AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागपूरमध्ये भाजपच्या जागा कमी झाल्या, फडणवीस म्हणतात, पंचायत समितीत वाढल्या, वाचा आणखी काय म्हणाले?

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप नंबर वनचा पक्ष ठरला असला तरी नागपुरात मात्र भाजपच्या जागा प्रचंड घटल्या आहेत. (devendra fadnavis reaction on nagpur zilla parishad election result)

नागपूरमध्ये भाजपच्या जागा कमी झाल्या, फडणवीस म्हणतात, पंचायत समितीत वाढल्या, वाचा आणखी काय म्हणाले?
Devendra Fadnavis
| Edited By: | Updated on: Oct 06, 2021 | 6:24 PM
Share

मुंबई: जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजप नंबर वनचा पक्ष ठरला असला तरी नागपुरात मात्र भाजपच्या जागा प्रचंड घटल्या आहेत. त्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सारवा सारव केली आहे. नागपूर जिल्हा परिषदेत आमच्या जागा निश्चित कमी झाल्या आहेत. पण पंचायत समितीत वाढल्या आहेत. त्यामुळे आम्हीच नंबर वन आहोत, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधतानाच जिल्हा परिषद निवडणुका आणि नागपूरच्या निवडणूक निकालाचं विश्लेषण केलं. नागपूर जिल्हा परिषदेत आमची एक जागा गेली. पण पंचायतीत आम्ही चार जागा जिंकल्या याचा अर्थ जनतेने भाजपलाच जागा दिल्या आहेत. म्हणजेच नागपूरमध्येही भाजपच नंबर वन आहे, असं सांगतानाच भाजपची स्पेस वाढतेय, तीन पक्षाची स्पेस कमी होत असून शिवसेना अधिकाधिक खाली जात आहे. भाजपची स्पेस वाढत आहे. आम्ही स्पेस वाढवतच जाणार आहोत. शिवसेनेच्या जीवावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेची स्पेस खाणार आहे. त्यामुळे कोण रसातळाला चाललंय हे निवडणुकीतून स्पष्ट झालं. त्याचा विचार त्यांनी करावा, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

आम्हीच सरस

आम्ही कोणीही प्रचाराला गेलो नाही. मी, चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवारीह प्रचाराला गेलो नाही. तरीही आम्हालाच जनतेने निवडून दिले. 25 ट्केक जागा भाजपला मिळाल्या. 25 टक्के जागा अपक्षांना मिळाल्या आणि उरलेल्या 50 टक्के जागा आघाडीच्या तीन पक्षांना मिळाल्या आहेत. म्हणजे त्यातही आम्हीच सरस आहोत. या निकालाने भाजप नंबर 1 पक्ष तर शिवसेना चौथ्या क्रमांकाचा पक्ष झाला आहे. सत्ता असूनही ते चौथ्या नंबरवर गेले आहेत, असं ते म्हणाले.

तर दसऱ्याआधी आंदोलन

यावेळी त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे सरकारला इशारा दिला. अतिवृष्टीग्रस्तांना दसऱ्यापूर्वी मदत मिळाली नाही तर आम्ही आंदोलन करू. तीन पक्षाला सांगतो, लखीमपूर खीरीबाबत काय झाले हे ते सरकार पाहील. पण इथे लक्ष द्या. इथे रोज शेतकरी मरत आहेत. लखीमपूरवर बोलणारे पालकमंत्री आपल्या जिल्ह्यात जात नाहीत अशी अवस्था आहे, असं ते म्हणाले.

नागपुरात काँग्रेसची सत्ता कायम

दरम्यान, नागपूरच्या 16 जागांपैकी भाजपने 3, राष्ट्रवादीने 2, काँग्रेसने 9 आणि इतरांचा एका जागेवर विजय झाला आहे. नागपूरमध्ये शिवसेनेला खातंही खोलता आलं नाही. नागपूर जिल्हाा परिषदेत काँग्रेसच्या दोन जागा वाढल्या आहेत. तर राष्ट्रवादीला दोन जागा गमवाव्या लागल्या आहेत. तर भाजलाही एक जागा गमवावी लागली आहे. शेकाप आि इतर पक्षांना प्रत्येकी एक जागा जिंकता आली आहे. नागपूरमध्ये काँग्रेसची सत्ता कायम राहणार असून मंत्री सुनी केदार यांचं वर्चस्व कायम असल्याचं स्पष्ट झालं आहे.

संबंधित बातम्या:

Maharashtra ZP and Panchayat Election Results 2021 LIVE: जिल्हा परिषद-पंचायत समितीचा निकाल, गुलाल कुणाचा?, राज्याचं लक्ष!

शिवसेनेला सर्वात मोठा धक्का, खासदारपुत्राचा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत पराभव

Nandurbar election result 2021 : दीदी जिंकली, दादा हरला, माजी मंत्र्यांच्या मुलीचा विजय, पुतण्या पराभूत

(devendra fadnavis reaction on nagpur zilla parishad election result)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.