AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वेदांता फॉक्सक्वॉन शिंदे सरकारमुळे बाहेर गेला..; आदित्य ठाकरेंच्या आरोपांना सरकारचं प्रत्युत्तर…

शिंदे-फडणवीस यांचेच 5 सप्टेंबरला सरकार अस्तित्वात होतं, आणि 5 सप्टेंबर रोजीच एमआयडीसीकडून वेदांता-फॉक्सक्वॉनला पत्रही लिहिण्यात आलं होतं.

वेदांता फॉक्सक्वॉन शिंदे सरकारमुळे बाहेर गेला..; आदित्य ठाकरेंच्या आरोपांना सरकारचं प्रत्युत्तर...
| Updated on: Nov 30, 2022 | 11:28 PM
Share

मुंबईः वेदांता फॉक्सक्वॉन प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेल्यानंतर शिंदे सरकारवर ठाकरे गटाने जोरदार हल्लाबोल केला होता. त्यानंतरही महाराष्ट्रात राजकारण आणि आरोप प्रत्यारोप सुरुच आहेत. कागदपत्रं दाखवून, शिंदे सरकारमुळंच प्रकल्प गेल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे तर 12 तासांच्या आतच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंचा एक एक दावा खोडून काढला आहे.

वेदांता-फॉक्सक्वॉनच्या प्रकल्पावरुन, आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारच्याच काळातलं पत्र भर पत्रकार परिषदेत दाखवलं होतं.

आणि प्रकल्प महाविकास आघाडीच्या काळात नाही तर, शिंदे सरकारच्याच काळात गेल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला होता.

वेदांता प्रकरणावरून वाद पेटला असतानाच आता आदित्य ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल चढवत सांगितले की, 30 जूनला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि 5 सप्टेंबर रोजी शिंदे सरकारच्याच काळातच पत्रही लिहिलं होतं.

आणि त्यानंतर वेदांता-फॉक्सक्वॉनचे चेअरमन अनिल अग्रवाल यांनी सांमजस्य करार करण्यासाठी निमंत्रित करण्यात आल्याचा दावाही आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

आदित्य ठाकरे यांच्या या दाव्यानंतर मात्र या प्रकल्पासाठीच पत्र लिहिलं पण करार झालाच नाही, असं उद्योगमंत्री उदय सामंतांनी यांनी स्पष्ट केले आहे.

वेदांता प्रकल्पाच्या माध्यमातून जवळपास 1 लाख रोजगार निर्मितीचा प्रकल्प पुण्यातील तळेगावातून गुजरातला गेल्यामुळेच आता राजकारण तापले आहे आणि यावरूनच ही चिखलफेक सुरु आहे.

आदित्य ठाकरेंच्या एका पाठोपाठ एक पत्रकार परिषदा सुरु आहेत, त्यामुळं आता वेदांता फॉक्सक्वॉनच नाही तर इतर उद्योग महाराष्ट्राबाहेर कधी आणि कसे गेले, याची चौकशी निवृत्त न्यायमूर्तींकडून करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.

शिंदे-फडणवीस यांचेच 5 सप्टेंबरला सरकार अस्तित्वात होतं, आणि 5 सप्टेंबर रोजीच एमआयडीसीकडून वेदांता-फॉक्सक्वॉनला पत्रही लिहिण्यात आलं होतं.

असा पहिला दावा कागदपत्रांच्या आधारे आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्याचबरोबच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी शंका उपस्थित केली आहे. 29 ऑगस्टची बैठक प्रकल्प महाराष्ट्रातच ठेवण्यासाठी होती की गुजरातला पाठवण्यासाठी होती ?, असा सवाल आता आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.