Maharashtra News LIVE : राज्यात उष्णतेचा मोठा भडका, थेट तापमान 46 अंश सेल्सिअसच्या पुढे..
टीसीएस प्रकरणातील फरार निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होणार आहे. तर दुसरीकडे, राज्यात मलेरियाचं संकट डोकं वर काढत आहे. अशात देश, विदेशातील, राज्य, राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रातील ठळक घडामोडी जाणून घेण्यासाठी फॉलो करा हा ब्लॉग...

LIVE NEWS & UPDATES
-
जळगाव शहरातील मानराज पार्क चौफुलीवर भरधाव ट्रकने दुचाकीस्वराला चिरडले
या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. ओम सुनील गिरी असे 25 वर्षीय मयत तरुणाचे नाव आहे. घटनास्थळी मयत तरुणाच्या आईसह बहिणीचा मोठा आक्रोश. अपघातामुळे काही वेळासाठी दुतर्फ वाहतूक काही काळासाठी विस्कळीत. नागरिकांच्या मदतीने मृतदेह जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला आहे.
-
मुंबईच्या अंधेरी पश्चिम वर्सोवा भागात मनसे कडून अनोखा उपक्रम
परप्रांतीय रिक्षा चालकांना मराठी शिकण्यासाठी मनसे कडून मराठी पुस्तकाचा वाटप. 1 मे पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी बोलणं आणि समजणं यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून मराठी सक्ती करण्यात आली आहे.मराठी सक्ती होणार असल्यामुळे काही रिक्षा आणि टॅक्सी चालकांमध्ये भीतीच्या वातावरण पसरला आहे. काही रिक्षा आणि टॅक्सी चालक मुंबई शहरात दहा ते पंधरा वर्षांपासून राहतात मात्र या परप्रांतीय रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी येत नाही. अशा रिक्षा आणि टॅक्सी चालकांना शिकण्यासाठी सात दिवसांसाठी मनसे कडून मराठी पुस्तक वाटून अल्टिमेटम देण्यात आला आहे
-
-
भोंदू राजेंद्र गडगेला कोर्टात करणार हजर..
चार दिवसाची पोलीस कोठडी आज संपणार. संगमनेर पोलीस न्यायालयात हजर करण्याची हि तिसरी वेळ. भोंदू गडगे 9 दिवसांपासून पोलिस कोठडीत. मंत्र तत्राने कॅन्सर तसेच दुर्धर आजार बरे करण्याचा दावा करणारा भोंदू गडगे झालाय गजाआड. अंनिसच्या तक्रारीनंतर भोंदू गडगे गजाआड. आज पुन्हा गडगेला न्यायालयात करणार हजर. पोलीस आज आणखी वाढीव कोठडी मागणार. संगमनेर जिल्हा सत्र न्यायालय पोलीस कोठडी देणार की न्यायालयीन? याकडे लक्ष…
-
आजपासून राज्यभरातील कृषी केंद्र चालकांचा बेमुदत बंदला सुरुवात
राज्यातील सर्व 85 हजार कृषी सेवा केंद्र तर जळगाव जिल्ह्यातील साडे तीन हजार कृषी केंद्र चालक बंद मध्ये सहभागी. जळगावातील मार्केट मधील कृषी केंद्र व बियाण्यांची विक्री करणारे दुकान बंद असल्याचा पाहायला मिळत आहे. अनधिकृत एचटीबीटी बियाण्यांची विक्री थांबवावी, खत कंपन्यांकडून केल्या जाणाऱ्या ‘लिंकिंग’ पद्धती बंद करावी. नवीन बियाणे व कीटकनाशक कायद्याच्या जाचक अटी रद्द करावेत या प्रमुख मागण्यांसह प्रलंबित विविध मागण्यांसाठी कृषी केंद्र चालक आक्रमक. कृषी केंद्र बेमुदत बंद असल्यामुळे बियाणे तसेच कीटकनाशकांचे विक्री ठप्प होणार असून पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागणार आहे
-
नीलम गोऱ्हे यांच्या संभाव्य उमेदवारीला शिवसनेच्या काही स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून विरोध
स्थानिक स्तरावर कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी देणे अधिक योग्य ठरेल. त्यामुळे या निर्णयावर पुनर्विचार करण्याची पक्षाकडे मागणी करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, शिवसेना पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून या विषयावर अद्याप अंतिम निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. पक्षामध्ये अंतर्गत चर्चा सुरू असून, सर्व मतांचा विचार करून उमेदवारी निश्चित केली जाईल अशी देखील माहिती सुत्रांनी दिली आहे. पक्षनिष्ठा आणि स्थानिक जनसंपर्क लक्षात घेऊन उमेदवार निवडणे गरजेचे आहे. अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. तर दुसरीकडे, नीलम गोऱ्हे यांच्या समर्थकांनी त्यांच्या अनुभवाचा आणि संघटनात्मक कामगिरीचा उल्लेख करत उमेदवारीसाठी त्या योग्य असल्याचा दावा केलाय.
-
-
अंबड तालुक्यातल्या कुक्कडगाव येथे गळफास घेऊन 44 वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या
जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील कुक्कडगाव येथे ज्ञानेश्वर गायकवाड या 44 वर्षीय शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली, सध्या शेतातील ज्वारी काढण्याचा हंगाम सुरू असून घरातील सर्वजण सकाळीच शेतात निघून गेले होते, त्यामुळे घरात कोणी नसल्याचे पाहून ज्ञानेश्वर गायकवाड यांनी घरातल्या अँगलला वायरच्या सहाय्याने गळफास घेतलाय. ज्ञानेश्वर गायकवाड हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांना केवळ नव गुंठे जमीन आहे. त्यांच्याकडे महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि काही खाजगी सावकारांचा देखील कर्ज असल्याची माहिती समोर आली त्यामुळे याच विवंचनेत मागच्या काही दिवसापासून ते नेहमी नैराश्यात आणि चिंतेत असायचे. त्यामुळे याच कारणावरून त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलाय, दरम्यान या घटने प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
-
नाशिक शहरात उष्णतेचा कहर, तापमान ४१.४ अंशांवर
नाशिक शहरात उष्णतेचा कहर पाहायला मिळत आहे, तापमान ४१.४ अंशांवर पोहोचला आहे. यंदाच्या हंगामातील उच्चांक गाठला असून उष्णतेची तीव्र लाट कायम आहे. दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडले असून नागरिकांनी बाहेर पडणे टाळले आहे. सलग १०-१२ दिवसांपासून तापमान ३९ अंशांच्या पुढे आहे. रात्रीही उकाडा कायम आहे. पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
-
-
बदनापूर शहरातल्या कॅनरा बँकेतील अपहार प्रकरणी आरोपींची आज पोलीस कोठडी संपणार
जालना जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून बँक घोटाळा प्रकरणाची मालिका सुरू आहे, अशातच बदनापूर शहरातील कॅनरा बँकेत देखील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारत जवळपास सात कोटी 31 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून ताब्यात घेतलेला बँक मॅनेजर विजेंद्र पाटणकर आणि सुवर्णकार प्रवीण बुऱ्हाडे या दोघांची आज पोलीस कोठडी संपणार असल्याने त्यांना पुन्हा एकदा न्यायालयात हजर केलं जाणार आहे, बँक अधिकारी संजय डोंगरे हा फरार असल्यामुळे पोलिसांकडून सखोल तपास करण्यासाठी या आरोपींची वाढीव पोलीस कोठडी मागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान या अपहर प्रकरणात बदनापूर पोलिसांकडून सध्या चारही बाजूने सखोल तपास करण्यात येत आहे, त्यामुळे या प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
-
लासलगाव सह परिसरात चोरांचा सुळसुळाट
कोयता हातात घेऊन चोरीसाठी आलेला चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सुट्ट्यांमध्ये बाहेरगावी जायचं की नाही या भीतीमुळे नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झालं आहे. गाव भागासह कॉलनीमध्ये पोलीसग्रस्त वाढवण्याची नागरिकांनी मागणी केली आहे.
-
गुंतवणुकीच्या आमिषाने सैन्याच्या जवानाची २२ लाखांची फसवणूक
नाशिक येथे गुंतवणुकीच्या आमिषाने सैन्याच्या जवानाची २२ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. एसआयपीच्या नावाखाली आरोपीने विश्वास संपादन करून कागदपत्रे घेतली. फिर्यादीच्या नावावर बँकेत कर्ज काढून रक्कम स्वतःच्या खात्यात वळवली आहे. प्रकार जून २०२५ मध्ये घडला असून एप्रिल २०२६ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध सुरू आहे.
-
नाशिक विमानतळावरील प्रवासीसंख्येत २४ टक्क्यांची मोठी वाढ
नाशिक विमानतळावरील प्रवासीसंख्येत २४ टक्क्यांची मोठी वाढ झाली आहे. २०२५-२६ मध्ये ४.२१ लाख प्रवाशांनी हवाई प्रवास केला. कार्गो निर्यातीत तिप्पट वाढ, ४७० टनांपर्यंत झेप घेण्यात आली आहे. मार्च महिन्यातच ४० हजारांहून अधिक प्रवाशांची नोंद करण्यात आली आहे. दिल्ली, बेंगळुरू, अहमदाबाद, गोवा, हैदराबादसाठी सेवा उपलब्ध आहेत.
-
बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत आणि झेडपी अध्यक्ष दिपक वैद्य यांनी केला मनमुराद डान्स
बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत आणि झेडपी अध्यक्ष दिपक वैद्य यांनी मनमुराद डान्स केला . ‘मै हूं डॉन’ गाण्यावर सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसलेंच्या गाण्यावर त्यांनी ठेका धरला . बार्शीतील भगवंत महोत्सवावेळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी ठेका धरला. मागील सात दिवसापासून बार्शीचे ग्रामदैवत प्रकटदिनानिमित्त भगवंत महोत्सवात सुरु आहे.
-
मेळघाटात कुपोषणाचे सावट कायम वर्षभरात 92 बालके आणि 5 मातांचा मृत्यू…..
मेळघाटात कुपोषणाचे सावट कायम असून वर्षभरात 92 बालके आणि 5 मातांचा मृत्यू झाला आहे. मेळघाटात आरोग्य सुविधांचा अभाव कायम असून मेळघाटातील बालमृत्यूवर यापूर्वीच न्यायालयाने ताशेरे ओढले आहे. एप्रिल 2025 ते मार्च 2026 या एका वर्षात बालकांच्या मृत्यूची हादरवनारी आकडेवारी समोर आली आहे. एका महिन्याच्या आतील तब्बल साठ बालकांचा मेळघाटात मृत्यू झाला आहे.
टीसीएस प्रकरणातील फरार निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होणार आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून निदा खान फरार असून गर्भवती असल्याचं कारण देत जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. धार्मिक भावना दुखावणे व धर्मांतर प्रयत्नाचे निदा खानवर हिच्यावर गंभीर आरोप आहेत. तर दुसरीकडे मेट्रो 5 च्या विस्तारासाठी 18 हजार 130 कोटींच्या निधीला मंजूरी देण्यात आली असून कल्याणपासून उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरपर्यंत होणार मेट्रोचा विस्तार होणार आहे. तर राज्यात मलेरियाच्या रुग्णांची देखील वाढ होत आहे. राज्यात गेल्या वर्षी मलेरियाच्या एकूण 23 हजार 247 रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यापैकी 27 रुग्णांचा मृत्यू झालातर, एकट्या मुंबईत 10 हजार 162 रुग्ण सापडले असून, 7 रुग्ण मृत पावले आहेत… अशात देश, विदेशातील, राज्य, राजकारण आणि मनोरंजन क्षेत्रातील ठळक घडामोडी जाणून घेण्यासाठी फॉलो करा हा ब्लॉग…
Published On - Apr 27,2026 8:04 AM
