AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्षा बंगल्यावर मोठ्या हालचाली, मुख्यमंत्री अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये मध्यरात्री खलबते, दोन तासांच्या बैठकीनंतर…

eknath shinde devendra fadnavis ajit pawar meeting: राज्याच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य विधिमंडळाचे हे शेवटचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. त्यामुळे कोणते निर्णय घ्यावे, अर्थसंकल्पात कोणत्या तरतुदी हव्या, त्यावर चर्चा होणार आहे. तसेच विरोधकांकडून खोटा नेरेटिव्ह पसरावला जात आहे. त्याला उत्तर कसे द्यावे, यावर चर्चा झाली.

वर्षा बंगल्यावर मोठ्या हालचाली, मुख्यमंत्री अन् दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये मध्यरात्री खलबते, दोन तासांच्या बैठकीनंतर...
अजित पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Jun 26, 2024 | 8:40 AM
Share

राज्यातील घडामोडीचे केंद्र पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वर्षा बंगला ठरला आहे. मंगळवारी मध्यरात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवार यांची बैठक झाली. अंदाजे दीड ते दोन तास झालेल्या बंद दाराआडच्या या बैठकीत राज्यातील राजकारणासह अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. अर्थसंकल्पीय महाविकास आघाडीला कसे कोंडीत पकडावे, त्याची रणनीती यावेळी तिन्ही नेत्यांनी निश्चित केल्याची माहिती मिळाली.

विरोधकांना सडेतोड उत्तर देणार

राज्याच्या विधिमंडळाचे शुक्रवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशात लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे महाविकास आघाडीचा विश्वास वाढलेला असणार आहे. महाविकास आघाडी आक्रमक असणार आहे. विरोधक विविध मुद्यांवर आक्रमक असणार आहे. त्यांच्याकडून सरकाराला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होईल. त्याला महायुती म्हणून कसे सामोरे जायचे? विरोधकांना सडेतोड उत्तर कसे द्यावे, यावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विधानसभा निवडणुकीपूर्वी शेवटचे अधिवेशन

राज्याच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य विधिमंडळाचे हे शेवटचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. त्यामुळे कोणते निर्णय घ्यावे, अर्थसंकल्पात कोणत्या तरतुदी हव्या, त्यावर चर्चा होणार आहे. तसेच विरोधकांकडून खोटा नेरेटिव्ह पसरावला जात आहे. त्याला उत्तर कसे द्यावे, यावर चर्चा झाली. राज्यपाल नियुक्ती विधान परिषद सदस्य आणि मंत्रीमंडळ विस्तार यासारख्या महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज पत्रकार परिषद घेणार आहे. त्यात ते काय माहिती देणार? कोणती मोठी घोषणा करणार? याकडे लक्ष लागले आहे.

तिन्ही पक्षांमध्ये समन्वयावर भर

महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना या तिन्ही पक्षांमध्ये वाद टाळले जावे. सर्व निर्णयांवर समन्वय हवे, त्यावर या बैठकीत चर्चा करण्यात आली. तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रिपणे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे, असे ठरवण्यात आले. अधिवेशन सुरु असताना विधान परिषदेतील चार जागांचे निकाल येणार आहे. त्याचे पडसाद अधिवेशनात उमटणार आहे. विधान परिषदेत महायुतीचे बहुमत आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.