AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये मिठाचा खडा, गोगावलेंचे तटकरेंवर गंभीर आरोप

पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये जुंपल्याची पाहायला मिळत आहे, भरत गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये मिठाचा खडा, गोगावलेंचे तटकरेंवर गंभीर आरोप
| Updated on: Jan 21, 2025 | 8:49 PM
Share

पालकमंत्रिपदावरून आता महायुतीमध्ये जुंपल्याची पाहायला मिळत आहे. पालकमंत्रिपदाची यादी जाहीर करण्यात आली. मात्र या यादीमध्ये शिवसेना नेते भरत गोगावले आणि दादा भुसे यांना स्थान देण्यात आलं नाही. यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. ते पुन्हा एकदा आपल्या मुळ गावी दरे इथे गेले होते. दादा भुसे आणि भरत गोगावले यांना मंत्रिपद मिळावं अशी त्यांची इच्छा आहे. तर दुसरीकडे पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादीचे नेते देखील नाराज असल्याचं समोर येत आहे.

दरम्यान एकनाथ शिंदे नाराज झाल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती दिली. मात्र आधी पालकमंत्री म्हणून ज्यांचं नाव जाहीर करण्यात आलं होतं, तेच या वेळी 26 जानेवारीला ध्वजारोहन करणार आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील भरत गोगावले यांचे समर्थक चांगलेच नाराज झाले आहेत. त्यांनी राजीनामे दिले असल्याची बातमी समोर येत आहे. जोपर्यंत भरत गोगावले हे पालकमंत्री होणार नाहीत तोपर्यंत आम्ही काम करणार नाही, अशी त्यांची भूमिका आहे.

दरम्यान दुसरीकडे भरत गोगावले यांनी थेट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधत गंभीर आरोप केला आहे. राज्यात कोणतच सीट निवडून आलं नाही, मात्र रायगडचा किल्ला राखण्यात यश आलं. आम्ही तिघांनी केलेल्या प्रयत्नामुळे सुनील तटकरे निवडून आले, मात्र त्यांनी तिघांना पाडण्याचा प्रयत्न केला, असा आरोप गोगावले यांनी केला आहे,  गोगावले यांच्या आरोपांनंतर आता हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.

शिंदे नाराज असल्याची चर्चा 

पालकमंत्रिपदाच्या वाटपावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे. ते दादा भुसे आणि भरत गोगावले यांच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही होते. मात्र त्यांना पालकमंत्री पद न मिळाल्यानं एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे. पालकमंत्रिपदाची यादी जाहीर झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे त्यांच्या मुळगावी दरे इथे गेले होते. त्यानंतर ते पुन्हा मुंबईत परतले आहेत.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.