AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक नवरी अन् 2 नवरदेव, ‘या’ राज्यात आहे बहुपतित्वाची हैराण करणारी परंपरा

लग्न हे एक पवित्र बंधन मानले जाते, जिथे सात फेऱ्यांनंतर एका नवीन व्यक्तीसोबत नवे आयुष्य सुरू होते. पण तुम्ही कधी एकाच मंडपात एका वधूसोबत दोन वरांना फेरे घेताना ऐकले आहे का? ही केवळ एक कथा नाही, तर सत्य आहे! नेमकं काय घडलं, हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख वाचा.

एक नवरी अन् 2 नवरदेव, 'या' राज्यात आहे बहुपतित्वाची हैराण करणारी परंपरा
Hatti CommunityImage Credit source: Meta AI
| Edited By: | Updated on: Aug 01, 2025 | 10:37 PM
Share

‘जोड्या स्वर्गात जुळतात’ असं म्हणतात आणि आयुष्यात एकदाच, एकाच जोडीदारासोबत लग्न होतं, ही आपल्याकडची पारंपरिक विचारसरणी. पण हिमाचल प्रदेशातील एका गावात जे घडलंय, ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल. इथे एका मुलीने एकाच वेळी दोन भावांशी लग्न केलंय! ही काही कथा नाही, तर ही सत्यकथा सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय.

हिमाचलच्या सिरमौर जिल्ह्यातील शिलाई गावातील ‘हट्टी’ जमातीतील सुनीता चौहान हिने प्रदीप आणि कपिल नेगी या सख्ख्या भावांशी विवाह केला. त्यांच्या लग्नाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर जगभरात ही चर्चा सुरु झाली. त्यांच्या जमातीत या परंपरेला ‘जोडीदारा’ म्हणतात, जी खूप जुनी आहे. हे लग्न ‘पॉलीअँड्री’ (Polyandry) म्हणजे एका स्त्रीला एकापेक्षा जास्त पती असणे. याउलट, एका पुरुषाला अनेक पत्नी असण्याला ‘पॉलीगिनी’ (Polygyny) म्हणतात. पण, नात्यांच्या आणि समाजाच्या दृष्टीने अशी लग्नं खरंच योग्य आहेत का?

अनोख्या नात्याचे दोन पैलू: फायदा की आव्हान?

रिलेशनशिप तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही नात्याप्रमाणेच ‘पॉलीअँड्री’ विवाहाचेही सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही पैलू आहेत.

या नात्याचे फायदे

संपत्तीचे विभाजन : ज्या महिला एकापेक्षा जास्त भावांशी लग्न करतात (याला ‘भ्रातृ बहुपतित्व’ म्हणतात), तिथे भावांमध्ये जमिनीचे किंवा इतर संपत्तीचे वाटप होत नाही. यामुळे कुटुंबात फूट पडत नाही आणि एकत्र कुटुंब पद्धती टिकून राहते.

कुटुंबातील एकता व परंपरा: आजकाल जिथे एकल कुटुंबांची संख्या वाढतेय, तिथे अशी लग्नं एकत्र राहण्याला प्रोत्साहन देतात. कुटुंबाच्या जुन्या परंपरा, रीती-रिवाज जपले जातात आणि मुलांना कौटुंबिक मूल्यांचे महत्त्व कळते.

सुरक्षिततेची भावना: पत्नीला कधीही कशाचीही कमतरता जाणवत नाही. तिच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तिला एकाच व्यक्तीवर अवलंबून राहावे लागत नाही, ज्यामुळे तिला सुरक्षित आणि निश्चिंत वाटते.

संतुलन आणि आधार: जर कुटुंबात योग्य संतुलन आणि सामंजस्य असेल, तर घरात एकता टिकून राहते आणि सर्वजण एकमेकांना आधार देतात.

या नात्यातील नकारात्मक बाजू :

पत्नीसाठी कसोटी: ज्या स्त्रीला एकापेक्षा जास्त पती असतात, तिच्यासाठी हे नाते सांभाळणे एक मोठी कसोटी असते. तिला सर्वांशी प्रामाणिक राहावे लागते, प्रत्येकाशी योग्य संवाद साधावा लागतो आणि नात्यात पारदर्शकता (Transparency) ठेवावी लागते.

भावनिक संतुलन: पत्नीला आपल्या सर्व पतींना समान महत्त्व द्यावे लागते. जर तिने एकाला जास्त महत्त्व दिले, तर इतरांना मत्सर (Jealousy) किंवा असुरक्षितता (Insecurity) वाटू शकते.

लक्ष मिळवण्याची स्पर्धा: अशा नात्यांमध्ये पार्टनरचे लक्ष मिळवण्यासाठी (Attention) भावांमध्ये स्पर्धा निर्माण होऊ शकते. यामुळे भावनिक असंतुलन बिघडू शकते.

भिन्न अपेक्षा: एकाच पत्नीकडून अनेक पतींच्या वेगवेगळ्या अपेक्षा असू शकतात, ज्यामुळे सर्वांना एकाच वेळी आनंदी ठेवणे कठीण होते. एखादा पार्टनर दुर्लक्षित झाल्यासारखे वाटू शकते.

गैरसमज आणि टिकाऊपणा: जर नात्यात योग्य तालमेल बसला नाही आणि स्पष्टता नसेल, तर गैरसमज वाढतात. त्यामुळे अशी नाती दीर्घकाळ टिकवणे खूप कठीण होते, कारण सर्वांना समान आदर आणि महत्त्व मिळणे आवश्यक असते.

थोडक्यात, ‘पॉलीअँड्री’ विवाह ही एक विशिष्ट समुदायातील जुनी परंपरा असली तरी, आजच्या आधुनिक काळात अशी नाती टिकवण्यासाठी प्रचंड समजूतदारपणा, प्रामाणिकपणा आणि सर्व भागीदारांमध्ये समान आदर असणे अत्यंत आवश्यक आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.