AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Summer Light Meal | उन्हाळ्याच्या दिवसांत या हेल्दी आणि हलक्या पदार्थांचा आहारात करा समावेश

उन्हाळ्यात जास्त तेलकट पदार्थ खाणे टाळा. तेलकट खाण्यामुळे तुमच्या शरिरात पचनक्रियेसंबंधी समस्या उद्भवू शकतात. (Include these healthy and light foods in your diet on hot days)

Summer Light Meal | उन्हाळ्याच्या दिवसांत या हेल्दी आणि हलक्या पदार्थांचा आहारात करा समावेश
रमीच्या दिवसांत या हेल्दी आणि हलक्या पदार्थांचा आहारात करा समावेश
| Edited By: | Updated on: May 17, 2021 | 7:48 AM
Share

मुंबई : सध्या उन्हाळा सुरु आहे. आपली पचनक्रिया ठिक ठेवण्यासाठी आपल्याला गरमीच्या दिवसात संतुलित आहार घ्यायला हवा. अधिक तिखट खाणे किंवा गरम पडणारा पदार्थ खाणे शरिराला त्रासदायी असते. गरमीमध्ये आपण अशाप्रकारचे फूड आणि ड्रिंक्स डायटमध्ये सामील करू शकता, जे आपल्या शरिराला थंडावा देऊ शकतील. उन्हाळ्यात जास्त तेलकट पदार्थ खाणे टाळा. तेलकट खाण्यामुळे तुमच्या शरिरात पचनक्रियेसंबंधी समस्या उद्भवू शकतात. (Include these healthy and light foods in your diet on hot days)

दूधी वडी भाजी

गरमीच्या दिवसांत लोक अधिक प्रमाणात दूधीचे सेवन करतात. यामध्ये पुरेशी पोषक तत्त्वे असतात. दूधीची भाजी, रायता, हलवा बनवून तुम्ही तुमच्या आहारात समावेश करू शकता. याशिवाय तुम्हाला दूधी वडी सब्जी तयार करता येईल. दूधी आणि डाळची वडी, हिरवी मिरची, हिंग, टोमॅटो, आले, कांदा, लाल मिरची, हळद पावडर, मीठ आणि कोथिंबीर आदी मसाल्यांपासून दूधी वडी भाजी तयार केली जाते. तुम्ही भाकरीसोबतही भाजी खाऊ शकता. उत्तर भारतात ही डिश अत्यंत लोकप्रिय आहे. ही डिश खूप हलकी आणि आरोग्यदायी आहे.

इमली भात

गरमीच्या दिवसांत लोक आंबट खाण्यावर अधिक भर देतात. अशा लोकांसाठी इमली भाताची डिश सर्वोत्तम पर्याय आहे. चिंचेची ग्रेव्ही, उकडलेले तांदूळ, मूंगफळी, कडीपत्ता, चणाडाळ आदीपासून ही डिश तयार केली जाते. ही एक साऊथ इंडियन डिश आहे. दक्षिण भारतात या डिशला पुलिहोरा नावाने ओळखले जाते व तितक्याच अधिक प्रमाणावर दक्षिण भारतात या डिशला पसंती दिली जाते. पचनाच्या दृष्टीने ही अत्यंत हलकी डिश असून गरमीच्या दिवसांत या डिशचा अवश्य लाभ घ्या.

कच्चा आंब्याची डाळ

गरमीच्या दिवसांत आपण विविध प्रकारे आंब्याचा उपयोग केला जातो. आंब्यापासून अनेक प्रकारच्या रेसिपिज बनतात. पश्चिम बंगालमध्ये डाळ आणि आंबा एकसाथ शिजायला ठेवले जातात. याला कच्चा आंब्याची डाळ म्हणतात. ही डिश मसूर डाळ, कच्चा आंबा, सरस, मीठ, मोहरी, साखर आणि लाल मिरचीपासून तयार केली जाते. स्टीम राईसबरोबर या डाळीचे सेवन केले जाते. या डाळीचा स्वाद आंबट-गोड अशा संमिश्र चवीचा असतो.

टोमॅटो सार

ही एक महाराष्ट्रीयन डिश आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत महाराष्ट्रीयन कुटुंबांमध्ये सर्रास टोमॅटोचा सार बनवला जातो. टोमॅटो पुरी आणि मसाल्यांपासून ही डिश बनवली जाते. भातावर टोमॅटो सार खाल्ल्यास उन्हाळ्यात ते जेवण सहज पचते. अत्यंत हलके आणि चविष्ठ रेसिपी म्हणून टोमॅटो सारकडे पाहिले जाते. (Include these healthy and light foods in your diet on hot days)

इतर बातम्या

Video | हवामानाची माहिती देताना भलतंच घडलं, महिला अँकरचा व्हिडीओ पाहून लोकांच्या भन्नाट कमेंट्स

सावधान! चुकूनही ‘हे’ CoWIN अ‍ॅप डाऊनलोड करु नका! अन्यथा डेटा हॅक होईल

Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.