Maharashtra Election News LIVE : गुलाबराव पाटील नकली मंत्री असल्याचा संजय राऊत यांचा थेट आरोप
BMC Maharashtra Municipal Corporation Election 2026 News LIVE Updates : मुंबई महापौर पदाचा पेच सुटणार? एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आज संभाव्य बैठक होण्याची शक्यता असून, मुंबईसह राज्यातील सत्ता समीकरणांवर चर्चा होणार आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
पंढरपूर येथे होणाऱ्या माघीवारीनिमित्त सोलापुरात पहिले गोल रिंगण
पंढरपूर येथे होणाऱ्या माघीवारीनिमित्त सोलापुरात पहिले गोल रिंगण पार पडले. माघीवारी निमित्त भगवे ध्वज घेत शेकडो वारकऱ्यांसह गोल रिंगण सोहळा संपन्न झाला. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मुक्ताई यांची पालखी आल्यानंतर गोल रिंगण सोहळ्याला सुरुवात झाली. शहरातील नार्थकोट प्रशालेच्या प्रांगणामध्ये गोल रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गोल रिंगणासाठी मृदंग वादक, डोक्यावर तुळस घेऊन महिला भगिनींचा सहभाग पाहायला मिळाला. मागील 200 वर्षांपासून सोलापूर ते पंढरपूर माघवारी पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येतेय.
-
नाशिकच्या सातपूर भागातील अशोक नगर भाजी मार्केट परिसरात भीषण अपघात
गाडीच्या धडकेत मायले का सह तिघे जखमी. संताप्त जमावाकडून धडक देणाऱ्या कारची तोडफोड. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरील तीन ते चार लोकांना दिली जोरदार धडक. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू
-
-
पंढरपूर येथे होणाऱ्या माघीवारीनिमित्त सोलापुरात पहिले गोल रिंगण पार पडले
माघीवारी निमित्त भगवे ध्वज घेत शेकडो वारकऱ्यांसह गोल रिंगण सोहळा संपन्न. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मुक्ताई यांची पालखी आल्यानंतर गोल रिंगण सोहळ्याला सुरवात. शहरातील नार्थकोट प्रशालेच्या प्रांगणामध्ये गोल रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. गोल रिंगणासाठी मृदंग वादक, डोक्यावर तुळस घेऊन महिला भगिनींचा सहभाग पाहायला मिळाला
-
गुलाबराव पाटील नकली मंत्री- संजय राऊत
गुलाबराव पाटील हे नकली मंत्री असल्याने अशी भाषा करतात म्हणत संजय राऊत यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
-
देवेंद्र फडणवीसांनी बैठकीत जाहीर करावे- संजय राऊत
बिहार भवनाला जागा देत आहोत, हे देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीत जाहीर करावे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
-
-
जालन्यात 30 जानेवारीला होणार महापौराची निवड, भाजपाकडून 4 महिला नगरसेविकांची नावे वरिष्ठांकडे
उपमहापौर आणि गटनेता पदासाठी जालन्यात रस्सीखेच होण्याची शक्यता,इच्छुकांकडून नेतेमंडळीकडे लॉबिंग करण्यास सुरुवात. महापौर पदाच्या आरक्षण सोडतीमुळे भास्कर दानवे आणि कैलास गोरंट्याल यांना फटका नगरपालिकेचे महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर जालना महानगरपालिकेच्या पहिल्यांदाच निवडणुका झाल्या आणि यामध्ये भाजपने 41 जागा जिंकत दणदणीत विजय मिळवला. येत्या 30 जानेवारीला जालना महानगर पालिकेचा महापौर ठरणार आहे.
-
नागपुरात शिवसेनेची नवी कार्यकारिणी जाहीर; किशोर कुमरियांकडे महानगर प्रमुखपदाची धुरा
नागपूर महानगरपालिका निवडणुकीतील पिछाडीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नागपूर शहरात संघटनात्मक बदलांचे मोठे पाऊल उचलले आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीपत्रकाद्वारे नागपूरची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, किशोर कुमरिया यांची महानगर प्रमुख पदी वर्णी लागली आहे. महापालिका निवडणुकीत पक्षाला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागल्याने आणि निवडणूक काळात तत्कालीन शहरप्रमुख नितीन तिवारी व किशोर कुमरिया यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याने हे फेरबदल महत्त्वपूर्ण मानले जात आहेत. संघटनेची पकड मजबूत करण्यासाठी शहराची विभागणी करत हरिभाऊ बानाईत, विक्रम राठोड आणि संदीप पटेल या तिघांची ‘शहरप्रमुख’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नव्या टीमसमोर आगामी काळात नागपूर शहरात शिवसेना पुन्हा उभारी देण्याचे मोठे आव्हान असणार आहे.
-
-
नाशिक सिंहस्थ कुंभमेळा : मार्च २०२७ पूर्वी सर्व विकासकामे पूर्ण करा; एकनाथ डवले यांचे कडक निर्देश
नाशिक: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे प्रस्तावित असलेली सर्व विकासकामे मार्च २०२७ पूर्वी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करा, असे स्पष्ट निर्देश ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सिंहस्थ कुंभमेळा पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी डवले यांनी विविध शासकीय यंत्रणांद्वारे सुरू असलेल्या कामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता पायाभूत सुविधा, रस्ते आणि नियोजित कामांना गती देण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. या बैठकीमुळे सिंहस्थ कामांच्या नियोजनाला आता अधिक वेग येण्याची शक्यता आहे.
-
नाशिक महापालिकेत भाजपचं क्लीनअप ऑपरेशन; वादग्रस्त चेहऱ्यांना डच्चू, नव्या नेतृत्वाला संधी
नाशिक महानगरपालिका निवडणुकीत ७२ जागांसह स्पष्ट बहुमत मिळवल्यानंतर आता भारतीय जनता पक्षाने महापालिकेत ‘नवे नेतृत्व’ देण्याची तयारी सुरू केली आहे. पक्षाची प्रतिमा जपण्यासाठी आणि कारभारात पारदर्शकता आणण्यासाठी यावेळेस वादग्रस्त चेहऱ्यांना पूर्णपणे डावलण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतला असल्याची माहिती समोर येत आहे. ज्या नेत्यांमुळे किंवा कार्यकर्त्यांमुळे पक्षाची बदनामी झाली किंवा ज्यांनी पक्षात राहून चुकीची कामे केली, त्यांना महापौर, उपमहापौर किंवा स्थायी समिती सभापती यांसारख्या महत्त्वाच्या पदांपासून दूर ठेवले जाणार आहे. या संदर्भातील एक सविस्तर अहवाल तयार करण्यात आला असून तो प्रदेश भाजपच्या कोअर कमिटीकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. आगामी काळात नाशिकमध्ये भाजपचे नवे आणि निष्कलंक चेहरे महापालिकेची धुरा सांभाळताना दिसणार आहेत.
-
नागपूरचा नवा महापौर कोण, ४ फेब्रुवारीला होणार निवड; महिला नेत्यांची मोर्चेबांधणी सुरू
नागपूर महानगरपालिकेच्या महापौरपदाचे आरक्षण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी सुटल्याने आता या पदावर कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या निवडीचा अधिकृत प्रस्ताव महानगरपालिका आयुक्तांकडे सादर करण्यात आला असून, त्यांच्या स्वाक्षरीनंतर तो विभागीय आयुक्तांकडे पाठवला जाईल. प्राप्त माहितीनुसार, येत्या ४ फेब्रुवारी रोजी महापौर निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे. दरम्यान, सत्ताधारी भाजपमध्ये अनेक महिला नेत्यांनी या पदासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून विविध नावांची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.
-
एमआयएमने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी रणशिंग फुंकले, उमेदवार मैदानात
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत ३३ जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या एमआयएमने (AIMIM) आता आपला राजकीय विस्तार ग्रामीण भागात करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात मिळवलेल्या घवघवीत यशानंतर पक्षाने आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत उडी घेतली आहे. एमआयएमने जिल्हा परिषदेच्या ६ गटांत आणि पंचायत समितीच्या १५ गणांत आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. भाजप-शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या संघर्षात आता एमआयएमच्या एन्ट्रीमुळे ग्रामीण भागातील निवडणुकीत चौरंगी लढत पाहायला मिळणार असून, यामुळे प्रस्थापित पक्षांच्या व्होट बँकेला सुरुंग लागण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
-
नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी दिलासा, छत्रपती संभाजीनगर मनपाकडून ५० लाखांच्या विकास निधीची तयारी
छत्रपती संभाजीनगर शहरात पहिल्यांदाच प्रभाग पद्धतीने निवडणूक पार पडल्यानंतर, आता नवनिर्वाचित नगरसेवकांसमोर प्रभागातील विकास कामे मार्गी लावण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. ही अडचण लक्षात घेऊन मनपा प्रशासनाने राज्यातील इतर मोठ्या महानगरपालिकांच्या धर्तीवर प्रत्येक नगरसेवकाला वार्षिक ५० लाख रुपयांचा स्वेच्छा निधी उपलब्ध करून देण्याचा विचार सुरू केला आहे. प्रभाग रचनेनुसार, एका प्रभागात चार नगरसेवक असल्यास त्या संपूर्ण प्रभागासाठी वार्षिक २ कोटी रुपयांची तरतूद अंदाजपत्रकात केली जाणार आहे. महापालिकेतील एकूण ११५ नगरसेवकांसाठी सुमारे ५७ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीची तरतूद आगामी अर्थसंकल्पात केली जाण्याची दाट शक्यता असून, यामुळे रस्ते, पाणी आणि स्वच्छतेच्या स्थानिक कामांना गती मिळणार आहे.
-
भिवंडीत नव्या राजकीय समीकरणाची नांदी, भिवंडी सेक्युलर फ्रंट सज्ज
भिवंडी महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका आणि महापौर पदाच्या शर्यतीसाठी शहरातील राजकीय वातावरण आता कमालीचे तापले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि समाजवादी पक्ष यांनी एकत्र येत भिवंडी सेक्युलर फ्रंटची अधिकृत घोषणा केली आहे. या महाआघाडीमुळे सत्ताधारी गटासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळणे आणि शहराच्या विकासासाठी एक समान कार्यक्रम राबवणे हा या फ्रंटचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे. या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी महापौर पदावर आपला झेंडा फडकवण्यासाठी आतापासूनच प्रभागांनुसार मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून, या नव्या युतीमुळे भिवंडीतील प्रस्थापित राजकीय गणिते पूर्णपणे बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबई महानगरपालिकेवर भगवा कोणाचा फडकणार आणि राज्याचा प्रथम नागरिक होण्याचा मान कोणाला मिळणार, याचा फैसला आता अंतिम टप्प्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आज वर्षा निवासस्थानी एक अत्यंत महत्त्वाची बैठक होण्याची दाट शक्यता आहे. या संभाव्य बैठकीत मुंबईसह ठाणे, पुणे आणि नाशिकसारख्या महत्त्वाच्या महापालिकांमधील सत्तास्थापनेच्या सूत्रावर चर्चा होऊ शकते. मुंबईतील संख्याबळाची जुळवाजुळव, मित्रपक्षांची भूमिका आणि अपक्षांना सोबत घेण्याची रणनीती यावर दोन्ही नेते शिक्कामोर्तब करण्याची चिन्हे आहेत. महायुतीचा महापौर बसवण्यासाठी जागावाटपाचा कोणता फॉर्म्युला ठरतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीनंतर मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
Published On - Jan 25,2026 8:56 AM
