AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्याचा शेवट चांगला ते..; मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी काय म्हणाले छगन भुजबळ?

नाशिकमधील येवला इथले आमदार छगन भुजबळ आज कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. सकाळी दहा वाजता शपथविधी कार्यक्रम पार पडणार आहे. त्यापूर्वी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. उशीर झाला का? या प्रश्नावर भुजबळांची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली.

ज्याचा शेवट चांगला ते..; मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी काय म्हणाले छगन भुजबळ?
Image Credit source: TV9
| Updated on: May 20, 2025 | 12:43 PM
Share

राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात येणार असून धनंजय मुंडे यांच्या रिक्त झालेल्या जागी राष्ट्रवादीचे (अजित पवार) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचा समावेश केला जाणार आहे. मंत्रिपदाची शपथ घेण्यापूर्वी भुजबळांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. “ज्याचा शेवट चांगला ते सगळं चांगलं,” असं ते यावेळी म्हणाले. त्याचप्रमाणे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल पटेल यांचे आभार मानले. मंत्रिमंडळात सध्या दोन जागा रिक्त आहेत. यापैकी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक जागा रिकामी झाली होती. आज सकाळी 10 वाजता राजभवनात शपथविधी होणार आहे. भुजबळांकडे अन्न व नागरी पुरवठा हेच खातं सोपविलं जाणार आहे.

शपथविधीला जाण्यापूर्वी माध्यमांशी बोलताना भुजबळ म्हणाले, “मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे आभार मानतो. मी लासलगाव, येवला मतदारसंघातील मतदारांचे आभार मानतो. मी माझ्या समता परिषदेतील सर्व कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे आभार मानतो. ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं, त्या सर्वांचे मी आभार मानतो. हे सगळं आठ दिवसांपूर्वीच ठरलं होतं. तेव्हा आमची मिटींग झाली होती. तेव्हाच सगळं ठरलं होतं. आधी सोमवारी शपथविधी होणार असं ठरलं होतं. परंतु मंगळवारी सर्व मंत्री असतील म्हणून आजचा दिवस ठरवण्यात आला.” यावेळी त्यांना उशीर झाला का, असा प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी “ज्याचा शेवट चांगला ते सगळं चांगलं” हीच प्रतिक्रिया पुन्हा दिली.

महाराष्ट्रातील एक प्रमुख ओबीसी चेहरा असलेल्या भुजबळांना गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातून वगळण्यात आलं होतं. नाशिकमधील येवला इथले आमदार छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून वगळल्याने जनतेत निराशा पसरली होती. त्यांनी यापूर्वी वेगवेगळ्या सरकारांमध्ये उपमुख्यमंत्रीपदासह कॅबिनेट मंत्री म्हणूनही काम केलं आहे. धनंजय मुंडे यांनी मार्च महिन्यात मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांचे जवळचे सहकारी वाल्मिक कराड यांचं नाव प्रमुख आरोपी म्हणून समोर आलं होतं. या प्रकरणानंतर मुंडेंनी आरोग्याच्या कारणास्तव राजीनामा दिला होता.

कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?
अजितदादांचा मुंबईत मोठा डाव, थेट सना मलिक यांच्या नेतृत्त्वात लढवणार?.
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला
...तरी शिवतीर्थवरचा चाफा काही केल्या बोलेना...शेलारांचा ठाकरेंना टोला.
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्..
कोकाटे यांची अटक अटळ? कायदेशीर अडचणी वाढल्या, सुनावणी पुढे ढकलली अन्...
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे
पाकिस्तानी बोली बोलणाऱ्यांना देशवासी माफ करणार नाहीत - एकनाथ शिंदे.