AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar : चार महिन्यात काय होणार? यंत्रणेच्या गैरवापरावरून शरद पवार यांचा मोठा दावा काय?

Sharad Pawar On BJP : लोकसभेतील निकालानंतर महाविकास आघाडीने आता विधानसभेसाठी कसरत सुरु केली आहे. अनेक मुद्यांवर महाविकास आघाडीतील नेत्यांनी त्यांचे स्पष्ट मत नोंदवले. येत्या चार महिन्यात काय होणार, यंत्रणेच्या गैरवापरावरून शरद पवार यांनी असा मोठा दावा केला आहे.

Sharad Pawar : चार महिन्यात काय होणार? यंत्रणेच्या गैरवापरावरून शरद पवार यांचा मोठा दावा काय?
Mahavikas Aaghadi
| Updated on: Jun 15, 2024 | 4:23 PM
Share

लोकसभेतील आश्वासक विजयाने महाविकास आघाडीने विधानसभेसाठी हुंकार भरला आहे. आज 15 जून रोजी महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांच्या नेत्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यांची भूमिका मांडली. अनेक मुद्यांवर त्यांनी स्पष्ट मते नोंदवली. भाजपवर घणाघात केला. वंचितवर मत मांडले. तर आगामी काळात काय होऊ शकते, याचा एक अंदाज पण दिला. विधानसभेसाठी काय भूमिका असेल, कोण सोबत असेल याची एक उजळणी केली. येत्या चार महिन्यात काय होणार, यंत्रणेच्या गैरवापरावरून शरद पवार यांनी असा मोठा दावा केला आहे.

लोक घेतील ठोस भूमिका

महाराष्ट्रातील जनतेने आमचा पराभव केला. त्याची कारणं अनेक आहेत. पण आम्ही बोलू इच्छित नाही, एवढच त्यांना सांगायचं आहे. जे काही स्टेटमेंट त्यांनी केलं. जुन्या काळातील. ते काढून आता बदनामी केली जाते. ती सत्तेचा गैरवापर आहे. काही लोकांनी बाबतीत यापूर्वी केसेस केल्या होत्या. त्यातील काही लोकांना जामीन दिला. काही लोक कारण नसताना आरोपात गेले. आजही तुरुंगात गेले. याचा अर्थ सरळसरळ सत्तेचा गैरवापर आहे. या सत्तेच्या गैरवापरातून लोकांनी भूमिका घेतली. ते शहाणपणा घेतील असं वाटलं होतं. पण त्यांनी शहाणपणा घेतला नाही. त्यामुळे तीन चार महिन्यात लोक विधानसभेत ठोस भूमिका घेतील, असे पवार यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांच्यासह महायुतीला त्यांनी आरसा दाखवला.

शेतकऱ्यांची भूमिका बदलणार नाही

यावेळी शेतकऱ्यांच्या नाराजीचा भाजपला कसा फटका बसला हे सांगितले. तसेच ही भूमिका बदलणार नसल्याचे स्पष्ट केले. साधी गोष्ट आहे. आमच्या लोकांच्या हातात सत्ता नाही. सत्ता कुणाच्या हातात आहे हे सांगायची गरज नाही. शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे. काही निर्णय घेतले असेल तर आनंद आहे. कांदा व्यापारी आणि शेतकरी नाराज होता. तेवढ्यापुरतं मर्यादित नाही. राज्य आणि देशातील शेतकरी भाजपच्या विरोधात होता. त्यात काही बदल झालाय असं वाटत नाही, असे पवार म्हणाले.

कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.