AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ईडीसारख्या संस्थांचा गैरवापर आत्ता नाही तर काँग्रेसच्या काळात झाला : देवेंद्र फडणवीस

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (28 डिसेंबर) गोव्याला जाताना काही वेळेसाठी सावंतवाडी भाजप कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी ईडी कारवाईवरुन भाजपवर होत असलेल्या टीकेला उत्तर दिलं.

ईडीसारख्या संस्थांचा गैरवापर आत्ता नाही तर काँग्रेसच्या काळात झाला : देवेंद्र फडणवीस
| Updated on: Dec 28, 2020 | 5:23 PM
Share

सिंधुदुर्ग : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (28 डिसेंबर) गोव्याला जाताना काही वेळेसाठी सावंतवाडी भाजप कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी ईडी कारवाईवरुन भाजपवर होत असलेल्या टीकेला उत्तर दिलं. तसेच ईडीसारख्या संस्थांचा गैरवापर काँग्रेसच्या काळात झाल्याचा आरोप केला. ज्यांच्याविरुद्ध तक्रारी किंवा पुरावे आहेत त्यांच्यावरच कारवाई होत आहे, असाही दावा फडणवीसांनी केला. यावेळी त्यांच्यासोबत भाजप आमदार नितेश राणे, रविंद्र चव्हाण हेही उपस्थित होते (Devendra Fadnavis criticize Congress over ED notice and allegations).

ईडीकडून होत असलेल्या कारवाई संदर्भात काँग्रेसने भाजपवर टीका केली होती. ईडीने आपलं कार्यालय भाजपच्या कार्यालयात हलवावं, अशीही टीका काँग्रेसने केली होती. त्या टीकेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यूत्तर दिलं आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ईडीसारख्या संस्थांचा गैरवापर काँग्रेसच्या काळात झाला. या काळात हा गैरवापर होत नाही. त्यांमुळे त्यांचा काळ माहिती आहे आणि त्यावेळी ते कसे गैरवापर करायचे हे त्यांना माहिती आहे. आत्ता ज्यांच्याबद्दल तक्रारी असतील किंवा काही पुरावे असतील तर त्यासंदर्भात चौकशी होते. माझं पहिल्यापासून स्पष्ट मत आहे, की आपण जर काही केलं नसेल, तर कुणीही घाबरण्याची आवश्यकता नाही. कुठलीही संस्था कुणावरही थेट कारवाई करू शकत नाही.”

‘ठाकरे सरकारने केवळ शेतकऱ्यांना मदतीच्या घोषणा केल्या, प्रत्यक्षात मदत नाही’

“या सरकारने केवळ शेतकऱ्यांना मदतीच्या घोषणा केल्या, मात्र प्रत्यक्षात कोणतीही मदत केली नाही. अगदी निसर्ग चक्रीवादळानंतरही पहिल्यांदा तुटपुंजी मदत केली. याशिवाय जी मदत घोषित केली तीही कुठे मिळाली नाही. अनेक ठिकाणी जाऊन आलो, अनेकांशी चर्चा केली, पण कुणीही मदत मिळाल्याचं सांगितलं नाही,” असाही आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी ठाकरे सरकारवर घोटाळे केल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “मी सरकारचे एकएक घोटाळे उघडकीस आणले आहेत. तसेच यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केलीय. सरकारने कारवाई केली नाही, तर मी उच्च न्यायालयात जाणार आहे.”

हेही वाचा :

काँग्रेसच्या सत्ताकाळात मंत्रिपद, कोल्हापुरातील दिग्गज नेत्याच्या भेटीला फडणवीस

चांगलं काम केलं तर ईडीची नोटीस मिळत नाही, देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना टोला

…तर उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करु, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Devendra Fadnavis criticize Congress over ED notice and allegations

Follow Us
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका
भाजपने पराभवाची सवय लावून घ्यावी! विशाल पाटील यांची टीका.
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका
... हे घाणेरडं राजकारण! आशिष शेलार यांची ममता बॅनर्जींवर टीका.
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.