AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला बोलता येतं…; लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळताच रवींद्र वायकर नेमकं काय म्हणाले?

Ravindra Waikar on Mumbai North West Lok Sabha Candidature : मुंबई उत्तर पश्चिममधून लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर होताच रविंद्र वायकर यांची प्रतिक्रिया; म्हणाले, मी वरिष्ठांचे... विरोधकांच्या आरोपांनाही रविंद्र वायकर यांनी उत्तर दिलं आहे. वाचा सविस्तर...

मला बोलता येतं...; लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळताच रवींद्र वायकर नेमकं काय म्हणाले?
| Updated on: Apr 30, 2024 | 2:35 PM
Share

शिंदे गटाने रवींद्र वायकर यांना मुंबई उत्तर पश्चिममधून उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात वायकर यांचा सामना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्याशी होणार आहे. त्यामुळे या मतदारसंघात चुरशीची लढत होणार असल्याचं दिसत आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. निवडणुकीचं तिकीट मिळताच रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. मला लोकसभेची उमेदवारी मिळाली याचा आनंद आहे. मी माझ्या वरिष्ठांचे आभार मानतो, असं रवींद्र वायकर यांनी म्हटलं आहे.

रवींद्र वायकर यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मी लोकप्रतिनिधी म्हणून जे काम केले आहे, त्याबद्दल मला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मी मागच्या बेंचवर बसणारा नाही तर सर्वात पुढे होऊन प्रश्न मांडणारा आहे. मी लोकसभेत देशाचे प्रश्न तर मांडणार तर आहेच पण माझ्या मुंबईचे सर्वाधिक प्रश्न मांडणार आहे. मला बोलता येते. मला प्रश्नांची जाणीव आहे. एकादा प्रश्न विचारणे आणि त्याचे अचूक उत्तर घेणे हे माझ्या जवळ आहे. त्याप्रमाणेच मी काम करणार आहे, असं रवींद्र वायकर म्हणाले.

“वायकर हा ब्रँड झालाय”

मी जी कामं केली आहेत. त्यामुळे वायकर हा एक ब्रँड झाला आहे. केवळ ती कामे पाहूनच मला उमेदवारी मिळाली आहे. मी कधीच जाती आणि धर्माचा विचार केला नाही. मी काम करणारा आहे. निवडणुकीत उभा राहताना आपल्या समोर समोरच्याचे आव्हान असतेच. पण मी प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्यास तयार आहे. या निवडणुकीत मी कुणालाही वाईट म्हणणार नाही. तर मी काय करू शकतो त्यावर मतं मागणार आहे. मी जिंकूनच येणार आहे, असा दावाही वायकर यांनी केला.

“मला क्लिनचीट मिळालीय”

राजकारणात अनेक आरोप होतात, बऱ्याच वेळा मुद्दाम आरोप केले जातात. पण तुम्ही जर चांगले काम केले तर कुठलाही आरोप तुम्हाला शिवू शकत नाही. माझ्यावर जे आरोप केले होते, त्यावर मी सुप्रीम कोर्टात गेलो होतो. कोर्टाने मला क्लिनचीट दिली आहे, असंही त्यांनी सांगितलं.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.