AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘महायुतीमध्ये सुरुवातीपासूनच महाभारत, महायुती 4 जूनला विखुरली जाणार’, नाना पटोलेंचा मोठा दावा

"महायुतीमध्ये सुरुवातीपासूनच महाभारत होत आहे. आताही आहे आणि ते आणखीनही वाढेल. नरेंद्र मोदींनी केंद्रीय तपास यंत्रणेच्या आधारवर देशाच्या अनेक राजकीय पक्षांना फोडून जी हालत केली, आणि त्यांच्याबरोबर गेलेल्यांची हालत 4 तारखेला बारा वाजेपर्यंत कळणार", असं नाना पटोले म्हणाले आहेत.

'महायुतीमध्ये सुरुवातीपासूनच महाभारत, महायुती 4 जूनला विखुरली जाणार', नाना पटोलेंचा मोठा दावा
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
| Updated on: May 21, 2024 | 9:02 PM
Share

“महायुतीमध्ये महाभारत सुरुवातीपासूनच होतं. आताही आहे आणि अजून ते वाढेल. 4 तारखेला जेव्हा निकाल येतील तर दुपारी बारा वाजेपर्यंत महायुती ही विखुरलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे”, असा मोठा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. “आम्ही मधल्या काळातही सांगत होतो की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अग्निविर योजना जी आखलेली आहे ती फक्त मिलिटरीमध्येच नाही तर राजकीय व्यवस्थांमध्ये सुद्धा आहे. त्यामुळे ना शहिदांचा दर्जा, ना पेन्शन अशी परिस्थिती अनेक राजकीय पक्षांची आहे. नरेंद्र मोदींनी केंद्रीय तपास यंत्रणेच्या आधारावर देशाच्या अनेक राजकीय पक्षांना फोडून ज्या पद्धतीने महायुती निर्माण केली, आणि जे त्यांच्याबरोबर गेले त्यांची हालत काय होणार आहे हे 4 तारखेला आपल्याला दुपारच्या 12 वाजेपर्यंत कळणार आहे”, असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.

भिवंडी येथील भाजप उमेदवार कपिल पाटील यांनी त्यांच्या मतदारसंघात बोगस मतदान झाल्याच आरोप केलाय. याच मुद्द्यावरुन त्यांची मतदान केंद्राबाहेर पोलिसासोबत बाचाबाची होत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिओवर नाना पटोले यांनी टीका केली आहे. “भाजपला सत्तेची मस्ती आहे, आणि ती मस्ती अजूनही उतरलेली नाही. लोकांचा कौल हा त्यांच्या विरोधात आहे. ते सत्तेच्या मस्तीमुळे पोलिसांनाही शिव्या घालायला मागेपुढे पाहत नाहीत, असे चित्र आपण पाहतो आहे”, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

पुण्याच्या घटनेवरुनही पटोलेंचा भाजपवर निशाणा

पुण्याच्या हिट अँड रन केसवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी भाजपवर सडकून टीका केली. “न्यायालयाच्या निर्णयाला आक्षेप घेण्याचे कुठलेही कारण नाही. पण राज्यात ज्याप्रमाणे कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे, आणि राज्याच्या सरकारने एक्साईज वाढवण्यासाठी दारूची दुकानं,‌ मोठ्या प्रमाणात ड्रग्स जो गुजरातमधून महाराष्ट्रात आणायची व्यवस्था केली. त्याचे परिणाम आपण पाहतोय”, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

“निरपराध लोकांचा जीव जातोय. पुण्यामध्ये एका श्रीमंत माणसाने नशेमध्ये दोन लोकांना चिरडून मारलं. अशी परंपरा महाराष्ट्रामध्ये कधीच नव्हती. पण भाजपच्या या भ्रष्टाचारी व्यवस्थेने जनतेला लुटण्याचं आणि व्यसनाधीन करण्याचं पापं केलं आहे. त्याचे परिणाम आपण पाहतोय आणि म्हणून पुण्यामध्ये एका श्रीमंत माणसाच्या गाडीखाली नशेमध्ये धुंद असलेल्या माणसाने निरपराध दोघांना चिरडून मारण्याचा पाप केलंय. त्यामुळे पोलिसांपेक्षा महाराष्ट्र सरकारचा जास्त दोष आहे. म्हणून या सरकारलाच आता सत्तेतून बाहेर काढा”, अशी भूमिका जनतेच्या मनात आहे.

“सत्तेमध्ये काहीही करू शकतात. निरपराध लोकांना फाशीवर चढवू शकतात. अनेक प्रकरणं महाराष्ट्रात झाली. जे लोक दोषी आहेत त्यांना निरपराध कसं करता येईल? तोही प्रयत्न हे लोक करतात. त्यामुळे हे काहीही करू शकतात आणि सत्तेच्या दुरुपयोग कसा करायचा हा भाजपप्रणित सरकारच्या दृष्टिकोन आहे. या घटनेच्या निमित्ताने हे लक्षात येतं”, असा दावा नाना पटोले यांनी केला.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.