AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सावधान! पुढील काही तास अत्यंत धोक्याची, बाहेर फिरणे टाळाच, हवामान विभागाचा मोठा इशारा

Maharashtra Rain Update : राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली होती. मात्र, आता जोरदार पाऊस सुरू झालाय. भारतीय हवामान विभागाने पावसाचा अत्यंत मोठा इशारा दिला असून अनेक भागांमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट हा देण्यात आला आहे.

सावधान! पुढील काही तास अत्यंत धोक्याची, बाहेर फिरणे टाळाच, हवामान विभागाचा मोठा इशारा
Heavy rain
| Updated on: Aug 18, 2025 | 9:24 AM
Share

राज्यात मागील दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस  पडताना दिसतोय. रात्रभर सुरू असलेल्या पावसाचा जोर सकाळी वाढल्याचे बघायला मिळाले. यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुढील काही तासात अतिमुसळधार पाऊस होणार असल्याने नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळाले. भारतीय हवामान विभागाकडून अनेक भागांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. दक्षिण ओडिशाच्या किनाऱ्यालगत वायव्य बंगालच्या उपसागरावर नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. यामुळे राज्यामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला पावसाने पाठ फिरवली होती. मात्र, आता पाऊस धुवाधारपणे सुरू आहे.

भारतीय हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी सर्तकेचा इशारा जारी केला आहे. कोकण आणि घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा अंदात वर्तवण्यात आला असून रेड अर्लट जारी करण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातही मुसळधार पाऊस होणार आहे, यामुळे या भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. सातारा, रायगड, पुणे, कोल्हापूरध्ये रेड अलर्ट आहे. तर मुंबई, ठाणे परभणी, नांदेड, पालघर, छत्रपती संभाजीनगर, बीड जालना या भागात ऑरेंज अलर्ट आहे.

मुंबईमध्ये तिसऱ्या दिवशी रात्रभर पाऊस कोसळला आहे. मध्य भारतावर कमी दाबाचा पट्टा त्यामुळे मुंबई सह राज्यभरात पावसाच्या सरी कोसळत आहत. रात्रभरात ठिकठिकाणी 60 ते 100 मिमी पावसाची नोंद झालीये. मुंबईमध्ये रात्रीपासून पावसाची रिमझिम सुरू असल्याने मध्य रेल्वे आणि हार्बल मार्गाची लोकल सेवा उशिराने सुरू आहे. पुढील 3 तासांत रायगडमधील आणि मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाकडून पुढील तासात अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचे सांगितले.

जळगावच्या पारोळा तालुक्यात काही गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पावसामुळे गावांमध्ये मोठे नुकसान. पळसखेडा गावात दोन्ही गावांना जोडणारा पूल वाहून गेल्याने संपर्क तुटला. चिखलोड , म्हसवे तसेच शेळावे गावात चिखली नदीच्या पुराने अनेक घरांमध्ये दुकानामध्ये पाणी शिरल्याने नुकसान. पुराचे पाणी शेतात शिरल्याने पिके जमीनदोस्त झाली असून मोठे नुकसान झाले आहे. पळसखेडा बुद्रुक येथे पिकांसह शेतातील जमीन वाहून गेली.

दोन दिवसांच्या पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील धरण क्षेत्रातील जलसाठ्यात वाढ. पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या अप्पर वर्धा धरण जलसाठ्यात सहा टक्क्यांनी वाढ. धरणातील जलसाठा 52 वरून पोहोचला 58 टक्क्यांवर मागील वर्षी यावेळी धरणातून केला होता पाण्याचा विसर्ग. दुसरीकडे नांदेडमध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. हेच नाही तर मुंबईमध्येही सध्या पावसाचा जोर वाढल्याचे बघायला मिळतंय.

Follow Us
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे... काय घडलं?
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश, आता...
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले...
पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील
Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?
4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?
Sachin Sawant | 4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?; उज्ज्वला योजनेवरून काँग्रेसचा संताप
लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केल
Video | लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केलेल्या विधानाची राज्यात मोठी चर्चा!
धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच!
Dahanu | धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच! साखरे गावाचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच वेधलं लक्ष