AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यावर पुन्हा संकट! 7 जिल्ह्यांमध्ये मोठा इशारा, अवकाळी पावसासह जोरदार वारे आणि..

राज्यातील हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागाने नुकताच अत्यंत मोठा इशारा दिला. अवकाळी पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाहीये. आजही राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस हजेरी लावण्याचा अंदाज आहे.

राज्यावर पुन्हा संकट! 7 जिल्ह्यांमध्ये मोठा इशारा, अवकाळी पावसासह जोरदार वारे आणि..
Rain
| Updated on: Feb 24, 2026 | 7:52 AM
Share

मागील काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला. फेब्रुवारी महिन्यातही पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. सकाळी थोडीफार थंडी आहे तर यासोबतच आता पाऊस सुरू आहे. काल राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वारे आणि विजांच्या कडकाडाटासह पाऊस झाला. आजही अनेक भागात अवकाळी पाऊस येण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा येलो अलर्ट आज जारी करण्यात आला. विदर्भ आणि मराठवाड्यासाठी हा अलर्ट आहे. कर्नाटकापासून मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्याने राज्यात पावसाला पोषक वातावरण आहे.

धाराशिव, लातूर, नांदेड, सोलापूर, हिंगोली, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आज पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. राज्यातील इतरही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. काल झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी लोकांची तारांबळ उडाली. त्यामध्येच आजही पावसाचा इशारा देण्यात आला. पुढील दोन दिवस पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे.

निफाड येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. निफाडमध्ये 12.4 नीचांकी तापमान नोंदवले गेले. ब्रह्यपुरी येथे राज्यातील उचांकी तापमानाची नोंद झाली. ब्रह्यपुरी येथे उच्चांकी 36.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. यासोबतच आजही राज्यात तापमानात चढउतार बघायला मिळेल. कधी पाऊस तर कधी थंडी आणि उन्हाचा चटका अशी स्थिती झाली आहे. यामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे.

बीड जिल्ह्यातील बहुतांश भागात अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. तसेच माजलगाव तालुक्यात देखील बहुतांश भागात काल आणि आज सकाळी वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. ज्वारी, हरभरा या पिकांसह फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक सुरू झालेल्या या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. परळी तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या गहू हरभरा पिक पिकांचे नुकसान झाले.

Follow Us
कांदा मोर्चात सपकाळांची जीभ घसरली; मोदींवर टीका करताना वादग्रस्त....
कांदा मोर्चात सपकाळांची जीभ घसरली; मोदींवर टीका करताना वादग्रस्त.....
दिल्लीत अमित शाहांची भेट का घेतली, एकनाथ शिंदेंच्या उत्तराने चर्चेला..
दिल्लीत अमित शाहांची भेट का घेतली, एकनाथ शिंदेंच्या उत्तराने चर्चेला...
कांदाप्रश्न सोडव्यासाठी थेट दिल्लीला साकडं, सरकारचं शिष्टमंडळ राजधानीत
कांदाप्रश्न सोडव्यासाठी थेट दिल्लीला साकडं, सरकारचं शिष्टमंडळ राजधानीत.
आता काही खरं नाही! मोटेगावकरचा पाय आणखी खोलात, NEET स्पेशल बॅचबाबत...
आता काही खरं नाही! मोटेगावकरचा पाय आणखी खोलात, NEET स्पेशल बॅचबाबत....
महायुतीतील तिढा आज सुटणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक
महायुतीतील तिढा आज सुटणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली महत्त्वाची बैठक.
इंधन संकटामुळे ST महामंडळ अलर्ट मोडवर; प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय!
इंधन संकटामुळे ST महामंडळ अलर्ट मोडवर; प्रताप सरनाईकांचा मोठा निर्णय!.
कांदा आंदोलन पेटलं! थेट रोहित पवारांसह आणखी दोघं पोलिसांच्या ताब्यात
कांदा आंदोलन पेटलं! थेट रोहित पवारांसह आणखी दोघं पोलिसांच्या ताब्यात.
24 रुपयांचं आश्वासन हवेत? कांदा प्रश्नावर पवारांचा सरकारवर हल्लाबोल
24 रुपयांचं आश्वासन हवेत? कांदा प्रश्नावर पवारांचा सरकारवर हल्लाबोल.
मोठी बातमी! TCS प्रकरणात फॉरेन्सिक टीमची एन्ट्री, मतीन पटेल निदा खानशी
मोठी बातमी! TCS प्रकरणात फॉरेन्सिक टीमची एन्ट्री, मतीन पटेल निदा खानशी.
कांद्याने रडवलं! महामार्ग रोखत शेतकऱ्यांचा आक्रोश, ही फक्त सुरुवात आहे
कांद्याने रडवलं! महामार्ग रोखत शेतकऱ्यांचा आक्रोश, ही फक्त सुरुवात आहे.