AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रकाश आंबेडकरांनी एकतर्फी युती तोडल्याची घोषणा केली हे…; संजय राऊत काय म्हणाले?

Sanjay Raut on Prakash Ambedkar Vanchit And Mahavikas Aghadi : प्रकाश आंबेडकरांसोबत असलेली युती ही राजकीय नाही तर...; संजय राऊतांच्या विधानाने चर्चांना उधाण... वंचित मविआत येणार की नाही? आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

प्रकाश आंबेडकरांनी एकतर्फी युती तोडल्याची घोषणा केली हे...; संजय राऊत काय म्हणाले?
| Edited By: | Updated on: Mar 24, 2024 | 12:27 PM
Share

प्रकाश आंबेडकर यांनी एकतर्फी युती तोडल्याची घोषणा केली हे दुर्दैव आहे. दोन नेत्यांमध्ये चर्चा होणं गरजेचं होतं. युती करताना चर्चा झाली. तर आपण दूर होताना सुद्धा एकत्रित चर्चा झाली असती तर ती आपल्या राज्याच्या राजकीय संस्कृतीला धरून झालं असतं पण दुर्दैवानं तसं झालं नाही. प्रकाश आंबेडकरांसोबत असलेली युती ही राजकीय नाही तर भावनिक विषय आहे. आम्हाला खात्री आहे की प्रकाश आंबेडकर हे त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करतील, असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊतांनी काही वेळाआधी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यात त्यांना वंचितसोबतच्या आघाडीबाबत त्यांना प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी स्पष्ट भाष्य केलं.

आजही वाटतं…; संजय राऊत काय म्हणाले?

प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचे घटक आहेत. लोकसभेसंदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. आम्ही त्यांना चार जागांचा प्रस्ताव दिला. हा चार जागांचा प्रस्ताव कायम आहे. आम्हाला आजही वाटतं राज्याच्या नव्हे तर देशाच्या हितासाठी डॉ. आंबेडकरांनी जे स्वप्न पाहिलं संविधानाचं मजबूत लोकशाहीच ते संविधान आणि लोकशाही संकटात असताना प्रकाश आंबेडकर यांनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेणं गरजेचं आहे. जागा वाटपात एखादं दोन गोष्टी मागेपुढे होऊ शकतात, असा आशावाद संजय राऊतांनी बोलून दाखवला.

वंचित- शिवसेना आघाडी का झाली होती?

प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर शिवसेनेची युती झाली याला दीड वर्ष झालं आणि ते अतिशय चांगल्या हेतूने झालेली युती होती. त्यात प्रामुख्याने लोकसभेचा विचार झाला नव्हता. विधानसभा आणि महानगरपालिका यासंदर्भात एकत्र काम करता येईल आणि महाराष्ट्रात सध्या जे काही सुरू आहे. त्याविरुद्ध एकत्र लढता येईल ही त्या दोन नेत्यांमधली भूमिका होती. ठाकरे आणि आंबेडकर यांचं नातं फार जुनं आहे. ते एकत्र आले याचा आनंद महाराष्ट्रातील तमाम जनतेला झाला. त्यावेळेला युती करताना राजकारण कमी आणि महाराष्ट्रातलं समाजकारण जास्त करावं ही भूमिका होती. पण विधानसभा महानगरपालिका या स्तरावर काम करू असं ठरलं, असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं.

शिवशक्ती भीमशक्ती एका व्यक्तीची शक्ती नसते. बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे की, महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. ही शिवशक्ती भीमशक्ती आहे… तिच एकत्र आणण्याचा आम्ही प्रयत्न केला, असं राऊत म्हणाले.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.