AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संयुक्त राष्ट्रसंघात भारताने पाकिस्तानला फटकारले, ‘तुम्हाला तो अधिकार नाही…’

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानची खोड मोडली आहे. भारताने पाकिस्तानने केलेल्या आरोपानंतर त्यांना चांगलेच फटकारले आहे. नागरिक आणि दहशतवादी यांच्यामध्ये जो देश फरक करत नाही त्याला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल बोलण्याचा अधिकार नाही, असे भारताने म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्रसंघात भारताने पाकिस्तानला फटकारले, 'तुम्हाला तो अधिकार नाही...'
पार्वथानेनी हरीश (फाईल फोटो) Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: May 24, 2025 | 7:44 AM
Share

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत भारताने पाकिस्तानला चांगलेच फटकारले. नागरिक आणि दहशतवादी यांच्यामध्ये जो देश फरक करत नाही त्याला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. पाकिस्तानी सैन्याने ऑपरेशन सिंदूरनंतर भारतातील सीमावर्ती गावांवर गोळीबार केला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा बळी गेला. तसेच भारतातील धार्मिक स्थळांना पाकिस्तानने जाणूनबुजून लक्ष्य केले. याबद्दलची माहिती भारताने संयुक्त राष्ट्रसंघात दिली.

संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी पार्वथानेनी हरीश यांनी सांगितले की, पाकिस्तानी प्रतिनिधीने अनेक मुद्द्यांवर भारतावर निराधार आरोप केले. त्यामुळे त्या आरोपांना आम्ही उत्तर दिले. संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेच्या खुल्या चर्चेदरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले. यापूर्वी संयुक्त राष्ट्रांमधील पाकिस्तानचे राजदूत असीम इफ्तिखार अहमद यांनी पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा मांडला. तसेच भारत आणि पाकिस्तानमधील नुकताच झालेल्या संघर्षाबद्दल वक्तव्य केले.

पाकिस्तानच्या राजदूताच्या वक्तव्यानंतर भारताने पाकिस्तानची पोलखोल केली. पार्वथानेनी हरीश म्हणाले की, भारताने गेल्या अनेक दशकांपासून आपल्या सीमेवर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यांचा सामना केला आहे. मुंबई शहरावर 26/11 रोजी हल्ला झाला होता. त्या हल्ल्यापासून एप्रिल 2025 मध्ये पहलगाम पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यापर्यंतच्या सर्व प्रकरणात पाकिस्तानचा हात आहे. पाकिस्तानच्या या दहशतवादी कारवायांमध्ये सर्वसामान्य नागरिक लक्ष्य ठरले. कारण त्यांचा उद्देश आमची समृद्धी, प्रगतीवर हल्ला करणे आहे.

पार्वथानेनी हरीश यांनी सांगितले की, पाकिस्तान दहशतवाद्यांचा बचाव करण्यासाठी वारंवार सर्वसामान्य नागरिकांचा ढालीसारखा वापर करत आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या अंतिम संस्कारमध्ये पाकिस्तान लष्कारातील अधिकारी, पोलीस आणि वरिष्ठ सरकारी अधिकारी सहभागी झाले होते, त्याचा व्हिडिओ सर्व जगाने पाहिला आहे.

पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी २६ पर्यटकांची हत्या केली. या घटनेनंतर भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला. भारताने पाकिस्तानवर लष्करी कारवाई करत ऑपरेशन सिंदूर राबवले. त्यात पाकिस्तानचे ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाली. तसेच सिंधू जल वाटप करार भारताने स्थगित केला.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.