AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दूध उकळायला उशीर झाला तर ते का फुटते; जाणून घ्या दूध खराब होण्यामागील कारणे

दूध फुटण्यामागचे कारण जाणून घेण्यापूर्वी आपल्याला हे माहित असले पाहिजे की दूध नेहमीच 20 ते 25 अंश इतक्या तापमानात खराब होण्याची चिन्हे अधिक असतात. (If milk boils too late, why does it burst? Learn how to keep milk from spoiling)

दूध उकळायला उशीर झाला तर ते का फुटते; जाणून घ्या दूध खराब होण्यामागील कारणे
दूध उकळायला उशीर झाला तर ते का फुटते; जाणून घ्या दूध खराब होण्यामागील कारणे
| Updated on: Jul 07, 2021 | 6:55 PM
Share

मुंबई : दूध आपल्या सर्वांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. रोजच्या जीवनात आपण दुधाचे सेवन करतो. दुधाव्यतिरिक्त आपण दुधापासून तयार होत असलेले दही, लोणी, तूप, ताक, लस्सी, चीज, पनीर, आईस्क्रीम, क्रीम इत्यादी पदार्थही मोठ्या प्रमाणात वापरतो. उन्हाळ्याच्या काळात दूध खराब होण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे आपण खबरदारी म्हणून उन्हाळ्यात दिवसातून किमान 3-4 वेळा दूध उकळत असतो. याशिवाय पुढील काही दिवसांमध्ये दूध वापरण्यासाठी ते फ्रीजमध्ये ठेवतो. त्याचप्रमाणे दुधापासून बनवलेल्या इतर वस्तूही खराब होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवल्या जातात. तथापि, तूप आणि लोणी आपण सर्वसाधारण तापमानात ठेवू शकतो. ते सहसा खराब होत नाही. उन्हाळ्याच्या दिवसांत दूध व दुधापासून तयार होणारे इतर दुग्धजन्य पदार्थ का खराब होतात, ते खराब होऊ नयेत म्हणून कोणती काळजी घ्यायला हवी हे जाणून घेऊया. (If milk boils too late, why does it burst? Learn how to keep milk from spoiling)

‘या’ तापमानात दूध लवकर फुटत नाही

घरी आणलेले दूध उकळण्यास उशीर झाल्यास ते फुटते, परंतु असे का होते? दूध फुटण्यामागचे कारण जाणून घेण्यापूर्वी आपल्याला हे माहित असले पाहिजे की दूध नेहमीच 20 ते 25 अंश इतक्या तापमानात खराब होण्याची चिन्हे अधिक असतात. जर घरात ठेवलेले दूध जास्त वेळ उकळलेले नसेल तर काही तासांत ते फुटते. जर दुधाचा वापर बराच काळ करायचा असेल तर प्रत्येक 4-5 तासांच्या अंतराने ते उकळवावे किंवा ते फ्रीजमध्ये ठेवावे. जास्त तापमान आणि कमी तापमानात ठेवलेले दूध लवकर फुटत नाही.

प्रथिने कणांमधील अंतरामुळे, दूध अखंड राहते

तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की दूध फुटणे अर्थात खराब होणे हे त्या दुधाच्या शुद्धतेची ओळख आहे. दूध भेसळयुक्त असेल तर ते लवकर फुटत नाही. शुद्ध दूध अनेक गोष्टींनी बनलेले आहे. त्यात चरबी, प्रथिने आणि साखर असते. दुधामधील प्रथिने कोलोइडल सोल्यूशनमध्ये निलंबित केले जातात. प्रथिनाचे लहान-लहान कण दुधात तरंगतात व एकमेकांपासून अंतर ठेवतात. दुधामध्ये असलेल्या प्रथिनाच्या कणांमधील हे अंतर दुधाला फुटण्यापासून वाचवते. परंतु जेव्हा दूध उकळत नाही किंवा बराच काळ फ्रीजमध्ये ठेवत नाही तर त्यावेळी दुधाची पीएच पातळी कमी होऊ लागते.

पीएच पातळी कमी झाल्यावर दुध फुटते

दुधाची पीएच पातळी जसजशी कमी होत जाते, तसतसे प्रथिने कण एकमेकांच्या जवळ येऊ लागतात. कोणत्याही पदार्थाची पीएच पातळी कमी व्हायला लागते, त्यावेळी ते आम्लपित्त होते. त्याचप्रमाणे जेव्हा दुधाची पीएच पातळी कमी होण्यास सुरुवात होते, तेव्हा तेसुद्धा आम्लपित्त होऊ लागते. त्यामुळे दूध फुटते. (If milk boils too late, why does it burst? Learn how to keep milk from spoiling)

इतर बातम्या

Video | वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे स्कॉर्पिओचा भीषण अपघात, व्हिडीओ एकदा पाहाच

Modi Cabinet Reshuffle : ‘हे येरागबाळ्याचं काम नाही’, नारायण राणेंच्या शपथविधीनंतर राणे पुत्रांची पहिली प्रतिक्रिया

Follow Us
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग.....
नाशिक धर्मांतर प्रकरणात मोठी घडामोड! धर्मांतर, हिजाब ट्रेनिंग......
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री
अखेर ठरलं! हा नेता होणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री.
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?
तामिळनाडूत राजकीय खळबळ! थलपती विजय सरकार स्थापनेच्या उंबरठ्यावर?.
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?
मी पालकमंत्र्यांना काडीमात्र भाव देत नाही, पालकमंत्री पोलीस आहेत का?.
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?
TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान गरोदर?.
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी
निदा खान प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट... एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी.
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा..
नाशिक TCS प्रकरणातील मास्टरमाईंडला बेड्या; 42 दिवस पोलिसांना गुंगारा...
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट....
जय पवारांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्विस्ट.....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय....
बदलापूरनंतर गोवंडीत संतापजनक घटना; शाळेतील शिपायाकडून 6 वर्षीय.....
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के
दहावीच्या निकालात कोकण विभाग पुन्हा अव्वल; राज्याचा निकाल 92.09 टक्के.