AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘वन नेशन, वन इलेक्शन’वरून शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला; म्हणाले, यांना…

Sharad Pawar on Narendra Modi : शरद पवार आज नागपूरमध्ये आहेत. इथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरद पवारांनी निशाणा साधला आहे. 'वन नेशन, वन इलेक्शन' वर शरद पवार यांनी नेमकं काय म्हटलं? वाचा सविस्तर बातमी...

'वन नेशन, वन इलेक्शन'वरून शरद पवारांचा नरेंद्र मोदींना टोला; म्हणाले, यांना...
Sharad Pawar Narendra Modi
| Updated on: Aug 17, 2024 | 1:51 PM
Share

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे. या दौऱ्यादरम्यान शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सरकारला चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकाही घेता येत नाहीत, असं शरद पवार म्हणाले. त्यांनी ‘वन नेशन, वन इलेक्शन’वरून शरद पवारांनी नरेंद्र मोदींना टोला लगावला आहे. तसंच देशात सध्या शांततेची गरज असल्याचं शरद पवार म्हणाले.

शरद पवार काय म्हणाले?

देशाच्या प्रधानमंत्र्यांनी लाल किल्ल्यावर भाषण करत असताना सबंध देशाच्या निवडणुका एकावेळी व्हाव्यात या प्रकारची भूमिका मांडली. हे असं पंतप्रधान बोलून 12 तास झाले नाहीत. तोवर आपल्याला ऐकायला मिळतंय की जम्मू काश्मीर आणि हरियाणाची निवडणूक जाहीर झाली. पण झारखंड आणि महाराष्ट्राची निवडणूक जाहीर झालेली नाही. सबंध देशात एकावेळी निवडूक घ्यायचं धोरण प्रधानमंत्री मांडत असताना महाराष्ट्राची निवडणूक जाहीर न होणं हा एक प्रकारचा विरोधाभास आहे, असं शरद पवार म्हणाले.

देशात शांततेची गरज- शरद पवार

बांग्लादेशमधील हिंसाचार आणि त्याचे भारत आणि विशेषत: महाराष्ट्रावर होत असलेल्या परिणामांवर शरद पवारांनी भाष्य केलं आहे.  पश्चिम बंगाल हे राज्य बांग्लादेशला लागून आहेत. पण तिथं काही घडलं त्याचे परिणाम महाराष्ट्रात परिणाम पाहायला मिळतील, असं कधी घडलं नाही. या घटनेच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही. पण देशात सामजस्य आणि एक वाक्यता याची गरज आहे, असं शरद पवार म्हणाले.

जे काही घडतंय ते राज्याच्या हिताचं नाही. आज शांततेची गरज आहे. त्यासाठी समाजातील सगळ्याच घटकांनी खबरदारी घ्यावी एवढंच मी बोलू इच्छितो. शासनाचं धोरण, शासनाची कारवाई, गृहखात्याची जबाबदारी, त्यांची कारवाई यावर भाष्य करता येईल पण आज शांतता आणि सौहार्दाची आवश्यकता आहे. त्यामुळे या प्रकरणातील अन्य बाबींवर मी भाष्य करू इच्छित नाही, असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.

पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.