AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Balasaheb Thorat : राज्यात अनेक प्रश्न, मंत्री मात्र सत्कारात दंग; सरकारच बेकायदेशीर म्हणत बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल

ट्विट करणे हेदेखील दहशत निर्माण करण्याचा प्रकार आहे. मात्र आम्ही सर्व एकत्र आहोत, संघटित आहोत. संघटित विरोध करू, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

Balasaheb Thorat : राज्यात अनेक प्रश्न, मंत्री मात्र सत्कारात दंग; सरकारच बेकायदेशीर म्हणत बाळासाहेब थोरातांचा हल्लाबोल
Image Credit source: Twitter
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Aug 17, 2022 | 12:13 PM
Share

मुंबई : राज्यात अनेक प्रश्न आहेत. हे सरकार मात्र अजूनही झोललेले आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे (Heavy rain) शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मात्र राज्य सरकारमधील मंत्री सत्कार घेण्यात दंग आहेत, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. आजपासून पावसाळी अधिवेशनाला (Assembly session) सुरुवात झाली आहे. सहा दिवसांचे हे अधिवेशन असणार आहे. मात्र राज्य सरकारला कोणतेही गांभीर्य नाही. अनेक प्रश्न राज्यात सध्या निर्माण झाले असून मंत्री मात्र खातेवाटप आणि सत्कार समारंभात व्यस्त असल्याचे बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) म्हणाले. महाराष्ट्रातील विकासकामांना जे आधीच्या सरकारने निर्णय घेतले होते, त्या निर्णयांना स्थगिती देण्यात येत आहे. हे सरकार काही करायला तयार नाही, असा हल्लाबोल त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर केला आहे.

‘सरकारकडून मुस्कटदाबी’

या सरकारच्या वैधतेबद्दलही थोरात बोलले. ते म्हणाले, हे सरकार करत तर काहीच नाही. खरे तर हे सरकार कायदेशीर आहे की नाही, हा मुद्दा आहेच. जर सरकार असेलच तर शेतकऱ्यांच्या बाबतीत भूमिका घ्यायला हवी. जबाबदारी घेऊन त्यांच्यापर्यंत मदत पोहोचली पाहिजे, असे ते म्हणाले. दहशत वापरून हे सरकार चालवण्याचा प्रयत्न आहे, मुस्कटदाबी सरकारकडून केली जात आहे, हे कोणालाही नाकारता येणार नाही, हे जनतेला समजले आहे, असे वक्तव्य त्यांनी केले.

काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

‘संघटित विरोध करू’

मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीचा बडा नेता तुरुंगात जाणार असल्याचे ट्विट केले. यावरही त्यांनी टीका केली. ट्विट करणे हेदेखील दहशत निर्माण करण्याचा प्रकार आहे. मात्र आम्ही सर्व एकत्र आहोत, संघटित आहोत. संघटित विरोध करू, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. तसेच अशा ट्विट्सना आम्ही महत्त्व देत नाहीत. सरकारकडून विरोधकांची ज्या पद्धतीने मुस्कटदाबी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्याला विरोध करतच राहू, असे बाळासाहेब थोरातांनी सांगितले. विधान भवनाच्या पायऱ्यांवर सर्व विरोधक एकवटले होते. राज्य सरकारच्या विरोधात यावेळी घोषणाबाजीही करण्यात आली.

Follow Us
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी
मोठी बातमी! अखेर न्याय मिळालाच; नसरापूर प्रकरणातील नराधमाला फाशी; कोर्टाचा मोठा निर्णय
फडणवीसांच्या PM शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा
Uddhav Thackeray | फडणवीसांच्या PM पदाच्या शर्यतीवर उद्धव ठाकरेंचा खळबळजनक दावा; मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर....
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर