Maharashtra News LIVE : देशभरात पेट्रोल – डिझेलचे दर 3 रुपयांनी वाढले… मुंबई, पुणे, नागपुरात पेट्रोलचे दर किती?
Maharashtra News LIVE : महागाई दिवसागणिक वाढत आहे. याचा फाटका सर्वसामान्य जनतेच्या खिशाला पडत असून, गृहिणींच्या महिन्याचं गणित बिघडत आहे. सोनं - चांदी, पेर्टोल - डिझेल सोबतच, भाजीपाल्यांचे दर देखील वाढले आग

LIVE NEWS & UPDATES
-
ठाण्यात सीएनजीनंतर पेट्रोल डिझेलच्या दरांत तीन रुपयांनी वाढ
ठाण्यात सीएनजीनंतर पेट्रोल डिझेलचे दर तीन रुपये ने वाढ झाली आहे… आजचे पेट्रोलचे 106 रुपये 73 पैसे तर डिझेलचे 93.23 पैसे दर दिसून येत आहे.. त्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे… तर काहींचं म्हणणं आहे की इलेक्ट्रिक गाड्या देखील महाग असल्यामुळे घेतलेल्या गाड्याचे काय करायचे … सरकारने पेट्रोल डिझेल दरवाढ कमी करावी अशी देखील मागणी यावेळेस वाहन चालकांनी केली आहे.
-
मुंबई महापालिकेकडून देवनार डंपिंग ग्राउंडवरील तब्बल २ कोटी टन कचऱ्याच्या निर्मूलनासाठी मोठी मोहीम
कचरा व्यवस्थापनासाठी ६४८ कोटी रुपयांचा ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. जैविक प्रक्रियेद्वारे कचरा निर्मूलनासाठी २,३६८ कोटी रुपयांचा बायोरिमेडिएशन प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पातून दररोज ६०० ते १,८०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. प्रकल्पाचे काम चेन्नई एमएसडब्ल्यू प्रा. लि. कंपनीकडे सोपवले आहे. एमपीसीबीच्या मंजुरीनंतर प्रकल्पाचे टप्प्याटप्प्याने कार्यान्वयन सुरू आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी जमीन मोकळी करण्याचे उद्दिष्ट हाती घेण्यात आले आहे. संपूर्ण बायोरिमेडिएशन प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी ३ ते १४ वर्षांचा कालावधी लागू शकतो…
-
-
मुंबई आणि नवी मुंबईसह एमएमआर परिसरात भाजीपाल्याच्या दरात ५० टक्क्यांनी वाढ
तीव्र उष्णता, कमी पुरवठा आणि वाहतुकीदरम्यान होणारे नुकसान यामुळे दरवाढ करण्यात आली आहे. फ्रेंच बीन्सचा दर २०० रुपये प्रति किलोवर; आठवडाभरापूर्वी १३०-१७० रुपये होता. हिरवी मिरची १०० रुपयांवरून १५० रुपये प्रति किलो. टोमॅटोचे दर दुपटीने वाढले; २५ रुपयांवरून ५०-६० रुपये प्रति किलो, लिंबू ५ ते ७ रुपये नग दराने विक्री, कोथिंबिरीच्या जुडीचे दर ४०-६० रुपये; यापूर्वी ३०-४० रुपये होते, पापडी आणि फ्लॉवरचे दर १००-१२० रुपये प्रति किलोपर्यंत वाढले, गवार १२० ते १६० रुपये प्रति किलो दराने विक्री, वाशी एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक २०-३० टक्क्यांनी घटली आहे. पुणे, सातारा, सोलापूर आणि नाशिक भागातील उष्णतेमुळे पिकांचे नुकसान झालं आहे. वाहतुकीदरम्यान भाजीपाला लवकर खराब होत असल्याने व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे.
-
शिवसेना शिंदे गटाचे खासदार, भाजप आमदार, महापौरांचा एकाच वाहनातून प्रवास
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसेना शिंदे गटाचे खासदार, भाजप आमदार, महापौरांनी एकाच वाहनातून प्रवास केला आहे. अक्कलकोट येथील केंद्रीयमंत्री नितीन गडकरींच्या कार्यक्रमासाठी एकत्र प्रवास केला. शिवसेना खासदार ज्योती वाघमारे, भाजपा आमदार देवेंद्र कोठे, सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल यांनी एकाच गाडीतून प्रवास केला.
-
गाडीचा धक्का लागल्याने दोन गटांमध्ये वाद आणि तोडफोड
धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील इटकळ येथे गाडीचा धक्का लागल्याने दोन गटांमध्ये वाद आणि तोडफोड झाली. सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. जमावाकडून ईटकळ येथे मंगल कार्यालयात तोडफोड, गोंधळ, घटनेचा सीसीटीव्ही समोर आला आहे. ईटकळ येथील स्थानिकाकडून बाहेरगावच्या वऱ्हाडी मंडळींना महिलांना मारहाण केल्याची माहिती समोर येत आहे. दोन्ही गटातील गोंधळ करणाऱ्या विरोधात नळदुर्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
-
वाहनांवर १ जुलैपासून ‘एचएसआरपी’ अनिवार्य
राज्यातील वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी; तसेच आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने वाहनांची ओळख अधिक सुरक्षित राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना १ जुलै पासून उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (एचएसआरपी) पाटी बसविणे अनिवार्य केले आहे. यासाठी यापूर्वी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र राज्यातील एचएसआरपीच्या अंमलबजावणीसंदर्भात आढावा घेतल्यानंतर वाहनधारकांची गैरसोय टाळण्यासाठी आता ही मुदत ३० जून २०२६ पर्यंत वाढवण्यात आली आहे.
-
वसई किल्ल्यात मित्राचा मैत्रिणीवर प्राणघातक चाकू हल्ला
वसई किल्ल्यात 21 वर्षीय तरुणीवर तिच्या मित्राने चाकू हल्ला केला आहे. आपल्या सोबत मैत्री असताना मैत्रीण दुसऱ्या सोबत ही मैत्री वाढवत असल्याच्या संशयावरून पहिल्या मित्राने मैत्रिणीला वसई किल्ल्यात बोलावून, तिच्यावर धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109, 351 (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला वसई पोलिसांनी अटक केले आहे. संचित डॉमाणिक बला ( वय 23) असे अटक आरोपीचे नाव असून हा वसईच्या पाचूबंदर येथील रहिवासी आहे.
-
-
अंबरनाथमध्ये युतीवरून शिवसेनेतच अंतर्गत नाराजी
अंबरनाथमध्ये युतीवरून शिवसेनेतच अंतर्गत नाराजी दिसत आहे. काहींनी निवडणुकीत भाजपसाठी काम केलं…’ असं वक्तव्य सेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी केलं आहे. भाजपने स्वतःहून युतीची मागणी करायला हवी होती. सेना-भाजप युतीवरून आता शिवसेनेतच मतभेद दिसून येत आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून महागाई गगनाला भिडताना दिसत आहे. सोनं – चांदीनंतर आता इंधनांच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. देशभरात पेट्रोल – डिझेलचे दर 3 रुपयांनी वाढले असून मुंबई, पुणे, नागपुरात पेट्रोलच्या दरांनी 100 चा आकडा पार केला आहे. मुंबईत पेट्रोलचे दर 106.50 रुपये, पुण्यात 106.95 रुपये आणि नागपुरात पेट्रोलचे दर 107.18 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. ज्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसताना दिसत आहे. एवढंच नाही तर, मुंबई आणि नवी मुंबईसह एमएमआर परिसरात भाजीपाल्याच्या दरात 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत दर उच्च पातळीवर राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर काही भागात पाणीटंचाईमुळे शेतीवर परिणाम झाल्याने उत्पादनही घटले, ज्याचा परिणाम भाजीपाल्यांच्या किंमतींवर होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाशी एपीएमसी मार्केटमध्ये भाजीपाल्याची आवक 20 – 30 टक्क्यांनी घटली आहे. पुणे, सातारा, सोलापूर आणि नाशिक भागातील उष्णतेमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अशाच देशातील, परदेशातील, राजकीय, क्रिडा आणि मनोरंजनाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी फॉलो करा हा ब्लॉग…
Published On - May 15,2026 8:01 AM
