Maharashtra Day Celebration 2026 LIVE: आज महाराष्ट्र दिनाचा उत्साह, राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन
Maharashtra Day Celebration 2026 LIVE in Marathi : आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आहे. सकाळीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं. राज्यात विविध ठिकाणी महाराष्ट्र दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
सर्वजण एकत्र येऊन विकासात्मक काम करू-सुनेत्रा पवार
सर्वांना महाराष्ट्र दिन, कामगादर दिन आणि बौध्द पौर्णिमेच्या शुभेच्छा देते. सर्व शहिदांना श्रद्धांजली आणि कृतज्ञता व्यक्त करते. मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन करते. बीड जिल्ह्याचा चेहरा मोहरा बदलण्याचा दादांनी संकल्प केला होता. आदरणीय अजित दादांनी अनेक निर्णय घेतले. जिल्हाला ते एक वेगळी दिशा देतील असं वाटलं होतं. बीड जिल्ह्याचं स्वप्न पुर्ण करण्याची आणि विकासात्मक कामे करण्याची जबाबदारी आपल्यावर आली आहे. आपल्या सर्वांना आवाहन करते आपण सर्वजण एकत्र येऊन विकासात्मक काम करू, असे उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या.
-
मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा
सर्वांना महाराष्ट्र राज्य स्थापना दिवसाच्या शुभेच्छा देतो. हा महाराष्ट्राचा मंगल कलश आणण्यासाठी ज्यांनी योगदान दिलं आहे त्यांचा स्मरण आज कर्म प्राप्त आहे त्यांना सगळ्यांना मी अभिवादन करतो.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रात अनेक योजना यशस्वी करत आहोत. महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे, प्रत्येक जिल्ह्यातून महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक योजना आपण महाराष्ट्रात राबवत असतो, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी दावसमध्ये जाऊन अनेक करार केले.या करण्याचा परिणाम म्हणून संभाजीनगर जिल्ह्याला सर्वांनी पसंती दिली. नाशिक, ठाणे, पुणे प्रमाणे संभाजीनगरला आता वेगळे स्थान निर्माण झाल आहे. आपण जिल्हाधिकारी कार्यालयात सुद्धा तक्रार निवारण कक्ष सुरू केला आहे, असे मंत्री संजय शिरसाट म्हणाले.
-
-
उद्धव ठाकरे यांच्याकडून हुतात्मा स्मारकास अभिवादन
उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा स्मारकास अभिवादन केले. महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईतील हुतात्मा चौक येथे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील १०६ हुतात्म्यांच्या स्मृतीस पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.यावेळी संजय राऊत, आदित्य ठाकरे, अरविंद सावंत, अनिल देसाई यांसह पक्षाचे अनेक प्रमुख नेते आणि निष्ठावंत शिवसैनिक उपस्थित होते.
-
मिसिंग लिंक हा जगातील सगळ्यात मोठा रुंद पुल
मिसिंग लिंक हा जगातील सगळ्यात मोठा रुंद पुल आहे आणि जगातील महान इंजिनियर यांच्या माध्यमातून उभा झालेला हा पुल आहे आणि हा ब्रिज पूर्ण झाल्यानंतर हा रस्ता पूर्ण झाल्याच्या नंतर मुंबई पुणे येथील सर्व ट्राफिक आहेत ते संपणार आहे. मुंबई पुणे अंतर दहा किलोमीटरने कमी होईल आणि मुंबई पुणे काँटम कोरीडोर आहे तो कॉरिडॉर करण्याकरिता मोठा फायदा होणार आहे. महाराष्ट्र दिनी महाराष्ट्र आणि वर्ल्ड रेकॉर्ड करणे हा देखील एक महत्त्वाचा विषय आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
-
भाषेच्या आधारावर ते हिंसा विवाद योग्य नाही-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्र संकुचित कधीच नव्हता की महाराष्ट्रामध्ये परप्रांतीयांनी राहू नये किंवा इथे केवळ कोणीही मर्यादित लोकांनी राहावं अशी संकुचित मनोवृत्ती महाराष्ट्राची नाही राहिली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो महाराष्ट्र धर्म शिकवला त्यामध्ये देखील हे अपेक्षित नाही आणि मला अभिमान आहे की मी देशाच्या कुठल्याही भागात गेलो की त्या राज्यामध्ये तिथल्या संस्कृतीमध्ये मराठी माणूस हा भर टाकताना दिसत आहे.आणि भाषेचा विषय पाहिला तर स्वभाषेचा अभिमान हा राहिलाच पाहिजे मराठी भाषेचा अभिमान हा राहिलाच पाहिजे महाराष्ट्र मध्ये राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी भाषा ही शिकलीच पाहिजे आणि मला निश्चित वाटतं की जे जे लोक ह्या महाराष्ट्रामध्ये वास्तव्यास आहेत ते मराठी भाषा शिकण्याचा प्रयत्न करतील जे शिकले नाहीत त्यांना शिकवण्याचा आम्ही प्रयत्न करू .परंतु भाषेच्या आधारावर ते हिंसा विवाद योग्य नाही. भाषा येत नाही म्हणून कोणाला मारणं हे आम्हाला मान्य नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
-
-
सर्व महाराष्ट्रवासीयांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
छत्रपती शिवरायांच्या स्पर्शाने पावन झालेला महाराष्ट्र स्वराज्य आणि स्वराज्य हा संदेश या मातीने दिला तो हा महाराष्ट्र आहे. थोर समाज सुधारक ज्या ठिकाणी सुधारण्याचा आंदोलन केलं तो हा महाराष्ट्र आहे. भक्ती संप्रदायाच्या माध्यमातून भक्तीचा अखंड मिळावा ज्या ठिकाणी तयार झाला हा तो महाराष्ट्र आहे. 106 हुताम्यांच्या बलिदानानंतर तयार झालेला हा महाराष्ट्र आहे. आणि जगातील तिसरी अर्थव्यवस्था असलेला हा महाराष्ट्र आहे. देशातील पावर हाऊस ग्रोथ इंजिन असलेल हा महाराष्ट्र आहेयआणि हा महाराष्ट्र देशाला दिशा देत आहेय महाराष्ट्र गीतामध्ये आपण बोलतो दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा आणि हे अनेक शेकडो वर्ष हे महाराष्ट्राने दाखवून दिलेला आहे म्हणूनच महाराष्ट्र दिन आपल्या सगळ्यांकरिता एक अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या पुन्हा एकदा शुभेच्छा दिल्या.
-
मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये ध्वजवंदन
मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये ध्वजवंदन करण्यात आले. पालकमंत्री नसतांना सलग पाचव्यांदा महाजनांकडून ध्वजवंदन करण्यात आले. महाराष्ट्र स्थापना दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या भाषणाकडे लक्ष लागलं आहे. कार्यक्रमस्थळी विशेष पोलीस बंदोबस्तही तैनात आहे.
-
-
बीडमध्ये आज महाराष्ट्र दिनानिमित्त सुनेत्रा पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण
महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री यांच्या हस्ते आज बीडमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण झाले.पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर हे ध्वजारोहण झाले. बीडच्या पालकमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांचा हा बीडचा पहिलाच दौरा आहे. यामुळे या दौर्याला महत्त्व आहे. त्यांनी हुतात्म्यांना अभिवादन केले आणि जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर त्या पुढील दौऱ्यासाठी हेलिकॉप्टरने छत्रपती संभाजीनगरकडे रवाना होणार आहेत.
-
ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण
१ मे रोजी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमित्ताने ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यात आज ध्वजारोहण करत आहेत. आज प्रत्येक जण एकमेकांना महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा देतात.
-
हुतात्मा स्मारकाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अभिवादन
आज महाराष्ट्र दिन निमित्ताने राज्यभरात विविध ठिकाणी अभिवादनाचे कार्यक्रम पार पडत आहेत. मुंबईतील हुतात्मा चौक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हुतात्म्यांना अभिवादन केले. राज्याच्या स्थापनेसाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांच्या स्मृतींना मानवंदना देत मुख्यमंत्र्यांनी कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आज महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन आहे. 108 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर महाराष्ट्र भाषिक राज्य अस्तित्वात आलं. हा केवळ भाषेचा लढा नव्हता. तर स्वाभिमान आणि अभिमानाचा लढा होता. मराठी राज्य अस्तित्वात आलं. चांद्यापासून बांद्यापर्यंत देशाला घडवणारं राष्ट्र अस्तित्वात आलं. दिल्लीचं तख्त राखणारा महाराष्ट्र अशी डौलदार आणि शानदार बिरुदावली महाराष्ट्राला मिळाली. आजही देशाच्या विकासात, प्रगतीत महाराष्ट्र सर्वात अग्रेसर राज्य आहे. महाराष्ट्राने देशाला दिशा देण्याचं काम वेळोवेळी केलं आहे. आज सकाळीच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं. त्यांनी राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यातील प्रशासकीय इमारती काल रात्रीपासून रोषणाईने उजळून निघाल्या.
तर काल विधान परिषद निवडणूक अखेर बिनविरोध होण्याचा मार्ग काँग्रेसमुळे मोकळा झाला. काँग्रेसने महाविकास आघाडीत दुसरा उमेदवार उभा केला नाही. त्यामुळे निवडणूक टळली. तर विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत सातव या उभ्या आहेत. राज ठाकरे हे मराठी हृदयसम्राट असे बॅनर पुण्यात झळकले आहेत. मराठी बोलणार नाही अशी हिंमत येते कुठून असा सवाल ठाकरे यांनी काल सभेत विचारला.
Published On - May 01,2026 8:01 AM
