AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यावर पुन्हा संकट! 7 जिल्ह्यांमध्ये मोठा इशारा, अवकाळी पावसासह जोरदार वारे आणि..

राज्यातील हवामानात मोठा बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच आता भारतीय हवामान विभागाने नुकताच अत्यंत मोठा इशारा दिला. अवकाळी पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाहीये. आजही राज्यातील काही भागात अवकाळी पाऊस हजेरी लावण्याचा अंदाज आहे.

राज्यावर पुन्हा संकट! 7 जिल्ह्यांमध्ये मोठा इशारा, अवकाळी पावसासह जोरदार वारे आणि..
Rain
| Updated on: Feb 24, 2026 | 7:52 AM
Share

मागील काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. त्यामध्येच राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला. फेब्रुवारी महिन्यातही पाऊस काही जाण्याचे नाव घेत नाही. दुपारी उन्हाचा चटका जाणवत आहे. सकाळी थोडीफार थंडी आहे तर यासोबतच आता पाऊस सुरू आहे. काल राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वारे आणि विजांच्या कडकाडाटासह पाऊस झाला. आजही अनेक भागात अवकाळी पाऊस येण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाकडून अवकाळी पावसाचा येलो अलर्ट आज जारी करण्यात आला. विदर्भ आणि मराठवाड्यासाठी हा अलर्ट आहे. कर्नाटकापासून मराठवाड्यापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असल्याने राज्यात पावसाला पोषक वातावरण आहे.

धाराशिव, लातूर, नांदेड, सोलापूर, हिंगोली, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आज पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. राज्यातील इतरही भागात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. काल झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी लोकांची तारांबळ उडाली. त्यामध्येच आजही पावसाचा इशारा देण्यात आला. पुढील दोन दिवस पाऊस कायम राहण्याची शक्यता आहे.

निफाड येथे राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद झाली. निफाडमध्ये 12.4 नीचांकी तापमान नोंदवले गेले. ब्रह्यपुरी येथे राज्यातील उचांकी तापमानाची नोंद झाली. ब्रह्यपुरी येथे उच्चांकी 36.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. यासोबतच आजही राज्यात तापमानात चढउतार बघायला मिळेल. कधी पाऊस तर कधी थंडी आणि उन्हाचा चटका अशी स्थिती झाली आहे. यामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे.

बीड जिल्ह्यातील बहुतांश भागात अवकाळीचा मोठा फटका बसला आहे. तसेच माजलगाव तालुक्यात देखील बहुतांश भागात काल आणि आज सकाळी वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. ज्वारी, हरभरा या पिकांसह फळबागांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अचानक सुरू झालेल्या या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. परळी तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या गहू हरभरा पिक पिकांचे नुकसान झाले.

Follow Us
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
नेपाळमध्ये महापूर; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महापुरात एक हजारहून अधिक बेपत्ता; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला विरोध!
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न
प्रसाद लाड पुन्हा मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणार