AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

होर्मुझमध्ये वेगवान हालचाली, भारताचे टेन्शन वाढले, नौदलाच्या ग्रीन सिग्नलची वाट पाहाताहेत…

होर्मुझ स्ट्रेटमध्ये इराणने अजूनही त्यांची ताकद कायम ठेवली आहे. इराणशी युद्धविरामाचा करार झाल्यानंतरही इस्रायलने थेट लेबनॉनवर हल्ला केल्याने इराण आता अधिकच सावध झाला आहे.

होर्मुझमध्ये वेगवान हालचाली, भारताचे टेन्शन वाढले, नौदलाच्या ग्रीन सिग्नलची वाट पाहाताहेत...
Hormuz
| Updated on: Apr 10, 2026 | 4:56 PM
Share

पश्चिम आशियातील तणावानंतर झालेल्या युद्धविरामानंतर इंधन वाहतूकीसाठी कळीची असलेल्या होर्मुझ स्ट्रेटमधून पुन्हा जहाजांची वाहतूक सुरु होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. मात्र, ५ एप्रिलनंतर येथून कोणतेही भारतीय ध्वज लावलेले जहाज होर्मुझ पार करु शकलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय नौदल सध्याच्या स्थितीवर बारीक नजर ठेवून आहे. आणि सुरक्षित वातावरण झाल्याची खात्री झाल्यानंतरच जहाजांना पुढे जाण्याची परवानगी दिली जाणार आहे.

सध्या भारतीय ध्वज लावलेली १६ जहाजे होर्मुझच्या पश्चिम भागात ( फारसची आखात ) अडकलेले आहेत. या एलएनजी(LNG), एलपीजी(LPG) , कच्चे तेलाची वाहतूक करणारी जहाजे, कंटेरन जहाजे आणि ड्रेजर तसेच रासायनिक पदार्थांची वाहतूक करणाऱ्या जहाजांचा समावेश आहे.

एलपीजीची वाहतूक करणारे ‘जग विक्रम’हे जहाज अजूनही शारजाह मध्ये उभे आहे आणि आदेशाची वाट पाहात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात ५ ते ६ जहाजांना लवकरच नौदलाचे क्लिअरन्स मिळाल्यानंतर होर्मुझ पार करता येणार आहे. सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार ५ ते ६ जहाजांची पहिली तुकडी लवकरच नौदलाच्या हिरव्या झेंडा मिळाल्यानंतर होर्मुझ पार करु शकणार आहे.या संदर्भात इराणचे अधिकारी आणि चालक दलाशी बोलणी सुरु आहेत. युद्धाच्या दरम्यान एकूण २५ भारतीय जहाजे या क्षेत्रात उपस्थित होती. ज्यातील ९ जहाजे आतापर्यंत होर्मुझ सुखरुपपणे पार करु शकले आहेत. भारतीय नौदलाच्या तैनातीत सध्या कोणताही बदल केलेला नाही. आणि एस्कॉर्ट मोहिम सतत सुरु आहे. नौदल सुरक्षित मार्गांवरुन जहाजांना मार्गदर्शन करत आहे आणि त्यांना ओमानच्या खाडीपर्यंत सुरक्षा देण्यात आली आहे.

अजूनही जोखीम कायम

गुरुग्राम स्थित भारतीय नौदलाच्या इन्फॉर्मेशन फ्यूजन सेंटर–इंडियन ओशन रीजन (IFC-IOR)च्या माहितीनुसार युद्धाच्या सुरुवातीपासून ६ एप्रिलपर्यंत फारसची खाडी, होर्मुझ आणि ओमानच्या खाडीत ३० घटनांची नोंद झाली आहे. यात २३ जहाजांना टार्गेट करण्यात आले. ज्यात मिसाईल आणि ड्रोन हल्ल्यांचा समावेश होता, या घटनेत एकूण १० जणांचा मृत्यू झाला आहे. या आकड्यांवरुन कळते की येथे  इराण युद्धानंतर किती अस्थिरता आणि जोखीम कायम आहे.

भारतीय नौदलाची सतर्कता आणि परस्पर समन्वयाने भारतीय जहाजे आणि कंटनर्सना सुरक्षित होर्मुझमधून आणले जात आहे. येत्या काही दिवसात होर्मुझमधून जहाजांची वाहतूक हळूहळू सामान्य होण्याची आशा आहे.

समुद्री व्यापाराला गती केव्हा ?

या दरम्यान इराणकडून मिळाल्या संकेतानुसार होर्मुझवर ते कठोर नियंत्रण आणण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे समुद्रातील या महत्वाच्या मार्गाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी हा जलमार्ग अत्यंत महत्वपूर्ण आहे. कारण जगातील इंधनाचा व्यापारापैकी मोठा हिस्सा येथूनच जातो. येत्या काही दिवसात येथे शांतता प्रस्थापित होईल अशी आशा व्यक्त केली जात असून पुन्हा समुद्री व्यापाराला गती मिळण्याची शक्यता आहे.

Follow Us
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा...
आयटी कंपनीनंतर आता मुंबईच्या नामांकित बँकेत धर्मपरिवर्तन? पतीचा....
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार
शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी खूश खबर... अखेर कांदा प्रश्नावर तोडगा निघणार.
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह..
कोणाला सुगावा लागू नये म्हणून चक्क... कसून चौकशी केल्यानंतर तेजस शाह...
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात..
पंतप्रधान मोदींवर सपकाळांची जहरी टीका; पनोती वक्तव्याने महाराष्ट्रात...
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर..
EDच्या कारवाईनंतर CPI(M) कार्यकर्ते आक्रमक; अधिकाऱ्यांच्या गाड्यांवर...
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये..
नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, प्राध्यापक तेजस शाहच्या कॅबिनमध्ये...
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!
रवींद्र चव्हाणांची दिल्लीवारी; 48 नावांची यादी दिल्ली दरबारात!.
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,
मुंबईकरांचं रक्त विकण्याचा डाव; ठाकरे गटाच्या विरोधानंतर फेरविचार,.
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;
मोटेगावकरने ज्याच्यासाठी पेपर फोडला त्याच लेकाचा खळबळजनक गौप्यस्फोट;.
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले....
मीरा रोडनंतर घाटकोपर पेटलं? किरीट सोमय्यांचा थेट इशारा, म्हणाले.....