AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज ठाकरे यांचा वाढवण बंदराजवळ विमानतळ बांधण्यास विरोध? म्हणाले, विमानतळ कशासाठी…

Uddhav Thackeray Raj Thackeray Joint interview: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीचा दुसरा भाग प्रसारित झाला. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी वाढवण बंदराजवळील विमानतळाविषयी मोठे भाष्य केलं आहे. मराठी भाषिक पट्ट्यात खरंच मोठं कारस्थान सुरू आहे का?

राज ठाकरे यांचा वाढवण बंदराजवळ विमानतळ बांधण्यास विरोध? म्हणाले, विमानतळ कशासाठी…
राज ठाकरे, उद्धव ठाकरे संयुक्त मुलाखत
| Updated on: Jan 09, 2026 | 10:28 AM
Share

Uddhav Thackeray Raj Thackeray Joint interview: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीची जोरदार चर्चा सुरू आहे. आज या मुलाखतीचा दुसरा भाग प्रसारित झाला. या मुलाखतीत राज ठाकरे यांनी वाढवण बंदराजवळील विमानतळाविषयी रोखठोक मत मांडलं. मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचे मोठे कारस्थान सुरु असल्याचे दोन्ही बंधुंनी आरोप केले आहे. त्यातील एक मोठी कडीवर राज ठाकरे यांनी प्रकाश टाकला. त्यांनी एक मोठा दावा केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. काय म्हणाले राज ठाकरे?

महाराष्ट्राचा भाग गुजरातला जोडण्याचा प्रयत्न

यावेळी राज ठाकरे यांनी एका मोठ्या मुद्दाकडे राज्यातील जनतेचे लक्ष वेधले आहे. या मुलाखतीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा पुन्हा गंभीर आरोप केला. तर राज ठाकरे यांनी मुंबईच्या जवळचा आणि गुजरातला लागून असलेल्या भागाविषयी मोठे भाष्य केले. महाराष्ट्राचा भाग गुजरातला जोडण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा दावा करत त्यांनी काही उदाहरणं दिली. यावेळी स्ट्रॅटॅजिकली मुंबई तोडण्याचा प्रयत्न सुरु आहे. ज्याला आपण एमएमआर रिजन म्हणतो, त्यात काय काय सुरू आहे, वाढवण बंदर, या बंदराला लागून विमानतळ, विमानतळ तुम्ही कशासाठी आणताय? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

या मुद्यावर राज ठाकरे यांनी एक मोठा इशारा दिला. मुंबईनंतर नवीन मुंबईत जे विमानतळ झालंय. मुंबईतल्या हक्काच्या विमानतळावरील सगळा कार्गो तिथे नवी मुंबईतल्या विमानतळावर हलवतील. आता सुरुवात झालेलीच आहे. पुढे हळूहळू मुंबईतील डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल विमानतळ नवी मुंबईत हलवणार. आताच मुंबईतील विमानतळ अदानीकडं आहेच. आताच्या विमानतळाचं क्षेत्रफळ तुम्ही पाहिलंत तर त्यात कमीत कमी 50 शिवाजी पार्क मैदानं बसतील इतकं मोठे ते आहे. म्हणजे उद्या डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल विमानतळ नवी मुंबईला हलवायचं आणि इथल्या विमानतळाचा सर्व भाग विकायाला काढायचा हा त्यांचा प्लॅन असल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.

अदानींचा विस्तार मोदींच्या काळात

यावेळी राज ठाकरे यांनी अजून एका बाबीवर मोठे भाष्य केले. अदानी आणि अंबानी यांच्यातील फरक त्यांनी समोर आणला. मोदी मोठे व्हायच्या आधीपासून अंबानी मोठे होते, पण अदानी हा मोदी मोठे झाल्यानंतरच मोठा झाला आहे. अदानीचा विस्तार हे मोदी मोठे झाल्यानंतरचाच आहे. मोदी ज्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री झाले, त्याचवेळी अदानीला मुंद्रा पोर्ट मिळाला आणि मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अदानींना अनेक गोष्टी मिळाला आहेत, असे मत राज ठाकरे यांनी या संयुक्त मुलाखतीत मांडले.

यावेळी राज ठाकरे यांनी एक मोठा सवाल भाजपला केला आहे. जर देशात भाजपऐवजी काँग्रेस अथवा इतर कोणत्याही पक्षाचे सरकार असते आणि एखाद्या केंद्रात बसलेल्या सरकारने काँग्रेस अथवा इतर पक्षाने जर एकाच उद्योगपतीवर मेहरबानी केली असती तर भारतीय जनता पक्ष कशा प्रकारे रिॲक्ट झाला असता असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला. त्यांनी भाजपच्या धोरणावर मुलाखतीत गंभीर आरोप केले.

Follow Us
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषण, येत्या दोन दिवसांनंतर...
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषण, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, शिवसेना ठाकरे गटाच्या बंडखोर खासदारांबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, शिवसेना ठाकरे गटाच्या बंडखोर खासदारांबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!.

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?.

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?

मी जंतरमंतरवर कधीच जाणार नाही, तिथे देशद्रोही लोक..; प्रसिद्ध गीतकाराची रोखठोक भूमिका.

मी जंतरमंतरवर कधीच जाणार नाही, तिथे देशद्रोही लोक..; प्रसिद्ध गीतकाराची रोखठोक भूमिका

टीम इंडियात नेमकं चाललंय तरी काय? हर्षित राणा-वॉशिंग्टनला संधी देण्यासाठी नियमांची पायमल्ली!.

टीम इंडियात नेमकं चाललंय तरी काय? हर्षित राणा-वॉशिंग्टनला संधी देण्यासाठी नियमांची पायमल्ली!

Row Over Neet : नीटच्या मुद्यावरुन विरोधी पक्षातचं फूट! संसदेच्या सभागृहाबाहेर दोन बड्या नेत्यांमध्ये वाद.

Row Over Neet : नीटच्या मुद्यावरुन विरोधी पक्षातचं फूट! संसदेच्या सभागृहाबाहेर दोन बड्या नेत्यांमध्ये वाद