Maharashtra Rain LIVE | कोल्हापूरला रेड अलर्ट असल्याने मुख्यमंत्री ठाकरेंचा दौरा रद्द
गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी अक्षरशः ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला. त्यामुळे अनेक भागात पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. रायगड, रत्नागिरीत पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून सारा भाग पाण्याखाली गेला होता.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी अक्षरशः ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला. त्यामुळे अनेक भागात पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. रायगड, रत्नागिरीत पाण्याने धोक्याची पातळी ओलांडून सारा भाग पाण्याखाली गेला होता. तर पश्चिम महाराष्ट्रात सातारा, कोल्हापूर भागात आकाश फाटल्यासारखा पाऊस पडत होता. अनेक ठिकाणी पडणाऱ्या या पावसामुळे सर्वच नद्यांनी रौद्र स्वरूप धारण केले होते. या मुसळधार पावसाने राज्यापुढे एक नवे संकट उभं राहिलं आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
पंकजा मुंडे यांची गुरुवारी परळी शहरातून पुरग्रस्तांसाठी मदतफेरी
परळी : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या गुरुवारी सकाळी अकरा वाजता परळी शहरातून पुरग्रस्तांसाठी मदतफेरी काढणार असून, त्याद्वारे जमा होणारी मदत कोल्हापूर, सांगली, कोकण भागातील पुरग्रस्तांसाठी पाठविण्यात येणार आहे.
-
कोल्हापूरला रेड अलर्ट असल्याने मुख्यमंत्री ठाकरेंचा दौरा रद्द
मुंबई : कोल्हापूरला रेड अलर्ट असल्याने मुख्यमंत्री यांचा दौरा रद्द
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापूर पूरग्रस्त भागाची करणार होते पाहणी
-
-
माझी प्रकृती अत्यंत उत्तम आहे, काळजी करण्याचे कारण नाही : जयंत पाटील
जयंत पाटील यांची प्रकृती उत्तम. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने माझी प्रकृती अत्यंत उत्तम आहे. काळजी करण्याचे कारण नाही. नियमित तपासणीसाठी मी रुग्णालयात गेलो होतो. डॉक्टरांनी मला विश्रांती घेण्याची सूचना केली आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. मी लवकर पुन्हा आपल्या सेवेत रुजू होईल, असे जयंत पाटील यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे.
-
तळीये गावाच्या जवळच पुनर्वसन केलं जाईल : आदिती तटकरे
मुंबई : एनडीआरएफचा बेस कॅम्प रायगडमध्ये असावा अशी विनंती केली होती. एसडीआरएफचा बेस कॅम्प तरी रायगडमध्ये द्यावा अशी मागणी केली होती. आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. महाडमध्ये एक जागा उपलब्ध करुन तिथे हा बेस कॅम्प उभारला जाईल. पुनर्वसनाबाबत बाधितांवर जोर जबरदस्ती न करता त्यांच्या विनंतीप्रमाणेच पुनर्वसन केलं पाहिजे. जिथे तळीये गाव होतं. त्या गावाच्या जवळच पुनर्वसन केलं जाईल, असा निर्णय सरकारने घेतलाय. त्यावर लवकर अंमलबजावणी केली जाईल, असे आदिती तटकरे म्हणाल्या.
तळीये गावातील लोकांचं पुनर्वसन त्यांनी सांगितलेल्या जागी 6 महिन्यात केले जाईल. त्यांच्या इच्चेनुसारच त्यांच्या पुनर्वसनाबाबत सरकार निर्णय घेईल.
-
ठाकरे सरकार एनडीआरएफचा एक बेस कॅम्प रायगडमध्ये उभारणारण्याची शक्यता, आदिती तटकरे यांचे संकेत
रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरी यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :
एनडीआरएफचा बेस कॅम्प रायगडमध्ये असावा अशी विनंती केली होती. एसडीआरएफचा बेस कॅम्प तरी रायगडमध्ये द्यावा अशी मागणी केली होती. आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. महाडमध्ये एक जागा उपलब्ध करुन तिथे हा बेस कॅम्प उभारला जाईल. पुनर्वसनाबाबत बाधितांवर जोर जबरदस्ती न करता त्यांच्या विनंतीप्रमाणेच पुनर्वसन केलं पाहिजे. जिथे तळीये गाव होतं. त्या गावाच्या जवळच पुनर्वसन केलं जाईल, असा निर्णय सरकारने घेतलाय. त्यावर लवकर अंमलबजावणी केली जाईल, असं रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं.
-
-
वाशिम जिल्ह्यात सायंकाळी काही ठिकाणी दमदार पावसाला सुरुवात
वाशिम : वाशिम जिल्ह्यात सायंकाळी काही ठिकाणी दमदार पावसाला सुरुवात
चार दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा वाशिम जिल्ह्यात पावसाला सुरुवात
आज चालू असलेल्या पावसामुळे पिकांना मिळणार नवसंजीवनी
शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
-
अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी 10 कोटींची मदत
कोल्हापूर : अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी पूरग्रस्तांसाठी 10 कोटींची मदत जाहीर केलीय
आज त्यांनी भुदरगड तालुक्यात ग्रामीण भागात जाऊन नुकसानीची पाहणी केली
यावेळी त्यांनी पूरग्रस्तांसाठी तब्बल दहा कोटींची मदत जाहीर केली आहे.
-
रायगडमध्ये एनडीआरएफचा बेस कँप उभारण्यास मंजुरी
मुंबई : रायगडमध्ये एनडीआरएफचा बेस कँप उभारणार
राज्य सरकारनं अलिबाग इथं बेस कँपला मंजुरी दिली
-
अकोल्यात जोरदार पावसाला सुरुवात
अकोला : अकोल्यात जोरदार पावसाला सुरुवात
अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस
-
कृष्णेची पाणीपातळी 55 फुटावरून 43 फुटावर, पूर ओसरताच पंचनामे होणार
सांगली - कृष्णेची पाणीपातळी हळूहळू ओसरत आहे
कृष्णेची पातळी 55 फुटावरून 43 फुटावर आली आहे
पूर ओसरताच पंचनामे होणार
-
कोयना धरणाचा पाणीसाठा 90.88 टीएमसीपर्यंत पोहोचला
कोयना धरणाचा पाणीसाठा 90.88 टीएमसी झाला
105 tmc कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता
कोयना पाणलोट क्षेत्रात पाऊस मंदावला
धरणात 27186 कयुसेक पाणी आवक सुरु
धरणाचे सहा दरवाजे 5 फुटावर स्थिर
33266 कयुसेक पाणी विसर्ग कोयना नदीपात्रात सुरु
-
रावेर सातपुडा पर्वताने हिरवा शालू परिधान केला
जळगाव
रावेर सातपुडा पर्वताने हिरवा शालू परिधान केला
-रावेर सातपुड्याच्या कुशीत वसलेले पाल अभयारण्य मान्सूनच्या आगमनानंतर जणू
- सातपुडा पर्वताने हिरवा शालू परिधान केला
जिल्ह्यातील पाल अभयारण्य एक निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण आहे
पाल अभयारण्य अनेक हिरव्यागार वनसंपत्ती आणि वन्यप्राण्यांनी नटलेलं क्षेत्र आहे
अभयारण्य एक समृद्ध वृक्षसंपदेबरोबरच आदिवासी संस्कृतीची ओळख
कोरोना प्रादुर्भावामुळे सलग दुसऱ्या वर्षीही पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी बंद आहे
रे व इको-टुरिझम मला गती देणारे असे पर्यटन स्थळ आहे.
-
मनसे नेते अमित ठाकरे आजपासून नाशिक दौऱ्यावर
नाशिक -
मनसे नेते अमित ठाकरे आजपासून नाशिक दौऱ्यावर
दुपारपर्यंत नाशिकला पोहोचणार अमित ठाकरे
आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्शवभूमीवर अमित ठाकरे घेणार आढावा
मनसे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी करणार वन टू वन चर्चा
आढावा घेऊन मनसे अध्यक्षांना पाठवणार अहवाल
अमित ठाकरे यांच्याकडे नाशिक महापालिकेची जवाबदारी येण्याची शक्यता
-
कोकणातील अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावला मराठा क्रांती मोर्चा
औरंगाबाद -
कोकणातील अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावला मराठा क्रांती मोर्चा
राज्यातील अतिवृष्टी ग्रस्तांसाठी पाठवणार अन्नधान्याची मदत
मराठा क्रांती मोर्चाकडून अन्नधान्य संकलन केंद्र सुरू
अतिवृष्टी ग्रस्तांसाठी अन्नधान्य मदत करण्याचं आवाहन
आतापर्यंत चार क्विंटल अन्नधान्य झाले जमा
जमा झालेले अन्नधान्य 29 तारखेला मराठा क्रांती मोर्चा पाठवणार कोकणात
मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक सुनील कोटकर यांच्या नेतृत्वात केली जाणार मदत
-
महापुरामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शेतीचं 66 कोटीच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज
कोल्हापूर :
महापुरामुळे जिल्ह्यात शेतीचं 66 कोटीच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज
पुरामुळे 58 हजार 500 हेक्टर जमिनीवरील पिके झाली बाधित
करवीर,शिरोळ आणि हातकणंगले या तालुक्यांना सर्वाधिक फटका
ऊस भात सोयाबीन भुईमूग पिकांना सर्वाधिक नुकसान
शेतातील पाणी कमी झाल्या नंतरच पंचनामे केले जाणार
-
मुंबईत बऱ्याच ठिकाणी आज ढगाळ वातावरण
मुंबईत बऱ्याच ठिकाणी आज ढगाळ वातावरण
जोरदार, मुसळधार पावसाची नोंद अद्याप नाही
मुंबई आणि उपनगरात काही ठिकाणी रिमझीम पावसाची नोंद
दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची तसेच काही ठिकाणी पाऊस जोरदार हजेरी लावण्याची शक्यता
-
हतनूर धरणाचे 36 दरवाजे पूर्णपणे उघडले
भुसावळ तालुक्यातील हातनूरचे दरवाजे गेल्या दोन दिवसापासून उघडलेले
हतनूर धरणाचे 36 दरवाजे पूर्णपणे उघडले
धरणातून 15750 हजार क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू
हातनुर धरणाचे संपूर्ण दरवाजे उघडले
Published On - Jul 28,2021 6:50 AM