AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मानव विरुद्ध वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी AI तंत्रज्ञानाची मदत, जंगलांमध्ये 900 कॅमेरे लावले जाणार

वाघांची संख्या वाढल्याने जंगली भागात अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यावर उपाय म्हणून AI बेस तंत्रज्ञयुक्त 900 कॅमेरे व्याघ्र प्रकल्पात लावले जाणार आहेत.

मानव विरुद्ध वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी AI तंत्रज्ञानाची मदत, जंगलांमध्ये 900 कॅमेरे लावले जाणार
Tiger
| Edited By: | Updated on: Jul 12, 2025 | 4:18 PM
Share

राज्यात मानव विरुद्ध वन्यजीव हा संघर्ष टोकाला गेला आहे. वाघांची संख्या वाढल्याने जंगली भागात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. यावर उपाय म्हणून राज्यातील व्याघ्र प्रकल्पात AI बेस तंत्रज्ञयुक्त 900 कॅमेरे व्याघ्र प्रकल्पात लावले जाणार आहेत. यासाठी मार्वल कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांच्या उपस्थितीत हा करार झाला. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

जंगलात 900 कॅमेरे लावणार – बावनकुळे

याबाबत बोलताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले की, आपण जगातील आधुनिक घेत आहोत. आता 900 ठिकाणी कॅमेरे लावले जाणार आहेत. तसेच 900 ठिकाणी अलार्म असतील, ताडोबापासून ते नवेगाव बांध पर्यंत सर्वच फॉरेस्ट एरियात हे कॅमेरे असणार आहेत. जेव्हा एखादा वाघ किंवा बिबट्या गावाकडे किंवा खाजगी जाता दिसेल तेव्हा हे कॅमेरे त्यांना डिटेक्ट करतील आणि तात्काळ गावातील अलार्म वाजेल.

या तंत्रज्ञानामुळे लोकांचा जीव वाचणार – बावनकुळे

पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले की, ‘गेल्या काही वर्षांमध्ये वाघांचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे गावाकडे वाघ येत आहेत. गेल्या काही काळात वाघाने अचानक हल्ला केल्याने काही लोकांचा जीव गेलेला आहे. ही टेक्नॉलॉजी लोकांचा जीव वाचवण्याकरिता आहे. हे तंत्रज्ञान जंगलात वापरले गेले तर मोठ्या प्रमाणात जीवहानी कमी होईल.’

शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणार

चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढे बोलताना सांगितले की, ‘जंगलाला लागून असलेली शेतकऱ्यांची जमीन वन्य प्राण्यांमुळे पडीक पडलेली आहे. अशा शेतकऱ्यांना सरकार दरवर्षी 50 हजार रुपये एकरी तीस वर्षांसाठी भाडे देणार आहे. या जमिनीवर वनविभाग सोलार प्रकल्प, बांबू लागवडीचे प्रकल्प, ग्रासलँड डेव्हलप करणार आहे.’

आशिष जैस्वाल काय म्हणाले?

याबाबत बोलताना राज्यमंत्री आशिष जैस्वाल म्हणाले की, ‘या तंत्रज्ञानमुळे जंगल परिसरात वाघ किंवा बिबट्यांचा आवाज आला तर वन विभागाला अलर्ट पाठवा जाणार आहे, यामुळे गावकऱ्यांना सावध करता येणार आहे. यामुळे जीवितहानी कमी होईल.’ पुढे बोलताना जैस्वाल यांनी म्हटले की, ‘वन्य प्राण्यांमुळे पडीक असलेली जंगल परिसरातील जमिन वन विभाग भाड्याने घेणार आहे, यासाठी शेतकऱ्यांना चांगले पैसे दिले जाणार आहेत.’

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.