AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलीचं लग्न झालं, जमीन फक्त 80 आर, बायकोचे दागिने गहाण, कर्ज कसं फेडू?, फडणवीसांसमोर बळीराजाचा टाहो

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे आज हिंगोली जिल्ह्यातील नुकसानाची पाहणी करत आहेत. त्यावेळी औंढा तालुक्यातील असोला गावातील नुकसानाची पाहणी करण्यासाठी फडणवीस आणि मुंडे पोहोचले. त्यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले.

मुलीचं लग्न झालं, जमीन फक्त 80 आर, बायकोचे दागिने गहाण, कर्ज कसं फेडू?, फडणवीसांसमोर बळीराजाचा टाहो
| Updated on: Oct 21, 2020 | 4:13 PM
Share

हिंगोली: ‘मुलीचं लग्न झालं, जमीन फक्त ८० आर, बायकोचे दागिनेही गहाण ठेवलेत. साहेब… सांगा कर्ज कसं फेडू? असा टाहो फोडत हिंगोलीच्या एका शेतकऱ्यानं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आपली व्यथा मांडली आणि फडणवीसांचे पाय धरले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ त्या शेतकऱ्याला उठवत काळजी करु नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत, अशी ग्वाही देत धीर देण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानाची पाहणी करत आहेत. यावेळी त्यांच्यासोबत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेही उपस्थित आहेत. (Hingoli farmer sheds tears in front of Devandra Fadnavis )

परतीच्या पावसानं दिलेल्या तडाख्यात मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांना फटका बसला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे आज हिंगोली जिल्ह्यातील नुकसानाची पाहणी करत आहेत. त्यावेळी औंढा तालुक्यातील असोला गावातील नुकसानाची पाहणी करण्यासाठी फडणवीस आणि मुंडे पोहोचले. त्यावेळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले.

फडणवीसांकडून धीर देण्याचा प्रयत्न

मुलीचं लग्नासाठी घेतललं कर्ज सोयाबीन विकून येणाऱ्या पैशातून फेडू, असा विचार असोलातील एका शेतकऱ्यानं केला होता. पण अतिवृष्टीमुळं तोंडचा घास हिरावला गेला. त्यामुळं हतबल झालेल्या शेतकऱ्यांना फडणवीसांपुढे रडू कोसळलं. त्यावेळी फडणवीसांनी त्या शेतकऱ्याला धीर देत, आपल्या नुकसानाचा पंचनामा करुन तातडीनं मदत मिळवण्याचा प्रयत्न करु, असं आश्वासन या शेतकऱ्याला दिलं.

सरकारने बोलघेवडेपणा सोडावा, कृती करुन दाखवावी- फडणवीस

राज्य सरकारमध्ये केवळ बोलणारे नेते आहेत. हे नेते रोज प्रसारमाध्यमांच्या माईकसमोर येऊन बोलतात. पण प्रत्यक्षात निर्णय कोण घेणार? त्यामुळे आता सरकारने बोलघेवडेपणा सोडून प्रत्यक्ष कृती करुन दाखवावी, असं थेट आव्हान फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. ग्रामीण भागात अतिवृष्टीच्या संकटानंतरही बँकांनी शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीसाठी तगादा लावला आहे. दिवसातून चार-पाच वेळा शेतकऱ्यांना बँकेतून फोन येतात, बँकेची माणसंही घरी येतात. त्यामुळे सरकारने बँकांना शेतकऱ्यांकडून कर्जवसुली थांबवण्याचे आदेश दिले पाहिजेत, अशी मागणीही फडणवीसांनी सरकारकडे केली आहे.

संबंधित बातम्या :

उद्धव ठाकरे दसऱ्यानंतर कोकण दौऱ्यावर जाण्याची शक्यता, नुकसानीची पाहणी करणार

मी मुख्यमंत्री असताना 25 हजार हेक्टरी मदत देण्याची मागणी करत होते, आता तुमची वेळ; फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा

Hingoli farmer sheds tears in front of Devandra Fadnavis

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.