AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रकाश आंबेडकरांनी एकतर्फी युती तोडल्याची घोषणा केली हे…; संजय राऊत काय म्हणाले?

Sanjay Raut on Prakash Ambedkar Vanchit And Mahavikas Aghadi : प्रकाश आंबेडकरांसोबत असलेली युती ही राजकीय नाही तर...; संजय राऊतांच्या विधानाने चर्चांना उधाण... वंचित मविआत येणार की नाही? आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

प्रकाश आंबेडकरांनी एकतर्फी युती तोडल्याची घोषणा केली हे...; संजय राऊत काय म्हणाले?
| Edited By: | Updated on: Mar 24, 2024 | 12:27 PM
Share

प्रकाश आंबेडकर यांनी एकतर्फी युती तोडल्याची घोषणा केली हे दुर्दैव आहे. दोन नेत्यांमध्ये चर्चा होणं गरजेचं होतं. युती करताना चर्चा झाली. तर आपण दूर होताना सुद्धा एकत्रित चर्चा झाली असती तर ती आपल्या राज्याच्या राजकीय संस्कृतीला धरून झालं असतं पण दुर्दैवानं तसं झालं नाही. प्रकाश आंबेडकरांसोबत असलेली युती ही राजकीय नाही तर भावनिक विषय आहे. आम्हाला खात्री आहे की प्रकाश आंबेडकर हे त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करतील, असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊतांनी काही वेळाआधी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यात त्यांना वंचितसोबतच्या आघाडीबाबत त्यांना प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी स्पष्ट भाष्य केलं.

आजही वाटतं…; संजय राऊत काय म्हणाले?

प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीचे घटक आहेत. लोकसभेसंदर्भात आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. आम्ही त्यांना चार जागांचा प्रस्ताव दिला. हा चार जागांचा प्रस्ताव कायम आहे. आम्हाला आजही वाटतं राज्याच्या नव्हे तर देशाच्या हितासाठी डॉ. आंबेडकरांनी जे स्वप्न पाहिलं संविधानाचं मजबूत लोकशाहीच ते संविधान आणि लोकशाही संकटात असताना प्रकाश आंबेडकर यांनी अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेणं गरजेचं आहे. जागा वाटपात एखादं दोन गोष्टी मागेपुढे होऊ शकतात, असा आशावाद संजय राऊतांनी बोलून दाखवला.

वंचित- शिवसेना आघाडी का झाली होती?

प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर शिवसेनेची युती झाली याला दीड वर्ष झालं आणि ते अतिशय चांगल्या हेतूने झालेली युती होती. त्यात प्रामुख्याने लोकसभेचा विचार झाला नव्हता. विधानसभा आणि महानगरपालिका यासंदर्भात एकत्र काम करता येईल आणि महाराष्ट्रात सध्या जे काही सुरू आहे. त्याविरुद्ध एकत्र लढता येईल ही त्या दोन नेत्यांमधली भूमिका होती. ठाकरे आणि आंबेडकर यांचं नातं फार जुनं आहे. ते एकत्र आले याचा आनंद महाराष्ट्रातील तमाम जनतेला झाला. त्यावेळेला युती करताना राजकारण कमी आणि महाराष्ट्रातलं समाजकारण जास्त करावं ही भूमिका होती. पण विधानसभा महानगरपालिका या स्तरावर काम करू असं ठरलं, असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं.

शिवशक्ती भीमशक्ती एका व्यक्तीची शक्ती नसते. बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे की, महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा मोठा वर्ग महाराष्ट्रात आहे. ही शिवशक्ती भीमशक्ती आहे… तिच एकत्र आणण्याचा आम्ही प्रयत्न केला, असं राऊत म्हणाले.

विलीनीकरण ठरलंच नाही! फडणवीसांनी थेट 'तो' दावाच खोडला!
विलीनीकरण ठरलंच नाही! फडणवीसांनी थेट 'तो' दावाच खोडला!.
Union Budget 2026 : केंद्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी काय काय?
Union Budget 2026 : केंद्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी काय काय?.
आधी गोंधळ, नंतर स्पष्टीकरण! पीयूष गोयल यांच्या वक्तव्यानं काय घडलं?
आधी गोंधळ, नंतर स्पष्टीकरण! पीयूष गोयल यांच्या वक्तव्यानं काय घडलं?.
विलीनीकरणच विलीन? दादांचे नेते काय बोलून गेले?
विलीनीकरणच विलीन? दादांचे नेते काय बोलून गेले?.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक; मुख्यमंत्र्यांनी घेतले 5 महत्त्वाचे निर्णय!
राज्य मंत्रिमंडळाची बैठक; मुख्यमंत्र्यांनी घेतले 5 महत्त्वाचे निर्णय!.
सुतक येतं-जातं! राजकारण थांबवून कसे चालेल? सामनाच्या अग्रलेखात काय?
सुतक येतं-जातं! राजकारण थांबवून कसे चालेल? सामनाच्या अग्रलेखात काय?.
प्रफुल पटेल राष्ट्रीय अध्यक्ष होणार? स्वतः ट्वीट करत दिली माहिती
प्रफुल पटेल राष्ट्रीय अध्यक्ष होणार? स्वतः ट्वीट करत दिली माहिती.
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर फडणवीसांचे मोठे विधान
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर फडणवीसांचे मोठे विधान.
राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणावर रोहित पवारांचे मोठे विधान
राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणावर रोहित पवारांचे मोठे विधान.
द्राक्ष उत्पादकांच्या डोळ्यात पाणी, उत्पादनात मोठी घट
द्राक्ष उत्पादकांच्या डोळ्यात पाणी, उत्पादनात मोठी घट.