AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्री झोपण्यापूर्वी चेहर्‍यावर नारळाचं तेल लावण्याचे हे आहेत फायदे

रात्री झोपण्यापूर्वी नारळाचं तेल लावण्याचा हा सोपा उपाय तुमच्या त्वचेला नवं जीवन देऊ शकतो. नियमित वापराने त्वचेच्या समस्या गायब होतील आणि तुम्हाला निरोगी, चमकदार त्वचा मिळेल. बाजारातून शुद्ध नारळाचं तेलच खरेदी करा, कारण बनावट तेलामुळे त्वचेचं नुकसान होऊ शकतं.

रात्री झोपण्यापूर्वी चेहर्‍यावर नारळाचं तेल लावण्याचे हे आहेत फायदे
Image Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Apr 10, 2025 | 1:51 PM
Share

आपल्यापैकी बरेच जण नारळाचं तेल केवळ केसांसाठीच उपयुक्त आहे असं मानतात. मात्र तुम्हाला आश्चर्य वाटेल की, हे तेल चेहऱ्यासाठीही तेवढंच प्रभावी ठरू शकतं! विशेषतः रात्री झोपण्याआधी याचा योग्य वापर केल्यास त्वचेवर अनेक सकारात्मक परिणाम दिसून येतात.

त्वचेचं पुनरुत्थान रात्रीच जास्त प्रभावी!

तज्ज्ञ सांगतात की रात्री झोपताना त्वचेत पुनरुत्पादनाची प्रक्रिया वेगाने सुरू होते. याच वेळी जर चेहऱ्यावर नारळाचं तेल लावलं गेलं, तर ते त्वचेला खोलवर पोषण देतं आणि निखार आणतं.

कोरडी, निर्जीव त्वचा होते मऊ आणि तजेलदार

नारळाच्या तेलामध्ये असतात पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई सारखे पोषक घटक. हे घटक त्वचेचा कोरडेपणा दूर करत मृदूता प्रदान करतात. थंडीत किंवा उन्हाळ्यात त्वचा कोरडी पडते, अशावेळी हे तेल वरदान ठरू शकतं.

सुरकुत्यांवर प्रभावी उपाय

चेहऱ्यावर पडणाऱ्या सुरकुत्या आणि फाईन लाईन्स यासाठीही नारळाचं तेल प्रभावी आहे. यामध्ये असणारे अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेला वृद्धत्वाच्या लक्षणांपासून वाचवतात. व्हिटॅमिन ई त्वचेला लवचिक ठेवतं आणि डाग कमी करतं.

कसं वापराल नारळाचं तेल?

दिवसभरातील धूळ, घाम आणि मेकअपचा थर त्वचेला त्रासदायक ठरू शकतो, म्हणून चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर कोरड्या टॉवेलने चेहरा हलक्या हाताने पुसा.आता थोडंसं नारळाचं तेल तुमच्या हातावर घ्या. दोन्ही हात एकमेकांवर चोळून तेल किंचित कोमट करा. मग हे तेल चेहऱ्यावर लावा. तेल लावताना हलक्या हाताने गोलाकार मालिश करा. यामुळे तेल त्वचेत खोलवर शोषले जाईल आणि रक्ताभिसरणही सुधारेल.हे तेल रात्रभर चेहऱ्यावर ठेवणं सर्वात फायदेशीर असतं. कारण रात्रीच्या वेळेस त्वचेची पुनरुत्पादन प्रक्रिया अधिक सक्रिय असते. सकाळी उठल्यावर सौम्य फेसवॉशने चेहरा धुवा.

शतकानुशतकांपासून वापरलं जाणारं नारळाचं तेल आता आधुनिक विज्ञानानेही त्वचेसाठी उपयुक्त असल्याचं मान्य केलं आहे. त्यामुळे रासायनिक उत्पादनांपेक्षा हा नैसर्गिक उपाय अधिक सुरक्षित आणि फायदेशीर ठरतो.

Follow Us
एक चूक अन् 11 जण दगावले, कल्याण - अहिल्यानगर मार्गावर भीषण अपघात
एक चूक अन् 11 जण दगावले, कल्याण - अहिल्यानगर मार्गावर भीषण अपघात.
नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरण: चेअरमन म्हणाले...
नाशिकमधील आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरण: चेअरमन म्हणाले....
समता पतसंस्थेत माझ्या..., तब्बल 8 तासांच्या चौकशीनंतर प्रतिभा चाकणकर न
समता पतसंस्थेत माझ्या..., तब्बल 8 तासांच्या चौकशीनंतर प्रतिभा चाकणकर न.
अशोक खरातचे अनेक फोन कॉल्स अन् ठाणे कनेक्शन... अंजली दमानिया करणार गौप
अशोक खरातचे अनेक फोन कॉल्स अन् ठाणे कनेक्शन... अंजली दमानिया करणार गौप.
साश्रू नयनांनी अखेरचा निरोप, स्वरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन
साश्रू नयनांनी अखेरचा निरोप, स्वरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन.
आशा भोसले यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार...
आशा भोसले यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार....
आशा भोसले यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्ककडे रवाना
आशा भोसले यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्ककडे रवाना.
आक्षेपार्ह व्हायरल व्हिडीओ प्रकरणानंतर मंत्री झिरवाळ पहिल्यांदा कॅबिने
आक्षेपार्ह व्हायरल व्हिडीओ प्रकरणानंतर मंत्री झिरवाळ पहिल्यांदा कॅबिने.
राज्यात उष्णतेचा तडाखा; हवामान खात्याकडून हिट वेव्हचा इशारा?
राज्यात उष्णतेचा तडाखा; हवामान खात्याकडून हिट वेव्हचा इशारा?.
स्वरसाम्राज्ञीचा निरोप! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आशाताईंच
स्वरसाम्राज्ञीचा निरोप! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आशाताईंच.