गोसेखुर्द धरणातील पाणी विसर्गामुळं ब्रह्मपुरीतील गावं पूरमय; 15 गावातील शेतीशिवारं पाण्याखाली; अनेक मार्गावरील वाहतूक बंद

गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात वैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे त्याचा फटका नदीशेजारी असणाऱ्या गावाना बसत आहे. त्यामुळे या भागातील ग्रामस्थ आता भीतीच्या सावटा खाली वावरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक नागरिकांना आणि शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे.

गोसेखुर्द धरणातील पाणी विसर्गामुळं ब्रह्मपुरीतील गावं पूरमय; 15 गावातील शेतीशिवारं पाण्याखाली; अनेक मार्गावरील वाहतूक बंद
चंद्रपूर जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवला; अनेक गावं पूरमय
Follow us
| Updated on: Aug 11, 2022 | 10:42 AM

चंद्रपूर : गोसेखुर्द धरणातून (Gosekhurd Dam) मोठ्या प्रमाणात वैनगंगा नदीत (Vainganga River) पाण्याचा विसर्ग होत असल्याने ब्रह्मपुरी तालुक्यातील (Brahmapuri Taluka) काही गावांना पुराचा फटका बसला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत असल्याने अनेक गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. पूरमय परिस्थितीमुळे रस्ते पाण्याखाली आले असल्याने अनेक मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून पुराच्या पाण्याचा फटका अनेक नागरिकांना बसला आहे. वैनगंगा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या अर्हेर-पिंपळगाव आणि बेलगावामध्ये पुराचे पाणी शिरल्याने शेतीसह नागरिकांच्या घरांचेही नुकसान झाले आहे.

गेल्या पाच ते सहा दिवसांपासून चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस कोसळत आहे, त्यामुळे गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात वैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

पुराचे पाणी 15 गावातील शेतीशिवारात

या पाण्यामुळे रणमोचन, चिखलगाव, बेटाळा, खरकाडा, चिंचोली यासारख्या नदी शेजारी असलेल्या जवळपास 15 गावातील शेतीशिवरात पुराचे पाणी शिरले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत झाले आहे. धरणातील पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने नदीकाठी आणि नदीशेजारी असणाऱ्या गावांना पुराच्या पाण्याचा मोठा फटका बसला आहे.

गोसेखुर्द धरणातून पाणीविसर्ग वाढवला

मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर आणि गोसेखुर्द धरणातून पाणीविसर्ग वाढवण्यात आल्यानंतर त्यांचा फटका नदीशेजारीला गावांना बसत असतो. त्याचप्रमाणे सप्टेंबर 2020 मध्ये ब्रह्मपुरी तालुक्यातील वैनगंगेच्या किनारी असलेल्या गावांना मोठा फटका बसला होता, त्या पुराच्या मोठा तडाख्यात अनेक शेतकऱ्यांना आणि नागरिकांना पुराच्या पाण्यामुळे नुकसान सहन करावे लागले होते.

नदीशेजारी असणाऱ्या गावाना फटका

गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात वैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे त्याचा फटका नदीशेजारी असणाऱ्या गावाना बसत आहे. त्यामुळे या भागातील ग्रामस्थ आता भीतीच्या सावटा खाली वावरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक नागरिकांना आणि शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. शेतीचेही प्रचंड नुकसान झाले असून पुराचे पाणी शेतीशिवारासह काही वस्तीतून शिरल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.