AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार यांच्याकडून पहिल्या उमेदवाराची घोषणा, महायुतीच्या जागावाटपावर मोठं वक्तव्य

महायुतीच्या जागावाटपावर तिढा कधी सुटेल? हा प्रश्न सध्या चर्चेला कारण ठरला आहे. कारण गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठका पार पडत आहे. महायुतीचे नेते जागावाटप ठरवण्यासाठी दिल्लीलादेखील बैठकीला जावून आले आहेत. त्यानंतर आज अजित पवारांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे अजित पवारांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षाच्या पहिल्या उमेदवाराचीदेखील घोषणा केली आहे. अजित पवार गटाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली.

अजित पवार यांच्याकडून पहिल्या उमेदवाराची घोषणा, महायुतीच्या जागावाटपावर मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून महत्त्वाची घोषणा
| Updated on: Mar 26, 2024 | 3:06 PM
Share

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आपल्या पक्षाच्या आमदार आणि खासदारांसोबत एकत्रित बैठक घेतली. या बैठकीनंतर अजित पवारांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा केली. रायगडमधून खासदार सुनील तटकरे हे उमेदवार असतील, असं त्यांनी जाहीर केलं. विशेष म्हणजे शिवसेना नेते शिवाजी आढळराव पाटील यांचा आज संध्याकाळी पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होईल, असं त्यांनी जाहीर केलं. तसेच आढळराव पाटील यांच्या पक्षप्रवेशानंतर शिरुरच्या जागेच्या उमेदवाराची घोषणा करु, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं. अजित पवार यांनी यावेळी महायुतीच्या जागावाटपाबाबतही महत्त्वाची माहिती दिली.

“आम्ही एकत्रपणे चर्चा करुन जवळपास महायुतीच्या 48 जागांबद्दल महाराष्ट्रात कुणी कोणत्या जागा लढवायच्या त्याबद्दल ठरवलं आहे. जवळपास 99 टक्के काम पूर्ण केलेलं आहे. फक्त आमचं ठरलं आहे की, 28 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्रितपणे बसून मुंबईला पत्रकार परिषद घेऊ. आता पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील उमेदवार जाहीर करणं क्रमप्राप्त होतं. वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले आहेत”, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवारांकडून लोकसभेच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा

“मी आज पहिल्यांदा रायगड लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उमेदवार जाहीर करतो. सुनील तटकरे तिथे महायुतीचे उमेदवार असतील. यामध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष, तसेच रामदास आठवले, कवाडे, सदाशिव खोत, रासपचे महादेव जानकर, विनायक गोरे, सचिन असे सगळे सहकारी मिळून आम्ही महाराष्ट्रातील 48 जागा लढवत आहोत. काहींनी फॉर्म भरले आहेत. विदर्भात पहिल्या टप्प्यात निवडणुका आहेत. इतर जागांबाबत 28 तारखेला माहिती देईन”, असं अजित पवारांनी स्पष्ट केलं.

‘आढळराव पाटील यांचा पुन्हा पक्षप्रवेश होईल’

“आम्ही थोड्या वेळात आंबेगाव जाणार आहोत. आंबेगावात शिवाजी आढळराव पाटील जे 20 वर्षांपूर्वी आपल्या पक्षातून शिवसेनेत गेले होते. त्यांना आम्ही पुन्हा पक्षप्रवेश देत आहोत. तो पक्षप्रवेश दिल्यानंतर दुसरी जागा मी तिथे पक्षप्रवेश झाल्यानंतर जाहीर करने. त्यानंतर 28 तारखेला महायुतीच्या जागावाटपाबबात माहिती दिली जाईल. पाच वर्षांपूर्वी आम्ही आघाडीच्या बाजूने लढलो. तर देवेंद्रे फडणवीस, शिवसेना महायुती म्हणून लढले. त्यावेळी भाजप 23, शिवसेना 18, राष्ट्रवादी 4, काँग्रेस, नवनीत राणा 1, राणांना आम्ही पुरस्कृत केलं होतं, त्या निवडून आल्या होत्या. तर एमआयएमची 1 जागा छत्रपती संभाजीनगरमधून निवडून आल्या होत्या”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.