शिंदे गटातील खासदार, आमदारांना पुन्हा सोबत घेणार का?, संजय राऊत यांचं मोठं विधान; आता सर्व…

स्वाभिमानासाठी उद्धव ठाकरे यांनी भूमिका घेतली. चर्चा करून घेतली. आता गजाभाऊ सांगत आहेत आम्हाला लाथा घालत आहे. सासूरवास करत आहे. तेच सांगत आहेत. म्हणजे भाजपने मूळ स्वभाव सोडला नाही.

शिंदे गटातील खासदार, आमदारांना पुन्हा सोबत घेणार का?, संजय राऊत यांचं मोठं विधान; आता सर्व...
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 27, 2023 | 11:08 AM

मुंबई : शिवसेनेतून फुटून गेलेल्या आमदार आणि खासदारांना ठाकरे गटात पुन्हा प्रवेश मिळणार की नाही? याची चर्चा अजूनही जोरात आहे. काहींच्या मते बदलत्या राजकीय परिस्थितीत फुटून गेलेल्या नेत्यांना पुन्हाठाकरे गटात प्रवेश दिला जाऊ शकतो. कारण आदित्य ठाकरेंपासून संजय राऊतांपर्यंत अनेकांनी तसे सुतोवाच केलं होतं. तर काहींच्या मते उद्धव ठाकरे या फुटीर नेत्यांना कदापि माफ करणार नाहीत. त्यामुळे या खासदार आणि आमदारांना पुन्हा पक्षात प्रवेश दिला जाणार नाही, असं काही राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना मोठं विधान केलं आहे.

उद्धव ठाकरे आणि शिवसेनेने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. ज्यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला, बेईमानी केली. ज्यांनी केवळ पैशासाठी बेईमानी केली त्यांना परत पक्षात प्रवेश देणार नाही. आम्हाला शिवसैनिकांना तोंड द्यावे लागेल. त्यांच्यात रोष आहे. त्यामुळे या गद्दारांना शिवसेनेत प्रवेश दिला जाणार नाही, असं संजय राऊत म्हणाले. काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. ते मेसेज करतात, भेटतात. वेदना बोलून दाखवतात. पण तरीही त्यांना प्रवेश देणार नाही, असं राऊत यांनी निक्षून सांगितलं.

हे सुद्धा वाचा

आम्ही काय वेगळं सांगत होतो?

शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. गजाभाऊ कीर्तिकर आम्ही एकत्र असताना ते आमचे जवळचे सहकारी होते. त्यांनी सोडून जाणं हे आमच्यासाठी वेदनादायी होतं. त्यांच्या गटाला भाजपकडून सापत्न वागणूक मिळत आहे. त्यांना अपमानित केलं जात आहे, असं कीर्तिकर यांनी सांगितलं. कीर्तिकर आता बोलत आहेत. मग आम्ही काय वेगळं सांगत होतो? भाजप ठाकरे यांच्या शिवसेनेशी सावत्रपणाची वागणूक देत आहे. शिवसेनेला खतम करण्याच्या भूमिकेतून काम करत होती. म्हणून शिवसेना वेगळी झाली, राऊत म्हणाले.

चिडीतून भाजपपासून दूर गेलो

भाजप अजगर आणि मगर आहे. जे सोबत गेले त्यांना खाऊन टाकलं. आता मिंधे गटाला अनुभव येत आहे. हळूहळू कळेल या मगरीपासून दूर जाण्याची उद्धव ठाकरे यांची भूमिका योग्य होती. हा फुटलेला गट आहे. त्यांच्यात अस्वस्थता आहे. नाराजी आहे. झालेल्या गटात दोन गट पडले आहेत. कीर्तिकर यांनी सांगितलं तीच भूमिका आमची पहिल्यापासून होती. त्याच चिडीतून आम्ही भाजपपासून दूर गेलो. त्यांनी दिलेले शब्द पाळले नाही, असं त्यांनी सांगितलं.

भाजपने मूळ स्वभाव सोडला नाही

भाजपने आम्हाला निधी मिळू दिला नाही. त्यावेळी भाजपने शिवसेनेच्या अनेक आमदारांची कामे रखडून ठेवली होती. अनेक शब्द दिले होते. ते पार पाडले नाही. प्रमुख लोकांना अपमानित केलं. सत्तेत समान भागिदारीही दिली नाही. त्यामुळे स्वाभिमानासाठी उद्धव ठाकरे यांनी भूमिका घेतली. चर्चा करून घेतली. आता गजाभाऊ सांगत आहेत आम्हाला लाथा घालत आहे. सासूरवास करत आहे. तेच सांगत आहेत. म्हणजे भाजपने मूळ स्वभाव सोडला नाही. कीर्तिकर तिथे गेले तरी सुखात नाही, समाधानी नाहीत याचा अर्थ खुराड्यातील एक एक कोंबडी कापली जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.