AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar : चार महिन्यात काय होणार? यंत्रणेच्या गैरवापरावरून शरद पवार यांचा मोठा दावा काय?

Sharad Pawar On BJP : लोकसभेतील निकालानंतर महाविकास आघाडीने आता विधानसभेसाठी कसरत सुरु केली आहे. अनेक मुद्यांवर महाविकास आघाडीतील नेत्यांनी त्यांचे स्पष्ट मत नोंदवले. येत्या चार महिन्यात काय होणार, यंत्रणेच्या गैरवापरावरून शरद पवार यांनी असा मोठा दावा केला आहे.

Sharad Pawar : चार महिन्यात काय होणार? यंत्रणेच्या गैरवापरावरून शरद पवार यांचा मोठा दावा काय?
Mahavikas Aaghadi
| Updated on: Jun 15, 2024 | 4:23 PM
Share

लोकसभेतील आश्वासक विजयाने महाविकास आघाडीने विधानसभेसाठी हुंकार भरला आहे. आज 15 जून रोजी महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांच्या नेत्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यांची भूमिका मांडली. अनेक मुद्यांवर त्यांनी स्पष्ट मते नोंदवली. भाजपवर घणाघात केला. वंचितवर मत मांडले. तर आगामी काळात काय होऊ शकते, याचा एक अंदाज पण दिला. विधानसभेसाठी काय भूमिका असेल, कोण सोबत असेल याची एक उजळणी केली. येत्या चार महिन्यात काय होणार, यंत्रणेच्या गैरवापरावरून शरद पवार यांनी असा मोठा दावा केला आहे.

लोक घेतील ठोस भूमिका

महाराष्ट्रातील जनतेने आमचा पराभव केला. त्याची कारणं अनेक आहेत. पण आम्ही बोलू इच्छित नाही, एवढच त्यांना सांगायचं आहे. जे काही स्टेटमेंट त्यांनी केलं. जुन्या काळातील. ते काढून आता बदनामी केली जाते. ती सत्तेचा गैरवापर आहे. काही लोकांनी बाबतीत यापूर्वी केसेस केल्या होत्या. त्यातील काही लोकांना जामीन दिला. काही लोक कारण नसताना आरोपात गेले. आजही तुरुंगात गेले. याचा अर्थ सरळसरळ सत्तेचा गैरवापर आहे. या सत्तेच्या गैरवापरातून लोकांनी भूमिका घेतली. ते शहाणपणा घेतील असं वाटलं होतं. पण त्यांनी शहाणपणा घेतला नाही. त्यामुळे तीन चार महिन्यात लोक विधानसभेत ठोस भूमिका घेतील, असे पवार यांनी स्पष्ट केले. अजित पवार यांच्यासह महायुतीला त्यांनी आरसा दाखवला.

शेतकऱ्यांची भूमिका बदलणार नाही

यावेळी शेतकऱ्यांच्या नाराजीचा भाजपला कसा फटका बसला हे सांगितले. तसेच ही भूमिका बदलणार नसल्याचे स्पष्ट केले. साधी गोष्ट आहे. आमच्या लोकांच्या हातात सत्ता नाही. सत्ता कुणाच्या हातात आहे हे सांगायची गरज नाही. शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे. काही निर्णय घेतले असेल तर आनंद आहे. कांदा व्यापारी आणि शेतकरी नाराज होता. तेवढ्यापुरतं मर्यादित नाही. राज्य आणि देशातील शेतकरी भाजपच्या विरोधात होता. त्यात काही बदल झालाय असं वाटत नाही, असे पवार म्हणाले.

Follow Us
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची
यंदाचा मान्सून नेमका कसा? पावसाबद्दल तज्ज्ञांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती!
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई...
पुणे प्रशासन अलर्टमोडवर! 5 तासांपासून विषारी दारु अड्ड्यावर कारवाई सुरु, धक्कादायक खुलासे
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचण
नाशिकच्या कथित धर्मांतरण प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! मतिन पटेलच्या अडचणी वाढल्या, गेल्या 3 तासांपासून...
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
Girish Mahajan | बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश!
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात... त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारीबाबत संजय राऊतांचा मोठा दावा
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल
Mumbai Shivsena UBT Protest | महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर जोरदार हल्लाबोल
अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
Monsoon Update | अखेर मान्सूनची दमदार एंट्री! केरळ गाठलं, महाराष्ट्रात कधी बरसणार पाऊस?
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती
विधान परिषदेच्या रणधुमाळीची A टू Z माहिती, किती जागा बिनविरोध अन् किती जागांवर चुरशीची लढत
नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत
Vidhan Parishad Election | शेवटच्या मिनिटाला मोठा ट्विस्ट! नाशिक-जळगावमध्ये महायुतीची डोकेदुखी कायम; बंडखोर झुकले नाहीत