AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तेलकट केसांमुळे त्रस्त आहात? मग, आजच ‘हे’ घरगुती उपाय नक्की ट्राय करा…

उन्हाळ्यात तेलकट केसांची समस्या सामान्य आहे. यामुळे केसांमध्ये चिकटपणा येतो. वारंवार केस धुवूनही ही समस्या संपण्याचे नाव घेत नाही.

तेलकट केसांमुळे त्रस्त आहात? मग, आजच 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा…
नारळाचे दूध आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर असते. अर्धा कप नारळाचे दूध घ्या आणि त्यात दोन चमचे मध मिक्स करा. त्यानंतर ही पेस्ट आपल्या केसांना लावा. वीस ते तीस मिनिटांनंतर आपले केस थंड पाण्याने धुवा. (टीप : औषध म्हणून वापरण्यासाठी किंवा कोणत्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)
| Edited By: Anish Bendre | Updated on: Apr 06, 2021 | 9:48 AM
Share

मुंबई : उन्हाळ्यात तेलकट केसांची समस्या सामान्य आहे. यामुळे केसांमध्ये चिकटपणा येतो. वारंवार केस धुवूनही ही समस्या संपण्याचे नाव घेत नाही. विशेष म्हणजे लांबसडक केस दररोज धुणे देखील शक्य नसते. केस तेलकट झाल्यामुळे केसांमध्ये कोंड्याची समस्या आणि खाज देखील सुटते. केसांचा तेलकटपणा घालवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे तुमच्या केसांचा तेलकटपणा कमी होईल. (If you suffer from oily hair, try this home remedy)

-एक कप पाण्यात एक लिंबू मिसळा आणि केसांच्या मुळांवर हळूवारपणे लावा. सुमारे 15 मिनिटांनंतर शॅम्पूने केस धुवा आणि स्वच्छ करा. आठवड्यातून किमान दोनदा हे करा. याशिवाय तेलकट केसांच्या समस्येसोबतच डोक्यातील कोंडाची समस्या सुटेल.

-दोन चमचे एलोवेरा जेल घ्या आणि त्यात एक चमचा लिंबाचा रस मिसळा. आता हे एक कप पाण्यात चांगले मिसळा आणि केसांमध्ये हलक्या हातांनी मालिश करा. यानंतर थंड पाण्याने केस धुवा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा असे केल्याने मोठे बदल होतील.

-एका वाटीत कोमट नारळ तेल घालून त्यात कापूराचा तुकडा मिसळा. हातांनी केसांची मालिश करा. हे तेल सुमारे एक तास आपल्या केसांवर ठेवा. यानंतर केस शॅम्पूने धुवा. आठवड्यातून दोनदा असे केल्याने खूप फायदा होईल.

-रात्री झोपण्यापूर्वी टाळूची मालिश करणे खूप महत्वाचे आहे. असे केल्याने केसांच्या टाळूमध्ये रक्त परिसंचरण सुरू होईल. हे आपले केस निरोगी आणि जाड बनवेल. केसांमध्ये बोटांनी मसाज करणे खूप फायदेशीर आहे. याशिवाय, तुम्ही शैम्पू करण्याच्या 2 तास आधी गरम तेलाने मालिश केली पाहिजे. असे केल्याने केस निरोगी, जाड आणि लांब होते.

-एक वाटी दह्यामध्ये एक लिंबू टाका आणि केसांना लावा. एक तासानंतर केस धुवा.

संबंधित बातम्या : 

सावधान! अपुरी झोप स्त्रियांसाठी घातक, कर्करोगासह ‘या’ गंभीर समस्यांना ठरेल कारणीभूत…

Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता

(If you suffer from oily hair, try this home remedy)

Follow Us
एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
Viral Video | एका हाताने पोलिस व्हॅन रोखली! मुंबईच्या तरुणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत...
मंत्रीपदासाठी थेट पक्षच बदलता येत नाही; CM फडणवीसांचं नाव घेत शिंदेंचा नेता स्पष्टच म्हणाला
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी..
MPSC कडून निवड पद्धतीत मोठा बदल, आता अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होण्याआधी...काय बदलणार?
राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही....
Devendra Fadnavis| राहुल गांधींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं थेट आव्हान, तुम्ही पळकुटेपणा...
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची...
Sharad Pawar | विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर लक्ष द्यायला हवं! शरद पवारांची पंतप्रधान मोदींना थेट विनंती
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं..
लंचपर्यंत निर्णय नाही तर... 16 मेट्रो स्टेशन्स बंदबाबत न्यायाधीशांचं मोठं विधान
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद,
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र बंदला अनेक शहरांतून मोठा प्रतिसाद, व्हिडीओ आले समोर
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन
50 ग्रॅमची पावडर टाकेन.. आंदोलकाला धमकी देणाऱ्या पोलिसाचं अखेर निलंबन; व्हिडिओ व्हायरल
आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
Uddhav Thackeray | आंदोलन मोडायला पाकिस्तानातून गुंड आणलेत का? उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरे...
त्यालाच जंतर मंतर म्हणतात; दोन बड्या नेत्यांच्या भेटीबाबत राज ठाकरेंचं विधान तुफान चर्चेत