AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मराठा आंदोलक आक्रमक, विखे पाटील यांच्या बंगल्यात मांडला ठिय्या! जरांगे आणि सरकारचं वाजलं? कारण तरी काय?

Maratha Protesters Sit in at Vikhe Patil Bunglows: मराठा आंदोलक आक्रमक झाले. आज आंदोलकांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावर ठिय्या दिला. त्यामुळे उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे पाटील आणि सरकारचे पुन्हा वाजले की काय अशी चर्चा सुरू आहे. काय आहे महत्त्वाची अपडेट?

मोठी बातमी! मराठा आंदोलक आक्रमक, विखे पाटील यांच्या बंगल्यात मांडला ठिय्या! जरांगे आणि सरकारचं वाजलं? कारण तरी काय?
मराठा आंदोलक आक्रमक, विखे पाटलांच्या बंगल्यात ठिय्याImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Jun 09, 2026 | 11:14 AM
Share

Maratha Protesters Sit in at Vikhe Patil Bunglows: मराठा आंदोलक आक्रमक झाले. त्यांनी आज मराठा उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यावर ठिय्या दिला. मराठा उपसमितीची अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणासाठी पुढाकार घेतला. पण सरकार आता मागण्यांवर आणि आश्वासनांबाबत चालढकल करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील आणि सरकारचे वाजले की काय? अशी चर्चा होत आहे.

विखे पाटलांच्या बंगल्यात मांडला ठिय्या

मराठा आंदोलकांनी आज मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बंगल्यात धडक दिली. त्यांनी मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन केले. रमेश केरे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मागण्यांचे एक निवदेन विखे पाटील यांना दिले. त्यामुळे आतापर्यंत सरकारचे धन्यवाद आणि आभार मानत असतानाच अचानक असे काय झाले की मराठा आंदोलक आक्रमक झाले अशी चर्चा होत आहे. सरकार मराठा आंदोलकांच्या मागण्या आणि आश्वासनांबाबत चालढकल करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे ओबीसींच्या धरतीवर मराठा समाजासाठी 9 निर्णय असो वा इतर सवलती देणे असो यामुळे आंदोलकांचा मोठा विजय झाल्याचे मानले जात असतानाच ठिय्या आंदोलनाने सर्व काही आलबेल नसल्याचे समोर येत आहे.

जरांगेंच्या मागण्यांवर ठोस निर्णय नाही

राधाकृष्ण विखे पाटील हे मंत्रिमंडळ बैठकीसाठी रवाना होणार आहे. त्यापू्र्वीच आंदोलक त्यांच्या बंगल्यात धडकले. मराठा उपसमितीची अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणासाठी पुढाकार घेतला. पण मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर सरकार ठोस निर्णय होत नसल्याचा आणि सरकार निर्णयाबाबत चालढकल करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. मराठा उपसमितीने दिलेली आश्वासनं वेळेत पाळली जात नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. आंदोलक गनिमी कावा करत बंगल्यात शिरले आणि त्यांनी ठिय्या आंदोलन केले.

जरांगे पाटील यांचे उपोषण सोडतान सरकारने काही शासन निर्णय घेतले. या GR विरोधात आम्ही मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली. कारण या जीआरमध्ये, ज्या बांधवांच्या 1967 पूर्वीच्या कुणबी नोंदी असतील. अशाच बांधवांना मते कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल हे आतापर्यंत या बैठकीत विखे पाटील यांनी मान्य केले आहे. मग या सरकारने मराठा समाजासाठी केलंय काय? असा सवाल रमेश केरे पाटील यांनी केला. विखे पाटील हे उपोषणावेळी आल्यावर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील मराठा समाज मोठ्या अपेक्षेने सरकारकडे पाहत होता. मराठा समाजाला न्याय मिळेल असे त्यांना वाटत होते. पण मराठा आंदोलकांची दिशाभूल होत आहे. अजिबात सरकारने न्याय दिलेला नाही. ज्या मराठा बांधवांच्या कुणबी नोंदी असतील, अशाच बांधवांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. हैदराबाद गॅझेट नुसार, मराठवाड्यातील एकाही मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार नाही, असं स्वतः उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मान्य केल्याचे केरे पाटील म्हणाले.

मराठा क्रांती ठोक मोर्चाचे जलसमाधी आंदोलन

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अरबी समुद्रात पुतळा अद्याप का उभारण्यात आला नाही याचा जाब विचारण्यासाठी आज मराठा क्रांती ठोक मोर्चा गिरगाव चौपाटीवर जलसमाधी घेत आंदोलन करणार आहेत. दुपारी तीन वाजता आंदोलन करणार असल्याची माहिती समोर येत आहे. तत्पूर्वी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Follow Us
60 दिवसांचा तेलसाठा....म्हणत हरदीप सिंह पुरी यांचा मोठा खुलासा!
Hardeep Singh Puri | हार्मूज संकटावर भारताची तयारी; 60 दिवसांचा तेलसाठा....म्हणत हरदीप सिंह पुरी यांचा मोठा खुलासा!
पंतप्रधानांनी आता केदारनाथच्या गुहेत... संजय राऊत हे काय बोलून गेले?
पंतप्रधानांनी आता केदारनाथच्या गुहेत... संजय राऊत हे काय बोलून गेले? पंडित नेहरूंचाही उल्लेख
पण देशाचे 12 वाजलेत! विजय वडेट्टीवारांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबो
....पण देशाचे 12 वाजलेत! विजय वडेट्टीवारांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल
कोट्यवधी कुटुंबांना झटका! 9 नाही आता किती सिलेंडर मिळणार?
Pradhan Mantri Ujjwala Yojana | कोट्यवधी कुटुंबांना झटका! सरकारच्या निर्णयामुळे उज्ज्वला लाभार्थ्यांमध्ये नाराजी; 9 नाही आता किती सिलेंडर मिळणार?
ठाकरेंनी पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याचा मुद्दा उचलून धरला, म्हणाले....
INDIA आघाडीत नवा ट्विस्ट! उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानपदाच्या चेहऱ्याचा मुद्दा उचलून धरला, म्हणाले....
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा..
साहेब आता निर्णय घ्या... नाराज समर्थकांचं भुजबळांकडे साकडं, राज्यसभा उमेदवारीमुळे थेट विनंती; काय घडतंय?
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत
दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण आता... बड्या नेत्याचं सुचक विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली
इंडिया आघाडीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा, ठाकरेंनी काय भूमिका मांडली? राऊतांनी A टू Z सांगितलं!
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया,
मोठी बातमी! पक्षातून हकालपट्टीची होताच मिसाळेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले माझा फोन हॅक...
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन
मोठी बातमी! सरकारी ऑफिसात महिला कर्मचाऱ्याचा छळ, बावनकुळेंनी लगेच फोन फिरवला, त्या प्रकरणाची गंभीर दखल!