AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, लष्कराचं सरकारविरोधातच बंड? नेमकं काय घडतंय?

भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली आहे. दोन्ही देशांनी अधिकृतपणे तसे सांगितले आहे. दरम्यान, दोन्ही देशांतील युद्धजन्य परिस्थिती निवळत आहे, असे सांगितले जात असतानाच भारत-पाकिस्तानने सीमेवर पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन, लष्कराचं सरकारविरोधातच बंड? नेमकं काय घडतंय?
india pakistan war
| Edited By: | Updated on: May 10, 2025 | 10:13 PM
Share

India Pakistan War : भारत आणि पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी झाली आहे. दोन्ही देशांनी अधिकृतपणे तसे सांगितले आहे. दरम्यान, दोन्ही देशांतील युद्धजन्य परिस्थिती निवळत आहे, असे सांगितले जात असतानाच भारत-पाकिस्तानने सीमेवर पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. याच कारणामुळे सध्या सीमाभागात तणाव निर्माण झाला आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार भारत आणि पाकिस्तान सीमाभागात पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानने काश्मीरमध्ये ड्रोन हल्ले केले आहेत. श्रीनगरमध्ये 50 हून अधिक स्फोटांचे आवाज ऐकू आले आहेत. पंजाब, राजस्थान राज्यातील सीमाभागातही ड्रोन दिसल्याचे वृत्त आहे. याच कारणामुळे पंजाब, राजस्थान, जम्मूत ब्लॅकआऊट करण्यात आले आहे. पंजाबच्या एकूण 9 शहरांत संपूर्णपणे ब्लॅकआऊट करण्यात निर्णय घेण्यात आला आहे. पंजाबच्याही भोगा परिसरात ब्लॅकआऊट करण्यात आले आहे.

पाकिस्तानी लष्करांचे बंड?

तसं पाहायचं झालं तर पाकिस्तान सरकारनेच भारताला कॉल करून शस्त्रसंधीच्या चर्चेला सुरुवात केली होती. त्यानंतर मात्र अवघ्या काही तासांत पाकिस्तानच्या लष्कराने भारतावर हल्ले केले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार पाकिस्तानी लष्कर आता पाकिस्तानी सरकारच्या विरोधात गेले आहे. त्यामुळेच आता पाकिस्तानी आर्मीने पाकिस्तानी सरकारविरोधात बंड तर केले नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, आता पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यावर भारत सरकार आणि लष्कर नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.