांनंतर त्यांनी एकमेकांना घटस्फोट दिला.

तिने मुलांच्या मनात विष..; जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीबद्दल काय म्हणाल्या शबाना?
जावेद अख्तर यांचं कुटुंबImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 03, 2024 | 4:07 PM
Share

प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांचं खासगी आयुष्य अनेकदा चर्चेत आलं. जावेद यांनी 1972 मध्ये हनी इराणी यांच्याशी लग्न केलं होतं. लग्नाच्या 13 वर्षांनंतर ते विभक्त झाले आणि 1984 मध्ये त्यांनी अभिनेत्री शबाना आझमी यांच्याशी दुसरं लग्न केलं. आता नुकत्याच दिलेल्या एका शबाना आझमी या हनी इराणी यांच्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाल्या. जावेद अख्तर हे विवाहित आणि दोन मुलांचे पिता असताना त्यांना जीव शबाना यांच्यावर जडला होता. पतीच्या या विश्वासघाताबद्दल हनी यांच्या मनात सुरुवातीला फार कटुता होती. मात्र हळूहळू त्यांनी समजुदारपणे सर्वकाही हाताळलं, असं शबाना म्हणाल्या. यासाठी त्यांनी हनी यांना पूर्णपणे श्रेय दिलं.

काय म्हणाल्या शबाना आझमी?

अरबाज खानच्या ‘द इन्विन्सिबल्स सीरिज’ या चॅट शोमध्ये शबाना आझमी पाहुण्या म्हणून उपस्थित झाल्या होत्या. “मी खूप खुश आहे कारण माझं झोया आणि फरहानसोबतचं नातं खूप चांगलं आहे. याचं संपूर्ण श्रेय मी हनीला देते. त्यावेळी ते दोघं खूप लहान होते आणि त्यांना आपल्यासोबत घेऊन जाणं ही हनीसाठी सर्वांत सोपी गोष्ट होती. मात्र तिने तसं केलं नाही. तिने मुलांच्या मनात आमच्याविरोधात विष कालवलं नाही. उलट त्यांना आमच्यासोबत राहण्यासाठी प्रोत्साहित केलं. मी खरंच हनीला यासाठी खूप मानते. कारण तिने ते औदार्य दाखवलं. आज हनीसोबतही आमचं नातं खूप चांगलं आहे. आजही मध्यरात्री उठून तिला कोणतीही गरज लागली, तरी ती आत्मविश्वासाने जावेद यांना फोन करू शकते. तेसुद्धा तिच्या मदतीला धावून जाऊ शकतात. इतकं चांगलं आमचं नातं आहे”, असं त्या म्हणाल्या.

याविषयी त्यांनी पुढे पुढे सांगितलं, “आमच्यात कोणत्याही प्रकारची कटुता राहू नये असा निर्णय आम्ही घेतला होता. अर्थात सुरुवातीला तिच्या मनात कटुता होतीच. तिच्या मनात नाकारले गेल्याची भावना होती. पण जावेद यांनी सांभाळून घेतलं. आज या सर्वांतून आमच्या कुटुंबात जे नातं आहे, त्यावर मला अभिमान आहे.”

जावेद अख्तर म्हणाले की त्यांना दारूचं खूप वाईट व्यसन होतं आणि याच कारणामुळे हनी इरानीसोबतचं त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. “मला खात्री आहे की जर मला दारूचं व्यसन नसतं आणि जर मी आणखी जबाबदार असतो, तर कहाणी थोडी वेगळी असती”, अशी खंत अख्तर यांनी एका मुलाखतीत व्यक्त केली होती.

इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.