AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health | अॅसिडिटीची समस्या दूर करण्यासाठी या आयुर्वेदिक टिप्स फाॅलो करा आणि कायमचा त्रास दूर करा!

पाणी उकळू द्या आणि आधी जिरे टाका. मग काही वेळाने गॅस बंद करून झाकून ठेवा. आता ते पाणी ग्लासमध्ये चाळून घ्या. मात्र, जास्त गरम पाणी पिऊ नका. 10 मिनिटे सोडा, ते थोडे थंड करा आणि प्या. तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास घेऊ शकता. विशेष म्हणजे जर आपल्याला जास्तच प्रमाणात जर अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर आपण जेवणाच्या अगोदर हे पाणी प्यावे.

Health | अॅसिडिटीची समस्या दूर करण्यासाठी या आयुर्वेदिक टिप्स फाॅलो करा आणि कायमचा त्रास दूर करा!
Image Credit source: istockphoto.com
| Edited By: | Updated on: May 09, 2022 | 3:39 PM
Share

मुंबई : आपल्यापैकी अनेकांना अॅसिडिटीची (Acidity) समस्या कायम असते. गॅस, अॅसिडिटीचा त्रास यामुळे अनेकजण वैतागले आहेत. खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अॅसिडिटी होते. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की अन्न खाल्ल्याने अतिरिक्त गॅस होतो, अॅसिडिटीचे कारण म्हणजे अन्नातून जास्त प्रमाणात अन हेल्दी गोष्टी जातात. जेव्हा आपण फास्ट फूड खातो किंवा अन्नासोबत पाणी पितो तेव्हाच अतिरिक्त वायू आपल्या शरीरात प्रवेश करतो. कोल्ड्रिंक (Cold drink) पिल्याने हा त्रास वाढतो. कार्बोनेट आणि अतिरिक्त तेल आणि मसाल्यांनी ही समस्या अधिक वाढली जाते. बाहेर जेवण करायला गेल्यावर अॅसिडिटीचा त्रास टाळायचा असेल तर नेहमीच जेवण (Food) झाल्यावर पाण्यामध्ये लिंबू टाकून पिणे फायदेशीर ठरते.

जिरे पाणी फायदेशीर

पाणी उकळू द्या आणि आधी जिरे टाका. मग काही वेळाने गॅस बंद करून झाकून ठेवा. आता ते पाणी ग्लासमध्ये चाळून घ्या. मात्र, जास्त गरम पाणी पिऊ नका. 10 मिनिटे सोडा, ते थोडे थंड करा आणि प्या. तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास घेऊ शकता. विशेष म्हणजे जर आपल्याला जास्तच प्रमाणात जर अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर आपण जेवणाच्या अगोदर हे पाणी प्यावे. यामुळे अॅसिडिटीचा त्रास दूर होण्यास मदत होते.

जेवण केल्यानंतर लगेचच झोपू नका

अॅसिडिटीचा त्रास दूर करण्यासाठी दुसरा देखील एक महत्वाचा उपाय आहे. जेवण केल्यानंतर लगेचच झोपणे टाळा. कारण जर बऱ्याच लोकांना जेवण केल्यानंतर लगेचच झोपण्याची सवय असते. ही सवय आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे अॅसिडिटी वाढण्यास सुरूवात होते. दररोज रात्रीचे सेवन झाल्यावर आपण किमान तीस मिनिटे चालले पाहिजे. यामुळे अॅसिडिटीची समस्या बऱ्याच अंशी कमी होण्यास मदत होते.

Follow Us
मोठी घडामोड! केंद्र सरकारने थांबवली साखर निर्यात; भाव वाढीमागचं.......
मोठी घडामोड! केंद्र सरकारने थांबवली साखर निर्यात; भाव वाढीमागचं........
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत
CM विजय यांनी तडकाफडकी घेतला सर्वात मोठा निर्णय! या नेत्याला 24 तासांत.
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!
मंत्र्यांचे दौरे रद्द, एकनाथ शिंदेही आता EV कारमध्ये!.
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार.....
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; मंत्र्यांचे ताफे कमी होणार......
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड.....
पुण्यातून पळाला, अहिल्यानगरात सापडला… नीट घोटाळ्याचे धागेदोरे उघड......
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर
मोठी बातमी! महाराष्ट्रात ATS ची धडाकेबाज कारवाई 57 जण चौकशीच्या रडारवर.
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी
खरातच्या अडचणी वाढल्या; आर्थिक फसवणूक प्रकरणात 5 दिवसांची पोलीस कोठडी.
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत
गुवाहाटी पुन्हा चर्चेत, अखेर तटकरे- पटेलांनी सुनेत्रा पवारांसमोर मनोगत.
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत...
मोठी बातमी! CM विजय यांनी फ्लोर टेस्टिंगमध्ये सिद्ध केलं बहुमत....
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत
तटकरेंना सिल्व्हर ओकचा चहा आवडत असावा... रोहित पवारांचे सूचक संकेत.