.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात कोव्हिडबाबत 2 लाख 70 हजार गुन्हे, तर 28 कोटी 51 लाख रुपयांचा दंड : अनिल देशमुख

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु झाल्यापासून नियमांचं पालन न करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे (Corona Lockdown restriction violation Crime register in Maharashtra).

राज्यात कोव्हिडबाबत 2 लाख 70 हजार गुन्हे, तर 28 कोटी 51 लाख रुपयांचा दंड : अनिल देशमुख
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Sep 28, 2020 | 7:34 PM
Share

मुंबई : राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु झाल्यापासून नियमांचं पालन न करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे (Corona Lockdown restriction violation Crime register in Maharashtra). आतापर्यंत कलम 188 नुसार 2 लाख 70 हजार गुन्हे दाखल झाले आहेत. या काळात 1347 वाहनांवर अवैध वाहतूकीचे गुन्हे दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून 28 कोटी 51 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

राज्यात 22 मार्च ते 27 सप्टेंबरपर्यंत कलम 188 नुसार 2 लाख 70 हजार 995 गुन्हे नोंद झाले आहेत. या अंतर्गत 37,044 व्यक्तींना अटक करण्यात आली. 96,430 वाहने जप्त करण्यात आले. यातील विविध गुन्हांसाठी 28 कोटी 51 लाख 62 हजार 564 रुपये दंड आकारण्यात आला. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आले आहेत, अशीही माहिती अनिल देशमुख यांनी दिली.

या दरम्यान पोलिसांवर हल्ला होण्याच्या 364 घटना घडल्या. त्यात 895 व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले असून पुढील कारवाई सुरु आहे. या काळात 100 नंबरवर 1 लाख 13 हजार फोन आले. पोलीस विभागाचा 100 नंबर हा सर्व जिल्ह्यांमध्ये 24 तास कार्यरत आहे. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर 1 लाख 13 हजार 335 फोन आले. त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1347 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच 96 हजार 430 वाहने जप्त करण्यात आली.

पोलीस कोरोना कक्ष

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नात दुर्दैवाने राज्यातील 220 पोलीस आणि 25 अधिकारी अशा एकूण 245 पोलीस कर्मचारी/अधिकारी बांधवांचा मृत्यू झाला. पोलिसांना कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आल्यानंतर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत यासाठी राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग अपेक्षित आहे. यात शारीरिक अंतर पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. सर्वांनी नियम पाळून सहकार्य करावे, असंही आवाहन यावेळी गृहमंत्र्यांनी केलं.

हेही वाचा :

गुप्तेश्वर पांडे DGP होते, मात्र भाजप नेत्यासारखे बोलायचे, अनिल देशमुखांचा हल्लाबोल

ठाकरे सरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आयपीएस अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली?, भाजपचा गृहमंत्र्यांना सवाल

सरकार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांना अटक करा, नावं जाहीर करा : प्रकाश आंबेडकर

व्हिडीओ पाहा :

Corona Lockdown restriction violation Crime register in Maharashtra

Follow Us
ऑपरेशन टायगरचा आणखी एक मोठा वार! ठाकरेंचा बडा नेता शिंदेंकडून मैदानात
मोठी बातमी! ऑपरेशन टायगरचा आणखी एक मोठा वार! ठाकरे गटाचा बडा नेता शिंदेंच्या सेनेकडून मैदानात
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची फडणवीसांसोबत भेट
राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट! ओमराजे निंबाळकरांची फडणवीसांसोबत भेट; तासभर झालेल्या चर्चेत असं काय घडलं?
रावणानेही दानपेट्या लुटल्या नाहीत, पण रामभक्तांनी...
Sanjay Raut Full Press | रावणानेही दानपेट्या लुटल्या नाहीत, पण रामभक्तांनी...; संजय राऊतांचा भाजपवर जिव्हारी लागणारा वार!
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शरद पवार गटाचं...
एक गट इकडे म्हणतंय तर दुसरं तिकडे; राष्ट्रवादी शरद पवार गटाचं विलीनीकरण... नेमकं काय घडतंय?
टीईटी पेपरफुटीमधील मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला पाटणातून अटक
TET Paper Leak |  ठाणे पोलिसांची कारवाई; टीईटी पेपरफुटीमधील मुख्य सूत्रधाराच्या पत्नीला पाटणातून अटक
शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली; कोणाला मिळणार उपसभापती पद? बड्या
Vidhan Parishad | शिवसेना शिंदे गटात मोठ्या हालचाली; कोणाला मिळणार उपसभापती पद? बड्या नेत्यांची नावे...
शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले...
ब्रेकिंग! शिंदे गटातील दोन प्रमुख नेते मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले; वर्षा बंगल्यावर नेमकं काय शिजलं?
अमरावतीत पावसाचा हाहाकार! मेघा नदीला पूर; चांदूर बाजारातील...
Amravati Rain | अमरावतीत पावसाचा हाहाकार! मेघा नदीला पूर; चांदूर बाजारातील आठवडी बाजारात शिरले पाणी
APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर
Navi Mumbai Rain | APMC मार्केटमध्ये पाणीच पाणी, पहाटेपासून मुसळधार पावसाचा कहर; वाहतूक विस्कळीत
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा