AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik | शिक्षणासाठी जीव धोक्यात, विद्यार्थ्यांची जिद्द, पण प्रशासनाला हाय लागणार, नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात या स्थितीसाठी कोण जबाबदार?

कळमणे, बेगू ,सावरपाडा, मदळपाडा, खिरमाणी आदी गावातील विद्यार्थ्यांना दररोज जीवघेणा प्रवास करून शाळेला जावे लागते. मात्र, प्रशासनाने याकडे सोईस्कर दुर्लक्ष केले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी कोणतेही संरक्षण नाही त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होताना दिसून येत आहे. एखादी घटना जीवावर बेतू शकते.

Nashik | शिक्षणासाठी जीव धोक्यात, विद्यार्थ्यांची जिद्द, पण प्रशासनाला हाय लागणार, नाशिकच्या सुरगाणा तालुक्यात या स्थितीसाठी कोण जबाबदार?
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Jul 21, 2022 | 10:03 AM
Share

मालेगाव : नाशिकच्या (Nashik) आदिवासीबहुल सुरगाणा तालुक्यातील भेगू सावरपाडा येथील विद्यार्थ्यांना (Students) शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास दररोज करावा लागतोयं. रस्ता नसल्याने चक्क विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी केटीवेअर बंधाऱ्यावरून वाहणाऱ्या पुराच्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. ग्रामस्थानी अनेकदा रस्ता करून देण्याची मागणी प्रशासनाकडे केलीयं. मात्र, प्रशासनाकडून (Administration) याकडे दुर्लक्ष केल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागतोयं. एखादी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण असणार असा प्रश्न उपस्थित केला जातोयं.

शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा दररोज जीवघेणा प्रवास

कळमणे, बेगू ,सावरपाडा, मदळपाडा, खिरमाणी आदी गावातील विद्यार्थ्यांना दररोज जीवघेणा प्रवास करून शाळेला जावे लागते. मात्र, प्रशासनाने याकडे सोईस्कर दुर्लक्ष केले आहे. शाळेतील विद्यार्थ्यांसाठी कोणतेही संरक्षण नाही त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होताना दिसून येत आहे. एखादी घटना जीवावर बेतू शकते, याला जबाबदार कोण असा सवाल ग्रामस्थांनी केला आहे. शासनाने योग्य ती दखल घेऊन या ठिकाणी पूल बांधावा अशी मागणी पालकांसह, ग्रामस्थानी केली आहे.

प्रशासनानचे सोईस्कर दुर्लक्ष, विद्यार्थ्यांचे हाल

नाशिक जिल्हात दमदार पावसाने हजेरी लावल्याने अनेक नद्यांना पुर आलायं. तसेच गंगापूर धरणातून विसर्ग सुरू असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालीयं. त्याच सुरगाणा तालुक्यातील भेगू सावरपाडा येथील बंधाऱ्यावरून पुराचे पाणी वाहत आहे. त्यातूनच विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी धोकादायक पध्दतीने प्रवास करावा लागतोयं. पुराच्या पाण्यात वाढ झाल्याने कधी कधी विद्यार्थ्यांच्या कंबर इतके पाणी देखील असते. यामुळे एखादी घटना घडण्याची शक्यता ग्रामस्थांकडून वर्तवली जातंय.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.