AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anu Malik | मी या व्यक्तींमुळेच जिवंत म्हणत, अनु मलिक यांनी केले मोठे विधान

सा रे ग म प शोमध्ये येणारा एपिसोड हा फॅमिली स्पेशल आहे. यामध्ये अनु मलिक हे भावूक झाल्याचे दिसत आहे.

Anu Malik | मी या व्यक्तींमुळेच जिवंत म्हणत, अनु मलिक यांनी केले मोठे विधान
| Updated on: Jan 15, 2023 | 10:56 PM
Share

मुंबई : सा रे ग म प…या शोमध्ये संगीतकार अनु मलिक (Anu Malik) हे जज आहेत. भारती सिंह शोला होस्ट करत आहे. भारतीचे विनोद ऐकून सर्वचजण पोट धरून हासायला लागतात. सा रे ग म प शोचा येणार एपिसोड अत्यंत खास ठरणार आहे. अनु मलिक भावूक झाल्याचे या एपिसोडमध्ये (Episode) बघायला मिळणार आहे. इतकेच नाहीतर या तीन व्यक्तींमुळेच मी जिवंत असल्याचे देखील अनु मलिक सांगताना दिसत आहे. या तीन व्यक्ती माझी ताकद असल्याचे देखील अनु मलिक यांनी म्हटले आहे. शंकर महादेवन, नीति मोहन आणि अनु मलिक हे शो जज करत आहेत. सा रे ग म प च्या माध्यमातून लहान मुलांनी त्यांच्या गोड आवाजाने प्रेक्षकांना (Audience) मंत्रमुग्ध केले आहे.

सा रे ग म प शोमध्ये येणारा एपिसोड हा फॅमिली स्पेशल आहे. यामध्ये अनु मलिक हे भावूक झाल्याचे दिसत आहे. यामध्ये अनु मलिक याच्यासाठी त्यांच्या फॅमिलीचा एक खास मेसेज हा दाखवण्यात येणार आहे.

या मेसेजमध्ये अनु मलिक हे किती स्ट्रॉन्ग आहेत, हे सांगितले जात आहे. आयुष्यामध्ये आलेल्या अडचणीमध्ये त्यांनी कधीच हार मानली नसल्याचे या मेसेजमध्ये सांगितले आहे. हाच मेसेज ऐकल्यानंतर ते भावूक झाल्याचे दिसत आहे.

विशेष म्हणजे या मेसेजसाठी अनु मलिक हे टीमला धन्यवाद देताना देखील दिसत आहेत. यावेळी अनु मलिक म्हणाले की, मी माझ्या आयुष्यामध्ये अनेक कठीण प्रसंग बघितले आहेत. मात्र, आज मी ज्याठिकाणी आहे ते फक्त आणि फक्त माझ्या पत्नी आणि मुलींमुळेच…

पुढे अनु मलिक म्हणाले, असे म्हटले जाते की फॅमिलीचा आधारस्तंभ कायम मोठा माणूस असतो. परंतू माझ्या फॅमिलीचा आधारस्तंभ, माझी शक्ती, माझी ताकद माझी पत्नी आणि माझ्या दोन मुली आहेत.

मी आज फक्त माझ्या पत्नीमुळे आणि माझ्या दोन मुलींमुळेच जिवंत आहे. अनु मलिक पुढे म्हणाले, जर आपली फॅमिली आपल्यासोबत असेल तर आपण काहीही करून शकतो. अनु मलिक यांच्या पत्नीचे नाव अंजली वासुदेव भट्ट असे आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.