AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संभाजी भिडे म्हणाले, ‘मराठ्यांनी देश सांभाळावा, आरक्षण कुठे मागता?’, मनोज जरांगे म्हणाले….

संभाजी भिडे यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्यावरुन विरोधकांकडून निशाणा साधला जातोय. मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही, असंच संभाजी भिडे अप्रत्यक्षपणे म्हणाले आहेत. त्यांच्या वक्तव्यावर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

संभाजी भिडे म्हणाले, 'मराठ्यांनी देश सांभाळावा, आरक्षण कुठे मागता?', मनोज जरांगे म्हणाले....
संभाजी भिडे आणि मनोज जरांगे पाटील
| Updated on: Aug 18, 2024 | 6:57 PM
Share

शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी मराठा आरक्षणाबद्दल वेगळी भूमिका घेतली आहे. मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही, असंच संभाजी भिडे यांनी अप्रत्यक्षपणे बोलून दाखवलं आहे. त्यामुळे संभाजी भिडे यांच्यावर विरोधकांकडून निशाणा साधला जातोय. संभाजी भिडे यांनी आज सांगलीत पत्रकार परिषद घेत मराठा आरक्षणावर भूमिका मांडली. त्यांच्या मराठा आरक्षणाबाबतच्या भूमिकेवर आता विरोधकांकडून टीका केली जात आहे. संभाजी भिडे यांच्या भूमिकेवर मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनीदेखील प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला.

“लय बेस्ट. वाघ मागत नसतो. शिकार करून घेत असतो. त्यांना बोलून काही उपयोग नाही. त्यांना दोष देऊन सुद्धा उपयोग नाही. त्यांची चूक असण्याचे कारण ही नाही. जे भिडे गुरुजी बोलले ते शब्द देवेंद्र फडणवीस यांचे आहेत. आता भिडे गुरुजी तसं म्हणत असतील तर त्यांच्यापासूनही मराठे दूर जातील आणि हे देवेंद्र फडणवीस यांचे काम आहे”, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.

‘फडणीसांनी ज्यांना बोलायला लावलं त्यांच्यापासून समाज दूर गेला’

“देवेंद्र फडणवीस यांनी ज्यांना-ज्यांना बोलायला लावले तर त्यांच्यापासून मराठा समाज दूर गेला आणि भिडे गुरुजींसोबत ही मराठ्यांची पोरं आहेत आणि ते आता लांब जातील. देवेंद्र फडणवीस म्हणजे स्वतःला संपवायला लागला आणि त्यांचे नेतेही संपवत आहे, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली. भिडे गुरुजी बोलले ते शब्द देवेंद्र फडणवीस यांचे आहेत आणि हा फडणवीस यांचा सहावा ते सातवा डाव आहे”, असा आरोपदेखील मनोज जरांगे पाटील यांनी केला.

संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले?

“मराठ्यांना उभा देश चालवायचा आहे. आरक्षण कुठे मागता? सिंहानी जंगल सांभाळायचे असते. मराठा जात ही संबंध देशाचा संसार चालविणारी जात आहे, हे मराठ्यांच्या ज्या दिवशी लक्षात येईल, त्यादिवशी या मातृभूमीचे भाग्य उजळून जाईल. हे त्यांच्या लक्षात येत नाही, हे आपले दुर्दैव आहे”, असं संभाजी भिडे म्हणाले आहेत.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.