AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aurangabad | औरंगाबादेत पाणी प्रश्नावरून नागरिक संतप्त, ज्वलनशील पदार्थ अंगावर घेऊन पेटवून घेण्याचा प्रयत्न

शहरातील आंबेडकर नगर परिसरातील पाण्याच्या टाकीच्या परिसरात झालेल्या आंदोलनात एका नागरिकाने स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि नागरिकांमध्ये झटापट झाली.

Aurangabad | औरंगाबादेत पाणी प्रश्नावरून नागरिक संतप्त, ज्वलनशील पदार्थ अंगावर घेऊन पेटवून घेण्याचा प्रयत्न
Image Credit source: tv9 marathi
Reporter Datta Kanwate
Reporter Datta Kanwate | Edited By: मंजिरी धर्माधिकारी | Updated on: May 06, 2022 | 1:59 PM
Share

औरंगाबादः आठ दिवसांनी येणाऱ्या पाण्यावरून औरंगाबादचे नागरिक (Aurangabad citizens) पुन्हा एकदा संतप्त झाले. आज आंबेडकर नगर परिसरातील नागरिकांनी पाण्याच्या टाकीवर (Water tank ) हल्लाबोल केला. शहराला अनेक वर्षांपासून सात ते आठ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. उन्हाळ्यामुळे (Summer) आधीच तापमान वाढीचा त्रास आहे. त्यात महावितरण अघोषित लोडशेडिंग करत असल्यामुळे या पाणीपुरवठ्यातही अडथळे निर्माण होतात. त्यामुळे अनेक भागातील नागरिक संतप्त आहेत. अखेर हा ताण सहन न झाल्यानं शहरातील आंबेडकर नगर परिसरातील आज आंदोलन छेडलं. शहरातील नागरिकांनी एकत्र येत या परिसरातील पाण्याच्या टाकीवर आंदोलन केलं. त्यातच एका नागरिकाने अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेण्याचा प्रय्तन केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत

महापालिकेच्या नावानं घोषणाबाजी

शहरात अत्यंत विलंबाने होणाऱ्या पाणी वितरणाला कंटाळलेल्या नागरिकांनी आज आंदोलन केलं. यावेळी महापालिका आणि महावितरणच्या नावाने नागरिकांनी घोषणाबाजी केली. या आंदोलनात पुरुष आणि महिलांनीही सहभाग नोंदवला. काही महिलांनी या आंदोलनात रिकाम्या घागरी आणून स्थानिक प्रशासनाचा निषेध केला.

आंदोलक आणि पोलिसांत झटापट

शहरातील आंबेडकर नगर परिसरातील पाण्याच्या टाकीच्या परिसरात झालेल्या आंदोलनात एका नागरिकाने स्वतःच्या अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस आणि नागरिकांमध्ये झटापट झाली. पोलिसांनी या नागरिकाच्या हातातील ज्वलनशील पदार्थ हस्तगत करून आंदोलनकर्त्याला ताब्यात घेतलं आहे. शहरात मागील महिन्यातदेखील सिडको तसेच हाडको परिसरातील नागरिकांनी सकाळच्या वेळीच पाण्याच्या टाकीवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर या प्रश्नी मार्ग काढण्यासाठी महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय सक्रिय झाले असून त्यांनी शहराला आठ नव्हे तर किमान चार दिवसांनी तरी पाणी मिळावे, यासाठी उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे. यासंबंधीची प्रक्रिया लवकर कऱण्याच्या सूचनाही अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Follow Us
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
Zeeshan Siddique | झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी! थेट मुंबई आयुक्तांना फोन; फडणवीसांनाही दिली माहिती
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?