AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवाजी महाराजांचा राजकारणासाठी वापर केला तर… मनोज जरांगे यांचा इशारा; मालवणला जाऊन पाहणी करणार

मनोज जरांगे पाटील उद्या मालवणला जाणार आहेत. मालवणमध्ये राजकोट किल्ल्याजवळ शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता. या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी जरांगे मालवणला जाणार आहेत. या दौऱ्याला निघताना त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यकर्ते आणि विरोधकांचे चांगलेच कान टोचले आहेत.

शिवाजी महाराजांचा राजकारणासाठी वापर केला तर... मनोज जरांगे यांचा इशारा; मालवणला जाऊन पाहणी करणार
| Updated on: Aug 31, 2024 | 11:58 AM
Share

मनोज जरांगे पाटील हे उद्या मालवणला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी कोसळला. त्याची पाहणी करण्यासाठी जाणार आहेत. मात्र, त्यापूर्वी त्यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या आहेत. शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे. त्यांच्या नावाने राजकारण करू नका. हा राजकारणाचा विषय नाही. शिवाजी महाराजांचा राजकारणासाठी वापर केला तर राज्यातील जनता तुम्हाला माफ करणार नाही, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटीतून मालवणच्या राजकोट किल्लाकडे निघाले आहेत. त्यांनी मीडियाशी संवाद साधताना सत्ताधारी आणि विरोधकांना चांगलंच फैलावर घेतलं. छत्रपती शिवराय हे देशाचे दैवत आहेत. जी घटना घडली त्याने सर्वांच्या भावना दुखावल्या आहेत. ही घटना खूप दुर्दैवी आहे. छत्रपती शिवरायांना तुम्ही सहज घेऊ शकत नाहीत आणि त्यांच्याबद्दल तुम्ही बोलूही शकत नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

तुमचं राजकारण तिकडंच जळू द्या

शिवाजी महाराजांवर राजकारण करू नये हे माझं म्हणणं आहे. विरोधी पक्ष असो की सत्ताधारी… तुम्ही महाराजांवर राजकारण करू नका. तुम्ही जर राजकारण करत असाल तर तुम्ही लोकांच्या मनातून उठणार. तुम्ही जर छत्रपती शिवरायांच्या विषयावर राजकारण करत असताल तर लोक तुमच्या विरोधात जातील. तुम्ही महापुरुषांच्या नादी लागू नका. तुमचे राजकारण तिकडेच जळू द्या, असा संताप मनोज जरांगे यांनी व्यक्त केला.

उद्या मालवणला जाणार

तुमच्या राजकारणासाठी तुम्ही चिखल फेक करणार असाल आणि शिवरायांचा वापर करणार तर आम्ही हे होऊ देणार नाही. मी आज मालवणला भेट द्यायला जात आहे. उद्या सकाळी त्या ठिकाणी भेट देणार आहे आणि दर्शन घेणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

मी माफीत जाणार नाही

कोणी माफी मागितली, नाही मागितली… यात मी जाणार नाही. मी पहिल्या दिवशी राजकारण केलं नाही आणि कुठल्याही महापुरुषांच्या बाबतीत मला राजकारण करायचे नाही आणि त्यांनीही राजकारण करू नये. आरोपीला त्याच दिवशी अटक करायला हवी होती. तुम्ही आरोपीशी राजकीय हितसंबंध ठेवू नये, असं सांगतानाच आता एक सुधारित कायदा होणे गरजेचे आहे. यापुढे कोणत्याही महापुरुषाबाबत असा प्रकार झाला तर त्याला जामीनच देऊ नये. तो कायमचा तुरुंगामध्ये सडला पाहिजे. हे करणे आवश्यक आहे, असंही त्यांनी सांगितलं.

सुतार यांच्याकडून किल्ल्याची पाहणी

दरम्यान, प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी आज राजकोट किल्ल्याची पाहणी केली आहे. राम सुतार यांचा राजकोट पाहणीचा दौरा प्रशासनाने अत्यंत गुप्त ठेवला आहे. राम सुतार राजकोट किल्ल्याची आणि दुर्घटना झालेल्या पुतळ्याची पाहणी करून मुंबईत परतले आहेत. सुतार राज्य सरकारला आपला अहवाल सादर करणार आहेत. तसेच या दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत मोजकेच अधिकारी होते, असं सांगितलं जातं.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.