AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

फाळणीच्यावेळी पाकिस्तानात गेलेल्या मुस्लिमांची पंतप्रधान मोदींकडे मोठी मागणी

फाळणीच्यावेळी पाकिस्तानात निघून गेलेल्या मुस्लिमांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मोठी मागणी केली आहे. भारतातून पाकिस्तानात स्थायिक होण्यासाठी गेलेल्या या मुस्लिमांना मुहाजीर म्हटलं जातं. 1947 च्या सुमारास हे मुहाजीर पाकिस्तानात गेले होते.

फाळणीच्यावेळी पाकिस्तानात गेलेल्या मुस्लिमांची पंतप्रधान मोदींकडे मोठी मागणी
altaf hussain-narendra modi
| Updated on: May 28, 2025 | 9:18 AM
Share

भारत-पाकिस्तान संबंधात सध्या प्रचंड तणाव आहे. सीजफायरनंतरही भारताची आक्रमक भूमिका कायम आहे. याला कारण आहे, पाकिस्तानची दहशतवादाला खतपणी घालण्याची प्रवृत्ती. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चांगलीच अद्दल घडवली आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातील निर्वासित नेते आणि मुत्ताहिदा कौमी मूवमेंटचे (MQM) फाऊंडर अल्ताफ हुसैन (Altaf Hussain) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे मदत मागितली आहे.

फाळणीनंतर भारतसोडून पाकिस्तानात जाऊन स्थायिक झालेले शरणार्थी म्हणजे मुहाजिरांना तिथे त्रास दिला जातोय. हा मुद्दा आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर मांडण्याची अल्ताफ हुसैन यांनी मागणी केली आहे. लंडनमध्ये एका कार्यक्रमात त्यांनी हे आवाहन केलं. बलूच लोकांच समर्थन केल्याबद्दल अल्ताफ हुसैन यांनी मोदींच कौतुक केलं. हा साहसी आणि नैतिक दृष्टया चांगलं पाऊल असल्याच त्यांनी म्हटलय.

आतापर्यंत 25 हजार मुहाजिरांचा मृत्यू

मुहाजिर समुदायाच्या समर्थनासाठी सुद्धा अशाच प्रकारचा आवाज उचलण्याची अल्ताफ हुसैन यांनी पीएम मोदींकडे मागणी केली. “मुहाजिर अनेक दशकांपासून पीडित आहेत. पाकिस्तानात त्यांच्यासोबत भेदभाव केला जातो. हे सर्व स्टेट स्पॉन्सर आहे” असं अल्ताफ हुसैन म्हणाले. “भारताच्या फाळणीनंतर पाकिस्तानच्या सैन्य संस्थांनी कधीच मुहाजिरांना देशातील वैध नागरिक म्हणून स्वीकारलं नाही. मुहाजिरांना त्यांचे अधिकार दिले नाहीत. सैन्य कारवाईत आतापर्यंत 25 हजार मुहाजिरांचा मृत्यू झाला. हजारो लोकांना गायब करण्यात आलं” असा आरोप अल्ताफ हुसैन यांनी केला.

पाकिस्तानात मुहाजिर असहाय्य

“अमेरिकेच्या ह्यूस्टनमध्ये पाकिस्तानी कॉन्सुल जनरल आफताब चौधरी यांनी एका कार्यक्रमात एक व्हिडिओ दाखवला. यात अल्ताफ आणि एमक्यूएमला भारताच एजंट म्हणून दाखवण्यात आलं. असे आरोप करुन मुहाजिरांच आवाज दाबण्याच काम तिथे चालतं. पाकिस्तानात मुहाजिर असहाय्य आहेत” असं अल्ताफ हुसैन म्हणाले. “पीएम मोदी यांनी आंतरराष्ट्रीय मंचावर मुहाजिरांचा प्रश्न मांडावा. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने या समुदायाच्या मौलिक अधिकारांची सुरक्षा करावी” अशी अल्ताफ हुसैन यांना अपेक्षा आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.