ट्रम्प सरकारचा घातक निर्णय, पुन्हा १८ हजार बेकायदा भारतीयांची होणार हकालपट्टी
ट्रम्प सरकारने आता १८ हजार बेकायदा भारतीय नागरिकांना देशातून हुसकावून पुन्हा त्यांचे डिपोर्टेशन भारतात करण्याची योजना आखली आहे. साल २०२५ मध्ये ट्रम्प सरकारने भारतीयांना हाता-पायात बेड्या घालून भारतात विमानाने पाठवले होते.

डचणीत सापडले आहे. आता देखील ट्रम्प प्रशासन डिपोर्टेशनसाठी सैन्य विमानांचा वापर करण्याच्या तयारीत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी बेकायदेशीर पणे राहणाऱ्यांविरोधात पुन्हा सत्तेत आल्यापासून मोहीम छेडली आहे. साल २०२५ मध्ये अमेरिकेने ३,५६७ भारतीय नागरिकांना डिपोर्ट केले होते. त्यावेळी त्यांच्या हातापायात बेड्या टाकण्यात आल्या होत्या.
अमेरिकेतील न्यूयॉर्क, टेक्सास, कॅलिफोर्निया आणि न्यूजर्सी या चार शहरातील डिपोर्टेशनमुळे भारतीयांचे जीवन संपूर्णपणे बदलेले आहे. त्यामुळे डिटेंशन सेंटरमध्ये ठेवलेल्या लोकांसोबत अत्याचार केला जात असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. ज्यांच्याकडे योग्य कागदपत्रे नसतील त्या भारतीयांना ना अपिल, ना सुनावणी ना वकील करण्याची संधी देण्यात येणार नाही. ट्रम्पची आयसीई ( इमिग्रेशन कस्टम्स एंड एन्फोर्समेंट ) च्या टीस सतत छापा मारत आहेत.
डिपोर्टेशनसाठी दोन नवीन डिटेंशन सेंटर तयार
डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने डिपोर्ट करण्यासाठी निवडलेल्या भारतीयांना ठेवण्यासाठी एल पासोमध्ये एक आणि कॅलिफोर्नियात दोन वेअरहाऊस खरेदी केले आहेत. यावर १६,५०० कोटी रुपये खर्च केले गेले आहे. यांना डिटेंशन सेंटरमध्ये बदलून आयसीईला सोपवले आहे. येथे सुमारे १२ हजार भारतीयांना ठेवण्यात आले आहे.
बाजू मांडण्याचीही संधी नाही…
मी ३० वर्षापासून अमेरिकेतील भारतीय नागरिकांच्या केस लढत आहे. विना कागदपत्रे राहणाऱ्या कोणत्याही भारतीयाला त्याची बाजू मांडण्यासाठी संधी दिली जात होती. परंतू आता आयसीईच्या धाडीनंतर लोकांना थेट डिटेंशन सेंटरला पाठवले जात आहे असे न्यूयॉर्कच्या इमिग्रेशन अटर्नी ग्रेग सिस्किंड यांनी म्हटले आहे. त्यांचे म्हणणे आहे की अमेरिकेत संघ राज्यामुळे प्रत्येक राज्यात मानवाधिकारांशी संबंधित वेग-वेगळे कायदे आहेत. परंतू आयसीई कोणत्याही राज्यात जाऊन कारवाई करत आहे.
२-२५ मध्ये ३, ५६७ भारतीय डिपोर्ट झाले होते
२०२५ मध्ये अमेरिकेने ३,५६७ भारतीय नागरिकांना डिपोर्ट केले होते. ही माहिती भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने जून २०२६ मध्ये दिली होती. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की २०२६ मध्ये जूनपर्यंत १,०७६ भारतीयांना डिपोर्ट केले होते.
५ फेब्रुवारी २०२५ रोजी अमेरिकेने पहिल्यांदा लष्कराच्या विमानाने १०४ भारतीयांना अमृतसरला पाठवले होते. यादरम्यान अनेक लोकांना हतकडी आणि पायात बेड्या टाकून आणले होते. याची छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यानंतर देशभरात संताप व्यक्त करण्यात आला होता. आणि संसदेत विरोधी पक्षांना सरकारला धारेवर धरले होते.
