AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दूध उकळायला उशीर झाला तर ते का फुटते; जाणून घ्या दूध खराब होण्यामागील कारणे

दूध फुटण्यामागचे कारण जाणून घेण्यापूर्वी आपल्याला हे माहित असले पाहिजे की दूध नेहमीच 20 ते 25 अंश इतक्या तापमानात खराब होण्याची चिन्हे अधिक असतात. (If milk boils too late, why does it burst? Learn how to keep milk from spoiling)

दूध उकळायला उशीर झाला तर ते का फुटते; जाणून घ्या दूध खराब होण्यामागील कारणे
दूध उकळायला उशीर झाला तर ते का फुटते; जाणून घ्या दूध खराब होण्यामागील कारणे
| Updated on: Jul 07, 2021 | 6:55 PM
Share

मुंबई : दूध आपल्या सर्वांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. रोजच्या जीवनात आपण दुधाचे सेवन करतो. दुधाव्यतिरिक्त आपण दुधापासून तयार होत असलेले दही, लोणी, तूप, ताक, लस्सी, चीज, पनीर, आईस्क्रीम, क्रीम इत्यादी पदार्थही मोठ्या प्रमाणात वापरतो. उन्हाळ्याच्या काळात दूध खराब होण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे आपण खबरदारी म्हणून उन्हाळ्यात दिवसातून किमान 3-4 वेळा दूध उकळत असतो. याशिवाय पुढील काही दिवसांमध्ये दूध वापरण्यासाठी ते फ्रीजमध्ये ठेवतो. त्याचप्रमाणे दुधापासून बनवलेल्या इतर वस्तूही खराब होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवल्या जातात. तथापि, तूप आणि लोणी आपण सर्वसाधारण तापमानात ठेवू शकतो. ते सहसा खराब होत नाही. उन्हाळ्याच्या दिवसांत दूध व दुधापासून तयार होणारे इतर दुग्धजन्य पदार्थ का खराब होतात, ते खराब होऊ नयेत म्हणून कोणती काळजी घ्यायला हवी हे जाणून घेऊया. (If milk boils too late, why does it burst? Learn how to keep milk from spoiling)

‘या’ तापमानात दूध लवकर फुटत नाही

घरी आणलेले दूध उकळण्यास उशीर झाल्यास ते फुटते, परंतु असे का होते? दूध फुटण्यामागचे कारण जाणून घेण्यापूर्वी आपल्याला हे माहित असले पाहिजे की दूध नेहमीच 20 ते 25 अंश इतक्या तापमानात खराब होण्याची चिन्हे अधिक असतात. जर घरात ठेवलेले दूध जास्त वेळ उकळलेले नसेल तर काही तासांत ते फुटते. जर दुधाचा वापर बराच काळ करायचा असेल तर प्रत्येक 4-5 तासांच्या अंतराने ते उकळवावे किंवा ते फ्रीजमध्ये ठेवावे. जास्त तापमान आणि कमी तापमानात ठेवलेले दूध लवकर फुटत नाही.

प्रथिने कणांमधील अंतरामुळे, दूध अखंड राहते

तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की दूध फुटणे अर्थात खराब होणे हे त्या दुधाच्या शुद्धतेची ओळख आहे. दूध भेसळयुक्त असेल तर ते लवकर फुटत नाही. शुद्ध दूध अनेक गोष्टींनी बनलेले आहे. त्यात चरबी, प्रथिने आणि साखर असते. दुधामधील प्रथिने कोलोइडल सोल्यूशनमध्ये निलंबित केले जातात. प्रथिनाचे लहान-लहान कण दुधात तरंगतात व एकमेकांपासून अंतर ठेवतात. दुधामध्ये असलेल्या प्रथिनाच्या कणांमधील हे अंतर दुधाला फुटण्यापासून वाचवते. परंतु जेव्हा दूध उकळत नाही किंवा बराच काळ फ्रीजमध्ये ठेवत नाही तर त्यावेळी दुधाची पीएच पातळी कमी होऊ लागते.

पीएच पातळी कमी झाल्यावर दुध फुटते

दुधाची पीएच पातळी जसजशी कमी होत जाते, तसतसे प्रथिने कण एकमेकांच्या जवळ येऊ लागतात. कोणत्याही पदार्थाची पीएच पातळी कमी व्हायला लागते, त्यावेळी ते आम्लपित्त होते. त्याचप्रमाणे जेव्हा दुधाची पीएच पातळी कमी होण्यास सुरुवात होते, तेव्हा तेसुद्धा आम्लपित्त होऊ लागते. त्यामुळे दूध फुटते. (If milk boils too late, why does it burst? Learn how to keep milk from spoiling)

इतर बातम्या

Video | वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे स्कॉर्पिओचा भीषण अपघात, व्हिडीओ एकदा पाहाच

Modi Cabinet Reshuffle : ‘हे येरागबाळ्याचं काम नाही’, नारायण राणेंच्या शपथविधीनंतर राणे पुत्रांची पहिली प्रतिक्रिया

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.