AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरुंधतीने स्पष्टपणे सांगितली तिची बाजू; प्रेमाची कबुली दिल्याचा आशुतोषला होणार पश्चात्ताप?

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतील गेल्या दोन एपिसोड्समध्ये प्रेक्षकांना हाय व्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. आशुतोषच्या तोंडून प्रेमाची कबुली ऐकल्यानंतर अरुंधतीला मोठा धक्का बसला आहे.

अरुंधतीने स्पष्टपणे सांगितली तिची बाजू; प्रेमाची कबुली दिल्याचा आशुतोषला होणार पश्चात्ताप?
Aai Kuthe Kay KarteImage Credit source: Hotstar
| Updated on: Mar 10, 2022 | 2:53 PM
Share

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेतील गेल्या दोन एपिसोड्समध्ये प्रेक्षकांना हाय व्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. आधी अभिषेकचं बेताल बोलणं ऐकून अरुंधतीने (Arundhati) त्याच्या कानशिलात लगावली. अभिषेकने अरुंधतीचा केलेला अपमान आशुतोषला सहन झाला नाही. देशमुख कुटुंबीयांसमोर आशुतोष आणि अनिरुद्ध यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. याचदरम्यान आशुतोष अरुंधतीवरील त्याच्या प्रेमाची कबुली देतो. हे सर्व अरुंधती आणि यश दाराबाहेर उभे राहून ऐकतात. आशुतोषच्या तोंडून प्रेमाची कबुली ऐकल्यानंतर अरुंधतीला मोठा धक्का बसला आहे. या सर्व घडामोडींनंतरही यशने समजावून सांगितल्यानंतर ती आशुतोषसमोर तिची बाजू स्पष्टपणे मांडायला जाते. पण यामुळे आशुतोषला प्रेमाची कबुली दिल्याचा मोठा पश्चात्ताप होणार का, त्याच्या आणि अरुंधतीच्या मैत्रीत अडथळा निर्माण होणार का, हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळेल.

“आयुष्यभर अरुंधती माझ्यावर कधीच प्रेम करू शकणार नाही, हे मला माहित असूनही मी तिची साथ सोडणार नाही. कारण तिची मैत्री माझ्याकरिता मोलाची आहे. आमच्यात निळख मैत्री आहे आणि ती तशीच राहील. आमच्या मैत्रीवर शिंतोडे उडवू नकोस”, अशा शब्दांत आशुतोष अनिरुद्धला सुनावतो. ‘अरुंधतीचं दुसऱ्यावर प्रेम असलेलं मला चालणार नाही’, याच आविर्भावात अनिरुद्ध असतो. एकीकडे आशुतोषच्या तोंडून प्रेमाची कबुली ऐकल्यानंतर अनिरुद्ध अस्वस्थ होतो, तर दुसरीकडे अरुंधतीलाही तिचे विचार स्वस्थ बसू देत नाहीत.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

देशमुख कुटुंबीयांसमोर अशा पद्धतीने अरुंधतीवरील प्रेमाविषयी बोलायला पाहिजे नव्हतं, असं आशुतोषला वाटतं. आईसमोर तो त्याचा पश्चात्ताप व्यक्त करतो. तर अरुंधतीच्या समजूतदारपणावर विश्वास ठेवण्याचा सल्ला त्याची आई देते. दुसरीकडे अरुंधतीच्या मनात विचारांचं द्वंद्व सुरू आहे. तरीसुद्धा ती आशुतोषशी स्पष्ट बोलण्याचा निर्णय घेते. “माझ्या मनात असं काही नाहीये. मी फक्त अनिरुद्धवर प्रेम केलंय. बाकी मैत्री, एकत्र काम याबद्दल माझं काहीही म्हणणं नाहीये. पण त्याहून जास्त मला गुंतता नाही येणार,” असं ती स्पष्ट करते. अरुंधतीच्या या स्पष्टीकरणाचा तिच्या आणि आशुतोषमधील मैत्रीवर काय परिणाम होणार, हे प्रेक्षकांना मालिकेच्या पुढील भागात पहायला मिळेल.

हेही वाचा:

लेखक नशा करून, गांजा मारून लिहितात का? ट्रोलिंगवर ‘आई कुठे काय करते’च्या लेखिकेचा परखड सवाल

आई कुठे काय करते: देशमुखांसमोर आशुतोष देणार प्रेमाची कबुली; काय असेल अरुंधतीची प्रतिक्रिया?

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.