AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोसेखुर्द धरणातील पाणी विसर्गामुळं ब्रह्मपुरीतील गावं पूरमय; 15 गावातील शेतीशिवारं पाण्याखाली; अनेक मार्गावरील वाहतूक बंद

गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात वैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे त्याचा फटका नदीशेजारी असणाऱ्या गावाना बसत आहे. त्यामुळे या भागातील ग्रामस्थ आता भीतीच्या सावटा खाली वावरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक नागरिकांना आणि शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे.

गोसेखुर्द धरणातील पाणी विसर्गामुळं ब्रह्मपुरीतील गावं पूरमय; 15 गावातील शेतीशिवारं पाण्याखाली; अनेक मार्गावरील वाहतूक बंद
चंद्रपूर जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवला; अनेक गावं पूरमय
| Edited By: | Updated on: Aug 11, 2022 | 10:42 AM
Share

चंद्रपूर : गोसेखुर्द धरणातून (Gosekhurd Dam) मोठ्या प्रमाणात वैनगंगा नदीत (Vainganga River) पाण्याचा विसर्ग होत असल्याने ब्रह्मपुरी तालुक्यातील (Brahmapuri Taluka) काही गावांना पुराचा फटका बसला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत असल्याने अनेक गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. पूरमय परिस्थितीमुळे रस्ते पाण्याखाली आले असल्याने अनेक मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून पुराच्या पाण्याचा फटका अनेक नागरिकांना बसला आहे. वैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या अर्हेर-पिंपळगाव आणि बेलगावामध्ये पुराचे पाणी शिरल्याने शेतीसह नागरिकांच्या घरांचेही नुकसान झाले आहे.

गेल्या पाच ते सहा दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस कोसळत आहे, त्यामुळे गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात वैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

पुराचे पाणी 15 गावातील शेतीशिवारात

या पाण्यामुळे रणमोचन, चिखलगाव, बेटाळा, खरकाडा, चिंचोली यासारख्या नदी शेजारी असलेल्या जवळपास 15 गावातील शेतीशिवरात पुराचे पाणी शिरले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत झाले आहे. धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने नदीकाठी आणि नदीशेजारी असणाऱ्या गावांना पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे.

गोसेखुर्द धरणातून पाणीविसर्ग वाढवला

मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर आणि गोसेखुर्द धरणातून पाणीविसर्ग वाढवण्यात आल्यानंतर त्यांचा फटका नदीशेजारीला गावांना बसत असतो. त्याचप्रमाणे सप्टेंबर 2020 मध्ये ब्रह्मपुरी तालुक्यातील वैनगंगेच्या किनारी असलेल्या गावांना मोठा फटका बसला होता, त्या पुराच्या मोठा तडाख्यात अनेक शेतकऱ्यांना आणि नागरिकांना पुराच्या पाण्यामुळे नुकसान सहन करावे लागले होते.

नदीशेजारी असणाऱ्या गावाना फटका

गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात वैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे त्याचा फटका नदीशेजारी असणाऱ्या गावाना बसत आहे. त्यामुळे या भागातील ग्रामस्थ आता भीतीच्या सावटा खाली वावरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक नागरिकांना आणि शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. शेतीचेही प्रचंड नुकसान झाले असून पुराचे पाणी शेतीशिवारासह काही वस्तीतून शिरल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.