AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जळगावच्या राजकारणात भूकंप, भाजप खासदार उन्मेष पाटील यांचा उद्या ठाकरे गटात प्रवेश

जळगावच्या राजकारणात आता मोठा भूकंप येण्याची शक्यता आहे. कारण भाजपचे सध्याचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील उद्या शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. उन्मेष पाटील यांची ही नाराजी भाजपला डोकेदुखी ठरु शकते. कारण उन्मेष पाटील यांची चाळीसगावात चांगली ताकद आहे.

जळगावच्या राजकारणात भूकंप, भाजप खासदार उन्मेष पाटील यांचा उद्या ठाकरे गटात प्रवेश
भाजप खासदार उन्मेष पाटील यांचा उद्या ठाकरे गटात प्रवेश
| Edited By: | Updated on: Apr 02, 2024 | 3:38 PM
Share

जळगावच्या राजकारणात आता मोठा ट्विस्ट येणार आहे. कारण सध्याचे भाजपचे खासदार उन्मेष पाटील हे आता ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. भाजपकडून उन्मेष पाटील यांचं लोकसभा निवडणुकीचं तिकीट कापण्यात आलं आहे. त्यामुळे उन्मेष पाटील नाराज असल्याची चर्चा आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्या दुपारी बारा वाजता उन्मेष पाटील यांचा ठाकरे गटात पक्षप्रवेश होणार आहे. त्यांच्यासोबत पारोळा माजी नगराध्यक्ष करन पवार हे सुद्धा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. उन्मेष पाटील यांनी आज सकाळी जळगाव जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केल्याची माहिती समोर येत आहे.

उन्मेष पाटील हे जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान भाजपचे खासदार आहेत. त्यांनी याआधी 2014 मध्ये आमदारकीची निवडणूक लढवली होती आणि ते चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात आमदार होते. मात्र यावेळी उन्मेष पाटील यांना भाजपकडून जळगाव लोकसभा मतदारसंघात उमेदवारी न मिळता स्मिता वाघ यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आलीय. त्यामुळे उन्मेष पाटील नाराज असल्याची चर्चा होती. याच नाराजीतून त्यांनी आज ठाकरे गटाच्या नेत्यांची भेट घेतली आहे.

महाविकास आघाडीत जळगाव लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना ठाकरे गटासाठी सुटला आहे. ठाकरे गटाकडून या जागेसाठी उमेदवाराची घोषणा झालेली नाही. जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचे नेते हर्षल माने, नुकतंच भाजपमधून ठाकरे गटात प्रवेश केलेल्या नेत्या ललिता पाटील आणि इतर काही इच्छुक उमेदवारांची नावे चर्चेत होती. मात्र उन्मेष पाटील आणि करण पवार हे जर शिवसेना ठाकर प्रवेश करत असतील तर जळगाव लोकसभा मतदारसंघातून नेमकी उमेदवारी शिवसेना ठाकरे गटाकडून कोणाला मिळते ते पाहावे लागेल.

‘संजय राऊत हे उन्मेष पाटील यांचे मित्र’, स्मिता वाघ यांची प्रतिक्रिया

“संजय राऊत हे उन्मेष पाटील यांचे मित्र असल्यामुळे त्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी उन्मेष पाटील हे गेले आहेत. त्यामुळे मला अजूनही असं वाटत नाही की उन्मेष पाटील हे असा काही निर्णय घेणार नाहीत. मी प्रचारामध्ये आहे. त्यामुळे मी अशी कुठली बातमी बघितली नाही. मात्र माझा अजूनही ठाम विश्वास आहे की अशा कुठल्याही घडामोडी ह्या घडणार नाहीत. कोणी कसं जीवन जगावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. मात्र मी माझ्या तत्वांशी आजपर्यंत तडजोड केली नाही. एकनिष्ठ राहिले. पक्षासोबत एकनिष्ठा राहणाऱ्या माझ्यासारख्या कार्यकर्तेच्या पाठीशी जनता ही उभी राहील”, अशी प्रतिक्रिया स्मिता वाघ यांनी दिली.

‘जनता माझ्या पाठीशी राहील’

“भाजपचे पदाधिकारी जरी ठाकरे गटात गेले आणि ते स्वतः उमेदवार असले तरी जनता माझ्या पाठीशी राहील असा मला विश्वास आहे. त्यामुळे काही झालं तरी मोदींनी जो विकास केलेला आहे त्यामुळे जनता माझ्या पाठीशी राहील. मी प्रचंड मताधिक्याने निवडून येईन, असा माझा ठाम विश्वास आहे. मोठमोठे भाजपचे पदाधिकारी जरी ठाकरे गटात गेले तरी आमच्यासोबत मोदी आहेत. विकास कामे आहेत. त्यामुळे त्याचा फरक पडणार नाही”, अशी भूमिका स्मिता वाघ यांनी मांडली.

“फोटो असणे आणि नसणे यामुळे तुमचं काम कमी होत नसतं. फोटोसाठी आम्ही कधी अडून राहिलो नाही. फोटोवरून तुमचं मूल्यमापन होत नसतं. तुमचं मूल्यमापन हे कामावरून होत असतं. भाजपच्या बैठकीसाठी मी सुद्धा त्यांना फोन केला होता. मात्र त्यांनी फोन रिसीव केले नव्हते. त्यानंतर मी त्यांच्या सहाय्यकांना फोन केला होता. त्यामुळे बैठकीचा फोन नव्हता असं ते म्हणू शकत नाही. भाजपात अंतर्गत कुठेही नाराजी नाही. भाजप एकसंघ पद्धतीने काम करणारा पक्ष आहे. त्यामुळे भाजपमध्ये कुठेही दुफळी नाही”, अशी प्रतिक्रिया स्मिता वाघ यांनी दिली.

भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.
छगन भुजबळांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र! पत्रात काय?
छगन भुजबळांचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र! पत्रात काय?.
पंतप्रधानांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला गती मिळाली! फडणवीसांचं मत
पंतप्रधानांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला गती मिळाली! फडणवीसांचं मत.
संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा; लाखो भाविकांची शेगावात मांदियाळी
संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा; लाखो भाविकांची शेगावात मांदियाळी.
प्रकट दिनानिमित्त गजानन महाराजांच्या मंदिरात भक्तांची गर्दी
प्रकट दिनानिमित्त गजानन महाराजांच्या मंदिरात भक्तांची गर्दी.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगरमध्ये दाखल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहिल्यानगरमध्ये दाखल.
19 ते 25 वर्षात लग्न, 3 मुलं व्हावी असं शास्त्र सांगतं - मोहन भागवत
19 ते 25 वर्षात लग्न, 3 मुलं व्हावी असं शास्त्र सांगतं - मोहन भागवत.
संभाजीनगरात CTET केंद्रावर दागिने काढायला लावल्याने वाद!
संभाजीनगरात CTET केंद्रावर दागिने काढायला लावल्याने वाद!.
सरसंघचालक हा हिंदू म्हणून निवडला जाईल! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगितलं
सरसंघचालक हा हिंदू म्हणून निवडला जाईल! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगितलं.