AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महायुतीच्या नेत्यांच्या मैत्रीत मिठाचा खडा, रावसाहेब दानवे यांच्या त्या वक्तव्यावरुन शिंदे सेनेचे मंत्री आक्रमक

Raosaheb Danve and Abdul Sattar: मी कुणाच्याही विरोधात दंड थोपटत नाही. राजकारणात नेहमी सतर्क असतो. कुणाचेही दंड थोपटण्याची वाट पाहत नाही. मी लंगोट लावून तयार असलेला पहिलवान आहे. पाकिस्तान मुद्द्यावर लोकांना तीस वर्षांनी आठवण येते.

महायुतीच्या नेत्यांच्या मैत्रीत मिठाचा खडा, रावसाहेब दानवे यांच्या त्या वक्तव्यावरुन शिंदे सेनेचे मंत्री आक्रमक
Raosaheb Danve and Abdul Sattar
| Updated on: Sep 19, 2024 | 11:15 AM
Share

राज्यात महायुतीचे सरकारमध्ये सर्व काही सुरळीत असल्याचे चित्र समोर आणले जात आहे. परंतु घटकपक्षांमधील नेत्यांमध्ये वाद अन् टीका टिप्पणी सुरुच असते. मतदार संघात वर्चस्व मिळवण्यासाठी कुरघोडी केली जात आहे. आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भाजप आणि शिवसेनामधील दोन बड्या नेत्यांचा वाद समोर आला आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते रावसाहेब दानवे यांनी केलेले वक्तव्य एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांना चांगलेच बोचले आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांच्या मैत्रीत मिठाचा खडा पडला आहे. रावसाहेब दानवे नुकतेच अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदार संघात गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी हे सिल्लोड आहे की पाकिस्तान? असे वक्तव्य केले होते. त्यावरुन अब्दुल सत्तार समर्थकांनी गुरुवारी सिल्लोड बंदची हाक दिली आहे.

आज सिल्लोड बंद

माजी मंत्री रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ आज सिल्लोड बंदची हाक देण्यात आली आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांच्या समर्थकांनी सिल्लोड शहर बंदची हाक दिली आहे. दानवे यांच्या निषेधार्थ आज मोर्चा देखील काढण्यात येणार आहे. रावसाहेब दानवे यांच्या विरोधात अब्दुल सत्तार समर्थक नाराज झाले आहेत.

तीन वर्षांनी आठवण येते…

रावसाहेब दानवे यांच्या वक्तव्यावर बोलताना मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले की, मी कुणाच्याही विरोधात दंड थोपटत नाही. राजकारणात नेहमी सतर्क असतो. कुणाचेही दंड थोपटण्याची वाट पाहत नाही. मी लंगोट लावून तयार असलेला पहिलवान आहे. पाकिस्तान मुद्द्यावर लोकांना तीस वर्षांनी आठवण येते. आता मला त्याचे आश्चर्य वाटत आहे.

दोन्ही नेत्यांमधील वाद काय?

जालना लोकसभा मतदार संघातून तत्कालीन केंद्रीय मंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते रावसाहेब दानवे यांना लोकसभा निवडणूक लढवली होती. परंतु या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. या पराभवामागे अब्दुल सत्तार असल्याचा जाहीर आरोप रावसाहेब दानवे यांनी केला होता. त्यानंतर दानवे यांनी सत्तार यांच्याविरोधात मोहीमच सुरु केली आहे. त्यामुळेच अब्दुल सत्तार यांच्या मतदार संघात जावून सिल्लोड आहे की पाकिस्तान आहे? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.